शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मेनरोडवरील ‘सम विषम’ला वैतागला व्यापारी वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 19:02 IST

नाशिक- मिशन बिगेन अगेन अंतर्गत नाशिक शहरातील बाजारपेठा खुल्या करण्यास महापालिकेन परवानगी दिली खरी परंतु सम- विषम तारखांनाच व्यवसाय सुरू करण्याच्या निर्बंधांमुळे अवघे पंधरा दिवसाच व्यवसायाला मिळत आहेत. त्यामुळे व्यापारी- व्यावसायिकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला असून महापालिकेने हे निर्बंध तत्काळ हटवावेत अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देपंधरा दिवसच व्यवसायआर्थिक व्यवहारावर परिणाम

नाशिक- मिशन बिगेन अगेन अंतर्गत नाशिक शहरातील बाजारपेठा खुल्या करण्यास महापालिकेन परवानगी दिली खरी परंतु सम- विषम तारखांनाच व्यवसाय सुरू करण्याच्या निर्बंधांमुळे अवघे पंधरा दिवसाच व्यवसायाला मिळत आहेत. त्यामुळे व्यापारी- व्यावसायिकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला असून महापालिकेने हे निर्बंध तत्काळ हटवावेत अशी मागणी होत आहे.

दुकाने सुर करताना महापालिकेने सम विषम तारखांनाच दुकाने खुली करण्याची अट घातली आहे. मात्र सुरूवातीला सम तारखेला कोणती दुकाने उघडी ठेवायची आणि विषम तारखेला कोणती, याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळ झाला. वरून पोलीसांनी मेनरोड सारख्या बाजारपेठेत दुकाने बंद करण्यास सांगितल्याने अधिकच संभ्रम निर्माण झाला. तथापि, त्यानंतर महापालिकेने दुकानांसमोर सम- विषमचे स्टिकर लावले असून काही ठिकाणी रंगवून ठेवले आहे. तथापि, या पध्दतीमुळे केवळ पंधरा दिवस दुकान सुरू ठेवता येते. दुकानातील कामगारांना पंधरा दिवसाचे वेतन देता येत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांना अडचण होते, परंतु त्यापेक्षा अधिक अडचण ग्राहकांची होते. मेनरोड, शिवाजी रोड, चांदवडकर लेन, सराफ बाजार, भांडी बाजार, कापड पेठेत ग्राहक गेल्यानंतर त्याला अनेक दुकानांमध्ये जाता तर येत नाहीच परंतु बाजारात गेल्यानंतर सम- विषमच्या नियमामुळे आवश्यक ते दुकान बंद असल्याचे दिसल्यावर त्याला परतावे लागते आणि प्रवासाचा भुर्दंड देखील सोसावा लागतो.

मुळात महापालिकेचे सम विषम तारखांचे धोरण बुचकळ्यात टाकणारे आहेत. मेनरोड, शिवाजीरोड, दही पुल, सराफ बाजार या भागात नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते आणि दुकान उघडे दिसलेच तर प्रशासन किंवा पोलीस दुकानदारांवर कारवाई करतात. परंत दुसरीकडे ही मध्य भागातील बाजारपेठ वगळता उपनगरात मात्र नियमांचे उल्लंघन होऊन देखील कोणतीच कारवाई होत नाही, अशी व्यवसायिकांची तक्रार आहे. त्यामुळे मध्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाच त्याचा जाच का असा प्रश्न व्यापा-यांनी केला आहे.शहरात सम- विषमची अंमलबजावणी अत्यंत विनोदी पध्दतीने सुरू आहे. मेनरोड सारख्या बाजारपेठेत अरूंद गल्ली बोळात दुकाने असल्याने तेथे जो नियम लागू केला तो संपुर्ण शहरात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला दुकाने आणि दुसºया बाजूला घरे, शेती किंवा शासकिय कार्यालये असले तरी दुकाने नियोजनानुसार सम किंवा विषम तारखेलाच खुली करावी लागत असल्याने नियमाच्या अंमलबजावणीचे नेमके तर्कट काय असा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे कॉलेजरोड, गंगापूर रोड सारख्या ठिंकाणी अत्यंत रूंद रस्ता मध्ये दुभाजक असून देखील सम - विषमचा नियम लागू करण्यात आल्याने त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या