शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अवयवदानाच्या प्रचारात सामाजिक संस्थाच पडतात कमी: सुनील देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:24 IST

नाशिक : अवयवदान हे श्रेष्ठ दान म्हंटले गेले असले तरी समाजात अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. अगदी दशक्रिया विधीच्या दिवशी किर्तन ठेवतानाच अवयवदान हे अन्य कोणाला तरी जीवनदान देणारे ठरू शकेल यासंदभातील व्याख्यान देखील झाले पाहिजे. दुदैवाने यात सामाजिक संस्था देखील कमी पडत आहेत, अशी खंत मृृत्यूंजय आॅर्गन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअंधश्रध्देचा पगडा अधिकअपुऱ्या माहितीमुळे प्रतिसाद कमी

नाशिक: अवयवदान हे श्रेष्ठ दान म्हंटले गेले असले तरी समाजात अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. अगदी दशक्रिया विधीच्या दिवशी किर्तन ठेवतानाच अवयवदान हे अन्य कोणाला तरी जीवनदान देणारे ठरू शकेल यासंदभातील व्याख्यान देखील झाले पाहिजे. दुदैवाने यात सामाजिक संस्था देखील कमी पडत आहेत, अशी खंत मृृत्यूंजय आॅर्गन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले.गेल्या काही वर्षांपासून अवयवदान जनजागृतीसाठी ते महाराष्ट्रात पदयात्रा करत आहेत. यातून आजवर १४५ गावांमध्ये ३५० च्या वर कार्यक्रम घेतले  अवयवदानाच्या प्रचारासाठी महाराष्टÑात पदयात्रा करणारे देशपांडे हे रविवारपासून (दि.५) पुन्हा पदयात्रा सुरू करीत आहेत. त्या संदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न- अवयवदान हा शब्द सध्या सुपरिचीत होत आहे. मात्र, त्यानंतरही आवश्यकतेनुसार प्रमाण वाढत नाही, त्यामागची नेमकी कारणे कोणती?देशपांडे- आपण विकसनशील देश असलो तरी अवयवदानात अत्यंत मागे आहोत. त्याची अनेक कारणे अहेत. अंधश्रध्दा, अपुरी माहिती यामुळे प्रतिसाद मिळत नाही. वास्तविक यासंदर्भात देशपातळीवर जागृती झाली पाहिजे, श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते. आपल्याकडे अवयवदानाचे पुरेसे महत्व माहिती नाही, हीच खरी अडचण आहे.

प्रश्न- अवयवदान वाढविण्यासाठी नेमके काय प्रयत्न व्हावेत..देशपांडे- अवयवदानाविषयी आपल्याकडे पुरेशी जागृती नाही नेत्र व त्वचा हे बाह्य अवयव दान करू शकतो. नैसर्गिक मृत्यू आला तर माणसांचे ३ मिनीटात अवयव निकामी होतात. मात्र त्वचा व नेत्र हे सहा तासाच्या आत दान करु शकतो. तसेच देहदान केल्यास याचा फायदा वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होत असतो. १० विद्यार्थ्यांमागे १ देह असणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्तम डॉक्टर तयार होण्यास मदत होते. तसेच कुणाला अवयव दान केल्यास मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तिलाही यामुळे जीवनदान मिळू शकते. हे लोकांना कळले तर पुढिल कामे सोपे होतात. लोकांचा धर्मावर मोठा विश्वास असल्याने त्यांना धार्मिक पद्धतीने समजावून सांगणे महत्वाचे असते. मी करीत असलेल्या पदयात्रा साठीच आहेत. त्यातून काही तरी चांगले बाहेर पडेल अशी अपेक्षा ठेवू या!

मुलाखत- अमोल निरगुडे

टॅग्स :Nashikनाशिकsocial workerसमाजसेवकOrgan donationअवयव दान