शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मुकबधिरांचा ‘आवाज’ दाबण्याचा प्रकार निंदनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:29 IST

नाशिक : पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर राज्यभरातील मूकबधिर बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या ...

नाशिक : पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर राज्यभरातील मूकबधिर बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमार घटनेचे शहरात पडसाद उमटले असून, अपंग क्षेत्रातील जाणकारांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. मूकबधिरांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असून, अपंगांविषयी कोणतीही आस्था सरकारला नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी नोंदविली. हा मोर्चा अर्थातच शांततेच्या मार्गाने होता. कोणतीही घोषणाबाजी नसताना केवळ मोर्चेकऱ्यांची संख्या वाढत चालल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पांगविण्यासाठी केलेला लाठीमार निंदनीय असल्याचे मत अपंग क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मांडले.पुणे येथील या घटनेमुळे अपंगांना समाजात सन्मानाने जगू द्यायचेच नाही का? असा प्रश्न पडतो. मूकबधिर तरुण घटनेने दिलेला अधिकार आणि कायद्यानुसार मिळालेला हक्क मागत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे अमानवीय आहे. खरेतर अपंगांप्रती असंवेदनशीलता सरकारने नेहमीच दाखविली आहे. कोणत्याही घटकातील अपंगांचे प्रश्न सुटलेले नाहीत. घोषणा होतात मात्र अंमलबजावणी होत नाही. अपंगांची अवहेलना सुरूच असून, सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे पुन्हा समोर आले. सरकारच अपंगांप्रती असंवेदनशील असेल तर दाद मागणार कुणाकडे? ही निषेधार्ह घटना असून, संबंधितांवर कारवाई व्हावी.  - मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, अपंग क्षेत्रातील कार्येकर्तेमूकबधिर मुळातच शांतप्रिय असतात. आवाज आणि शब्दाने साथ सोडलेल्या घटक गोंधळ तरी काय घालणार. तरीही पोलिसांनी लाठीमार करणे अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे. या मूकबधिरांनी सकाळपासून मोर्चा काढला होता. कुठेही त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य केलेले नसताना त्यांच्यावर लाठीमार करणे निषेधार्य असून, या घटनेनंतर आगामी निवडणुकीत एकही मूकबधिर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, असे ठरविण्यात आले आहे.- सचिन पाटील, अध्यक्ष,  मूकबधिर संघटना, नाशिकअपंगांना त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आलेल्या मूकबधिरांना सरकारकडून याप्रकारे उत्तर मिळेल असे अपेक्षित नव्हते. मूकबधिरांकडून कोणताही उपद्रव नसताना केवळ त्यांची भाषा न समजल्याने लाठीमार करणे चुकीचे आहे. अशावेळी दुभाषी वापरून मूकबधिरांचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांना या अपंग युवकांचे म्हणणे ऐकता आले नाही. या घटनेमुळे समाजातील लोक अपंग घटकाकडे कोणत्या भावनेतून बघतो याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणता येईल.- ज्योती आव्हाड, निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर दे डिसेबल

टॅग्स :Nashikनाशिक