शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

सोनई हत्याकांडातील सहा खुन्यांना फाशी; आरोपी तर सैतानच आहेत, न्यायालयाची टिप्पणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 06:06 IST

संपूर्ण राज्याला हादरविणारे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील ६ दोषींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. यात तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले, ते पाहता तुम्ही सैतानही आहात.

नाशिक : संपूर्ण राज्याला हादरविणारे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील ६ दोषींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. यात तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले, ते पाहता तुम्ही सैतानही आहात. तुम्ही जिवंत राहणे समाजासाठी धोकादायक आहे,’ अशा शब्दांत न्यायाधीश वैष्णव यांनी निकालपत्रात टिप्पणी केली.रमेश विश्वनाथ दरंदले (३९), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३४), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (१९, ) अशोक सुधाकर नवगिरे (२८) व संदीप माधव कु-हे (३३) यांना सोमवारी न्यायालयाने दोषी ठरविले होते. सवर्ण समाजाच्या मुलीशी प्रेम असल्याच्या संशयावरून आरोपींनी सचिन सोहनलाल घारू (२६), संदीप राजू थनवार (२४) व राहुल राजू कंडारे (२६, सर्व रा. त्रिमूर्ती कॉलेज, नेवासा फाटा) यांचा निर्दयपणे १ जानेवारी २०१३ रोजी खून केला होता.राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने घटनेचा तपास केला. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. न्यायालयाने सहाही आरोपींना शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे.पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नमारेक-यांनी सचिनचे दोन्ही हात व पायाचे तुकडे शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये टाकून पुरावा नष्ट केला. त्याच्या शरीराचे इतर अवयव व राहुल कंडारे याचा मृतदेह विहिरीत पुरला. रक्ताने माखलेले कपडे शेतात जाळून टाकले. संदीप थनवारचा सेफ्टी टॅँकमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती सोनई पोलिसांना दिली.- दोषींना प्रत्येकी १० हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून मृताच्या वारसांना प्रत्येकी २० हजाररुपये देण्यात यावेत, असे न्यायालयाने सांगितले.क्रौर्याची परिसीमासुदृढ बांध्याचा संदीप राजू थनवार यास ६ जणांनी तो काम करत असलेल्या सेफ्टी टॅँकमध्येच बुडवून मारले. ते पाहून पळालेल्या राहुल उर्फ तिलक राजू कंडारे याचा पाठलाग करून मारेकºयांनी ऊसतोडीच्या कोयत्याने वार करत ठार मारले. सचिन धारू याच्याविषयी मारेकºयांच्या मनात अधिक राग होता. त्यांनी सचिनला शेतातील खड्ड्यात नेऊन वैरण कापण्याच्या अडकित्त्याने मारले. त्यांनी त्याचे दोन्ही पाय व हात कापले. त्यानंतर, जिवंतपणी त्याची मान कापून क्रूरपणे त्यास ठार मारले.पीडितांना सरकारी मदत नाहीचमृतांच्या नातेवाइकांना सरकारी नोकरी, तसेच आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले होते़ मात्र, सचिन घारू, राहुल कंडारे व संदीप थनवार यांच्या नातेवाइकांनी सरकारडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सांगितले़.जातीयवाद ही समाजाला लागलेली एचआयव्हीसारखी कीड आहे़ तुमच्यासारखी हिंस्त्र मनोवृत्तीची माणसे जिवंत राहणे समाजास धोकादायक आहे. त्यामुळे तुम्हाला देहदंड ही शिक्षाच योग्य आहे.- आऱ आऱ वैष्णव, जिल्हा सत्र न्यायाधीश

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय