शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

ओझर-पिंपळगावला लवकरच उड्डाणपूल

By admin | Updated: November 16, 2015 22:37 IST

प्रस्ताव केंद्राकडे : सव्वाशे कोटींचा खर्च अपेक्षित

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांचा विरोध व भूसंपादनाच्या वादात अडकलेले मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील ओझर व पिंपळगाव बसवंत येथील उड्डाणपुलाचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांनी केलेल्या मागणीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हिरवा कंदील दर्शविल्यामुळे नवीन वर्षात दोन्ही ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील दुसऱ्या टप्प्यात ओझर गावातून रुंदीकरणाचा मार्ग जात असल्यामुळे प्रारंभी चौपदरीकरणासाठी जागा संपादित करण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यामुळे काम सुरू होण्यास विलंब झाला होता, त्यानंतर मात्र त्यांचा विरोध बाजूला सारून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले, परंतु या मार्गावरील रहदारीचा तसेच दोन्ही बाजूस गावाचा विस्तारीकरण झालेला असल्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरण करण्याऐवजी खंडेराव महाराज मंदिरापासून उड्डाणपूल केला जावा, अशी मागणी करून ग्रामस्थांनी काम बंद पाडले, तेव्हापासून महामार्गावर सुमारे दोनशे ते तीनशे मीटर अंतराचे चौपदरीकरण रखडले असून, ग्रामस्थांची उड्डाणपुलाची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिल्ली येथील मुख्यालयापर्यंत पोहोचविण्यात आली. दरम्यान, रस्त्याचे काम रखडल्याने या ठिकाणी कायमच वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाणही वाढले. एकीकडे याच रस्त्यावर टोलची आकारणी केली जात असताना दुसरीकडे रस्त्याची दुर्दशा पाहून वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशीच परिस्थिती पिंपळगाव बसवंत येथे असून, तेथेही उड्डाणपुलाच्या मागणीसाठी जवळपास तीनशे मीटर रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत पडून आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या दोन्ही ठिकाणच्या उड्डापुलाचा प्रस्ताव दिल्लीच्या मुख्यालयी पाठविला असून, ओझरच्या पुलासाठी सुमारे शंभर कोटी, तर पिंपळगावसाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही ठिकाणच्या पुलाच्या नकाशालाही मंजुरी मिळून पहिल्या प्रस्तावाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव पुन्हा प्राधिकरणाच्या मुख्यालयी पाठविण्यात आला आहे. येत्या महिन्यात उड्डाणपुलाचे काम सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.