शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

मेनरोडवरील ‘सम विषम’ला वैतागला व्यापारी वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 19:02 IST

नाशिक- मिशन बिगेन अगेन अंतर्गत नाशिक शहरातील बाजारपेठा खुल्या करण्यास महापालिकेन परवानगी दिली खरी परंतु सम- विषम तारखांनाच व्यवसाय सुरू करण्याच्या निर्बंधांमुळे अवघे पंधरा दिवसाच व्यवसायाला मिळत आहेत. त्यामुळे व्यापारी- व्यावसायिकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला असून महापालिकेने हे निर्बंध तत्काळ हटवावेत अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देपंधरा दिवसच व्यवसायआर्थिक व्यवहारावर परिणाम

नाशिक- मिशन बिगेन अगेन अंतर्गत नाशिक शहरातील बाजारपेठा खुल्या करण्यास महापालिकेन परवानगी दिली खरी परंतु सम- विषम तारखांनाच व्यवसाय सुरू करण्याच्या निर्बंधांमुळे अवघे पंधरा दिवसाच व्यवसायाला मिळत आहेत. त्यामुळे व्यापारी- व्यावसायिकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला असून महापालिकेने हे निर्बंध तत्काळ हटवावेत अशी मागणी होत आहे.

दुकाने सुर करताना महापालिकेने सम विषम तारखांनाच दुकाने खुली करण्याची अट घातली आहे. मात्र सुरूवातीला सम तारखेला कोणती दुकाने उघडी ठेवायची आणि विषम तारखेला कोणती, याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळ झाला. वरून पोलीसांनी मेनरोड सारख्या बाजारपेठेत दुकाने बंद करण्यास सांगितल्याने अधिकच संभ्रम निर्माण झाला. तथापि, त्यानंतर महापालिकेने दुकानांसमोर सम- विषमचे स्टिकर लावले असून काही ठिकाणी रंगवून ठेवले आहे. तथापि, या पध्दतीमुळे केवळ पंधरा दिवस दुकान सुरू ठेवता येते. दुकानातील कामगारांना पंधरा दिवसाचे वेतन देता येत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांना अडचण होते, परंतु त्यापेक्षा अधिक अडचण ग्राहकांची होते. मेनरोड, शिवाजी रोड, चांदवडकर लेन, सराफ बाजार, भांडी बाजार, कापड पेठेत ग्राहक गेल्यानंतर त्याला अनेक दुकानांमध्ये जाता तर येत नाहीच परंतु बाजारात गेल्यानंतर सम- विषमच्या नियमामुळे आवश्यक ते दुकान बंद असल्याचे दिसल्यावर त्याला परतावे लागते आणि प्रवासाचा भुर्दंड देखील सोसावा लागतो.

मुळात महापालिकेचे सम विषम तारखांचे धोरण बुचकळ्यात टाकणारे आहेत. मेनरोड, शिवाजीरोड, दही पुल, सराफ बाजार या भागात नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते आणि दुकान उघडे दिसलेच तर प्रशासन किंवा पोलीस दुकानदारांवर कारवाई करतात. परंत दुसरीकडे ही मध्य भागातील बाजारपेठ वगळता उपनगरात मात्र नियमांचे उल्लंघन होऊन देखील कोणतीच कारवाई होत नाही, अशी व्यवसायिकांची तक्रार आहे. त्यामुळे मध्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाच त्याचा जाच का असा प्रश्न व्यापा-यांनी केला आहे.शहरात सम- विषमची अंमलबजावणी अत्यंत विनोदी पध्दतीने सुरू आहे. मेनरोड सारख्या बाजारपेठेत अरूंद गल्ली बोळात दुकाने असल्याने तेथे जो नियम लागू केला तो संपुर्ण शहरात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला दुकाने आणि दुसºया बाजूला घरे, शेती किंवा शासकिय कार्यालये असले तरी दुकाने नियोजनानुसार सम किंवा विषम तारखेलाच खुली करावी लागत असल्याने नियमाच्या अंमलबजावणीचे नेमके तर्कट काय असा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे कॉलेजरोड, गंगापूर रोड सारख्या ठिंकाणी अत्यंत रूंद रस्ता मध्ये दुभाजक असून देखील सम - विषमचा नियम लागू करण्यात आल्याने त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या