शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
3
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
4
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
5
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
6
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
8
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
9
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
10
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
11
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
12
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
13
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
14
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
15
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
16
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
17
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
18
Dashavatar: 'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
19
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
20
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

राणांच्या कृतीमागे कुणाचा तरी हात : गृहमंत्री वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 01:45 IST

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार सत्तेत राहायला नको, हा विरोधकांचा प्रयत्न असून त्यासाठी ज्या क्लृप्त्या करायच्या त्या सर्व वापरल्या जात आहेत. राणा दाम्पत्याच्या कृतीमागे नक्कीच कुणाचा तरी हात असून त्याशिवाय ते असे धाडस करू शकत नसल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देनाशिकमधील पत्रकार परिषदेत केला दावा

नाशिक : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार सत्तेत राहायला नको, हा विरोधकांचा प्रयत्न असून त्यासाठी ज्या क्लृप्त्या करायच्या त्या सर्व वापरल्या जात आहेत. राणा दाम्पत्याच्या कृतीमागे नक्कीच कुणाचा तरी हात असून त्याशिवाय ते असे धाडस करू शकत नसल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्य सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असला तरी पोलीस सक्षमपणे ही परिस्थिती काबूत ठेवतील, त्याचा मला विश्वास असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडील माहितीच्या आधारे कृती केली असून त्यात चुकीचे काहीच नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

इन्फो

सोमय्यांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नव्हती

राणा प्रकरणात लोकप्रतिनिधी म्हणून सोमय्यांना पोलीस ठाण्यात जाण्याचा अधिकार असला तरी कस्टडीमधील व्यक्तीला भेटायला जायचे काहीच कारण नाही. तिथे जाऊन विनाकारण संघर्ष वाढवण्याचे काम त्यांनी करायला नको होते. मात्र जे झाले ते योग्य नाही. असे काय काम आहे की त्यांना वाय सुरक्षा देण्यात आली, त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात पोलिसांकडे आधीचे इनपुट होते. मात्र संपर्कात काही घोळ झाला होता. त्यातूनही आता कारवाई केली असून पोलिसांच्या बदल्यादेखील करण्यात आल्या असल्याचे वळसे पाटील म्हणाले

इन्फो

आधी मुख्यमंत्र्यांची सही, नंतर स्थगिती

कोणत्याही बदल्यांमध्ये राजी-नाराजी असतेच. मात्र, ज्या वेळेला बदल्या होतात, त्या गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्या सहीनेचं बदल्या होतात. मात्र, नंतर मुख्यमंत्र्यांना बदल्यांमध्ये फेरबदल करण्याचा विचार असेल आणि त्यांनी बदल्यांना स्थगिती दिली असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही, असेही वळसे पाटील यांनी नमूद केले.

 

-

टॅग्स :NashikनाशिकDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील