शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

मुकबधिरांचा ‘आवाज’ दाबण्याचा प्रकार निंदनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:29 IST

नाशिक : पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर राज्यभरातील मूकबधिर बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या ...

नाशिक : पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर राज्यभरातील मूकबधिर बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमार घटनेचे शहरात पडसाद उमटले असून, अपंग क्षेत्रातील जाणकारांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. मूकबधिरांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असून, अपंगांविषयी कोणतीही आस्था सरकारला नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी नोंदविली. हा मोर्चा अर्थातच शांततेच्या मार्गाने होता. कोणतीही घोषणाबाजी नसताना केवळ मोर्चेकऱ्यांची संख्या वाढत चालल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पांगविण्यासाठी केलेला लाठीमार निंदनीय असल्याचे मत अपंग क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मांडले.पुणे येथील या घटनेमुळे अपंगांना समाजात सन्मानाने जगू द्यायचेच नाही का? असा प्रश्न पडतो. मूकबधिर तरुण घटनेने दिलेला अधिकार आणि कायद्यानुसार मिळालेला हक्क मागत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे अमानवीय आहे. खरेतर अपंगांप्रती असंवेदनशीलता सरकारने नेहमीच दाखविली आहे. कोणत्याही घटकातील अपंगांचे प्रश्न सुटलेले नाहीत. घोषणा होतात मात्र अंमलबजावणी होत नाही. अपंगांची अवहेलना सुरूच असून, सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे पुन्हा समोर आले. सरकारच अपंगांप्रती असंवेदनशील असेल तर दाद मागणार कुणाकडे? ही निषेधार्ह घटना असून, संबंधितांवर कारवाई व्हावी.  - मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, अपंग क्षेत्रातील कार्येकर्तेमूकबधिर मुळातच शांतप्रिय असतात. आवाज आणि शब्दाने साथ सोडलेल्या घटक गोंधळ तरी काय घालणार. तरीही पोलिसांनी लाठीमार करणे अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे. या मूकबधिरांनी सकाळपासून मोर्चा काढला होता. कुठेही त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य केलेले नसताना त्यांच्यावर लाठीमार करणे निषेधार्य असून, या घटनेनंतर आगामी निवडणुकीत एकही मूकबधिर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, असे ठरविण्यात आले आहे.- सचिन पाटील, अध्यक्ष,  मूकबधिर संघटना, नाशिकअपंगांना त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आलेल्या मूकबधिरांना सरकारकडून याप्रकारे उत्तर मिळेल असे अपेक्षित नव्हते. मूकबधिरांकडून कोणताही उपद्रव नसताना केवळ त्यांची भाषा न समजल्याने लाठीमार करणे चुकीचे आहे. अशावेळी दुभाषी वापरून मूकबधिरांचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांना या अपंग युवकांचे म्हणणे ऐकता आले नाही. या घटनेमुळे समाजातील लोक अपंग घटकाकडे कोणत्या भावनेतून बघतो याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणता येईल.- ज्योती आव्हाड, निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर दे डिसेबल

टॅग्स :Nashikनाशिक