शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भिवंडीच्या धर्तीवर नाशिकच्या आयटी पार्कच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 01:43 IST

माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे आपले भवितव्य आहे. राज्यात ज्याप्रमाणे भिवंडीला पाचशे एकर क्षेत्रांवर आयटी पार्क मंजूर झाला आहे, त्याच धर्तीवर नााशिकमध्येही साडेतीनशे क्षेत्रांतील आयटी हबच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी (दि.१) नाशिकमध्ये केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक गुंतवणूक प्रकल्पसुद्धा नाशिकला आणण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

ठळक मुद्देनारायण राणे यांची घोषणा : आयटी कॉनक्लेव्ह २०२२ ला उद्योजकांचा प्रतिसाद

नाशिक : माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे आपले भवितव्य आहे. राज्यात ज्याप्रमाणे भिवंडीला पाचशे एकर क्षेत्रांवर आयटी पार्क मंजूर झाला आहे, त्याच धर्तीवर नााशिकमध्येही साडेतीनशे क्षेत्रांतील आयटी हबच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी (दि.१) नाशिकमध्ये केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक गुंतवणूक प्रकल्पसुद्धा नाशिकला आणण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

नाशिक महापालिकेच्या वतीने आडगाव शिवारात ३३५ एकर क्षेत्रांत खासगी सहभागातून आयटी पार्क साकारण्यात येणार असून अशाप्रकारे आयटी पार्कसाठी पुढाकार घेणारी नाशिक महापालिका देशातील पहिलीच महापालिका आहे. या पार्कमध्ये गुंतवणूक यावी यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.१) हॉटेल ताजमध्ये नाशिक ‘आयटी कॉनक्लेव्ह-२०२२’ आयोजित करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन करताना राणे बोलत होते. यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते प्रकाश पाठक, भाजप लघू उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार यांच्यासह अन्य महापालिका पदाधिकारी उपस्थित हेाते.

उद्योगांविषयी बोलताना नेहमी उद्योगपतींनी किती नफा कमवला यापेक्षा किती लोकांना राेजगार दिला, किती उत्पादन केले आणि देशाच्या आर्थिक विकास दरात किती भर घातली याकडे देखील लक्ष पुरवण्याची गरज असते. नाशिकमध्ये येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान उद्योगांमुळे नाशिकचे अर्थकारण बदलेल तसेच दरडोई उत्पन्न वाढेल, असेही राणे म्हणाले.

यावेळी माजी मंत्री जयकुमार रावळ यांनी उत्तर महाराष्ट्राची राजधानी असलेले नाशिक आता आयटी हब होत असून त्यामुळे स्मार्ट नाशिक ब्रँड नाशिक बनणार असल्याचे सांगितले.

इन्फो..

राणे यांनी पालकत्व स्वीकारावे

महापालिका निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. त्यानंतर नाशिकमध्ये सिटी लिंक, निओ मेट्रो असे अनेक प्रकल्प राबवण्यात आले. आता आय टी हबसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाशिकला दत्तक घ्यावे, असे यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

इन्फो...

महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले की, गेल्या तीस वर्षांपासून नाशिकमध्ये आयटी उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. ३२ टक्के युवक हे आयटीतील नोकऱ्यांसाठी पुणे, बंगळुरू, हैदराबाद येथे जातात. आता नाशिकमध्ये आयटी पार्क सुरू हेाणार असल्याने ब्रेन ड्रेन टळेल, असेही ते म्हणाले.

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ३३५ एकर क्षेत्रांवर पार्क साकारण्यात येणार आहे. तसे संमतीपत्र नागरिकांनी महापालिकेला दिले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अर्थकारण वाढेल तसेच प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष दोन लाख रोजगार वाढतील, असे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकITमाहिती तंत्रज्ञानNarayan Raneनारायण राणे