शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मुकबधिरांचा ‘आवाज’ दाबण्याचा प्रकार निंदनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:29 IST

नाशिक : पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर राज्यभरातील मूकबधिर बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या ...

नाशिक : पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर राज्यभरातील मूकबधिर बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमार घटनेचे शहरात पडसाद उमटले असून, अपंग क्षेत्रातील जाणकारांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. मूकबधिरांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असून, अपंगांविषयी कोणतीही आस्था सरकारला नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी नोंदविली. हा मोर्चा अर्थातच शांततेच्या मार्गाने होता. कोणतीही घोषणाबाजी नसताना केवळ मोर्चेकऱ्यांची संख्या वाढत चालल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पांगविण्यासाठी केलेला लाठीमार निंदनीय असल्याचे मत अपंग क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मांडले.पुणे येथील या घटनेमुळे अपंगांना समाजात सन्मानाने जगू द्यायचेच नाही का? असा प्रश्न पडतो. मूकबधिर तरुण घटनेने दिलेला अधिकार आणि कायद्यानुसार मिळालेला हक्क मागत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे अमानवीय आहे. खरेतर अपंगांप्रती असंवेदनशीलता सरकारने नेहमीच दाखविली आहे. कोणत्याही घटकातील अपंगांचे प्रश्न सुटलेले नाहीत. घोषणा होतात मात्र अंमलबजावणी होत नाही. अपंगांची अवहेलना सुरूच असून, सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे पुन्हा समोर आले. सरकारच अपंगांप्रती असंवेदनशील असेल तर दाद मागणार कुणाकडे? ही निषेधार्ह घटना असून, संबंधितांवर कारवाई व्हावी.  - मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, अपंग क्षेत्रातील कार्येकर्तेमूकबधिर मुळातच शांतप्रिय असतात. आवाज आणि शब्दाने साथ सोडलेल्या घटक गोंधळ तरी काय घालणार. तरीही पोलिसांनी लाठीमार करणे अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे. या मूकबधिरांनी सकाळपासून मोर्चा काढला होता. कुठेही त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य केलेले नसताना त्यांच्यावर लाठीमार करणे निषेधार्य असून, या घटनेनंतर आगामी निवडणुकीत एकही मूकबधिर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, असे ठरविण्यात आले आहे.- सचिन पाटील, अध्यक्ष,  मूकबधिर संघटना, नाशिकअपंगांना त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आलेल्या मूकबधिरांना सरकारकडून याप्रकारे उत्तर मिळेल असे अपेक्षित नव्हते. मूकबधिरांकडून कोणताही उपद्रव नसताना केवळ त्यांची भाषा न समजल्याने लाठीमार करणे चुकीचे आहे. अशावेळी दुभाषी वापरून मूकबधिरांचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांना या अपंग युवकांचे म्हणणे ऐकता आले नाही. या घटनेमुळे समाजातील लोक अपंग घटकाकडे कोणत्या भावनेतून बघतो याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणता येईल.- ज्योती आव्हाड, निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर दे डिसेबल

टॅग्स :Nashikनाशिक