शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भिवंडीच्या धर्तीवर नाशिकच्या आयटी पार्कच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 01:43 IST

माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे आपले भवितव्य आहे. राज्यात ज्याप्रमाणे भिवंडीला पाचशे एकर क्षेत्रांवर आयटी पार्क मंजूर झाला आहे, त्याच धर्तीवर नााशिकमध्येही साडेतीनशे क्षेत्रांतील आयटी हबच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी (दि.१) नाशिकमध्ये केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक गुंतवणूक प्रकल्पसुद्धा नाशिकला आणण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

ठळक मुद्देनारायण राणे यांची घोषणा : आयटी कॉनक्लेव्ह २०२२ ला उद्योजकांचा प्रतिसाद

नाशिक : माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे आपले भवितव्य आहे. राज्यात ज्याप्रमाणे भिवंडीला पाचशे एकर क्षेत्रांवर आयटी पार्क मंजूर झाला आहे, त्याच धर्तीवर नााशिकमध्येही साडेतीनशे क्षेत्रांतील आयटी हबच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी (दि.१) नाशिकमध्ये केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक गुंतवणूक प्रकल्पसुद्धा नाशिकला आणण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

नाशिक महापालिकेच्या वतीने आडगाव शिवारात ३३५ एकर क्षेत्रांत खासगी सहभागातून आयटी पार्क साकारण्यात येणार असून अशाप्रकारे आयटी पार्कसाठी पुढाकार घेणारी नाशिक महापालिका देशातील पहिलीच महापालिका आहे. या पार्कमध्ये गुंतवणूक यावी यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.१) हॉटेल ताजमध्ये नाशिक ‘आयटी कॉनक्लेव्ह-२०२२’ आयोजित करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन करताना राणे बोलत होते. यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते प्रकाश पाठक, भाजप लघू उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार यांच्यासह अन्य महापालिका पदाधिकारी उपस्थित हेाते.

उद्योगांविषयी बोलताना नेहमी उद्योगपतींनी किती नफा कमवला यापेक्षा किती लोकांना राेजगार दिला, किती उत्पादन केले आणि देशाच्या आर्थिक विकास दरात किती भर घातली याकडे देखील लक्ष पुरवण्याची गरज असते. नाशिकमध्ये येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान उद्योगांमुळे नाशिकचे अर्थकारण बदलेल तसेच दरडोई उत्पन्न वाढेल, असेही राणे म्हणाले.

यावेळी माजी मंत्री जयकुमार रावळ यांनी उत्तर महाराष्ट्राची राजधानी असलेले नाशिक आता आयटी हब होत असून त्यामुळे स्मार्ट नाशिक ब्रँड नाशिक बनणार असल्याचे सांगितले.

इन्फो..

राणे यांनी पालकत्व स्वीकारावे

महापालिका निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. त्यानंतर नाशिकमध्ये सिटी लिंक, निओ मेट्रो असे अनेक प्रकल्प राबवण्यात आले. आता आय टी हबसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाशिकला दत्तक घ्यावे, असे यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

इन्फो...

महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले की, गेल्या तीस वर्षांपासून नाशिकमध्ये आयटी उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. ३२ टक्के युवक हे आयटीतील नोकऱ्यांसाठी पुणे, बंगळुरू, हैदराबाद येथे जातात. आता नाशिकमध्ये आयटी पार्क सुरू हेाणार असल्याने ब्रेन ड्रेन टळेल, असेही ते म्हणाले.

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ३३५ एकर क्षेत्रांवर पार्क साकारण्यात येणार आहे. तसे संमतीपत्र नागरिकांनी महापालिकेला दिले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अर्थकारण वाढेल तसेच प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष दोन लाख रोजगार वाढतील, असे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकITमाहिती तंत्रज्ञानNarayan Raneनारायण राणे