शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अवयवदानाच्या प्रचारात सामाजिक संस्थाच पडतात कमी: सुनील देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:24 IST

नाशिक : अवयवदान हे श्रेष्ठ दान म्हंटले गेले असले तरी समाजात अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. अगदी दशक्रिया विधीच्या दिवशी किर्तन ठेवतानाच अवयवदान हे अन्य कोणाला तरी जीवनदान देणारे ठरू शकेल यासंदभातील व्याख्यान देखील झाले पाहिजे. दुदैवाने यात सामाजिक संस्था देखील कमी पडत आहेत, अशी खंत मृृत्यूंजय आॅर्गन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअंधश्रध्देचा पगडा अधिकअपुऱ्या माहितीमुळे प्रतिसाद कमी

नाशिक: अवयवदान हे श्रेष्ठ दान म्हंटले गेले असले तरी समाजात अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. अगदी दशक्रिया विधीच्या दिवशी किर्तन ठेवतानाच अवयवदान हे अन्य कोणाला तरी जीवनदान देणारे ठरू शकेल यासंदभातील व्याख्यान देखील झाले पाहिजे. दुदैवाने यात सामाजिक संस्था देखील कमी पडत आहेत, अशी खंत मृृत्यूंजय आॅर्गन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले.गेल्या काही वर्षांपासून अवयवदान जनजागृतीसाठी ते महाराष्ट्रात पदयात्रा करत आहेत. यातून आजवर १४५ गावांमध्ये ३५० च्या वर कार्यक्रम घेतले  अवयवदानाच्या प्रचारासाठी महाराष्टÑात पदयात्रा करणारे देशपांडे हे रविवारपासून (दि.५) पुन्हा पदयात्रा सुरू करीत आहेत. त्या संदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न- अवयवदान हा शब्द सध्या सुपरिचीत होत आहे. मात्र, त्यानंतरही आवश्यकतेनुसार प्रमाण वाढत नाही, त्यामागची नेमकी कारणे कोणती?देशपांडे- आपण विकसनशील देश असलो तरी अवयवदानात अत्यंत मागे आहोत. त्याची अनेक कारणे अहेत. अंधश्रध्दा, अपुरी माहिती यामुळे प्रतिसाद मिळत नाही. वास्तविक यासंदर्भात देशपातळीवर जागृती झाली पाहिजे, श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते. आपल्याकडे अवयवदानाचे पुरेसे महत्व माहिती नाही, हीच खरी अडचण आहे.

प्रश्न- अवयवदान वाढविण्यासाठी नेमके काय प्रयत्न व्हावेत..देशपांडे- अवयवदानाविषयी आपल्याकडे पुरेशी जागृती नाही नेत्र व त्वचा हे बाह्य अवयव दान करू शकतो. नैसर्गिक मृत्यू आला तर माणसांचे ३ मिनीटात अवयव निकामी होतात. मात्र त्वचा व नेत्र हे सहा तासाच्या आत दान करु शकतो. तसेच देहदान केल्यास याचा फायदा वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होत असतो. १० विद्यार्थ्यांमागे १ देह असणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्तम डॉक्टर तयार होण्यास मदत होते. तसेच कुणाला अवयव दान केल्यास मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तिलाही यामुळे जीवनदान मिळू शकते. हे लोकांना कळले तर पुढिल कामे सोपे होतात. लोकांचा धर्मावर मोठा विश्वास असल्याने त्यांना धार्मिक पद्धतीने समजावून सांगणे महत्वाचे असते. मी करीत असलेल्या पदयात्रा साठीच आहेत. त्यातून काही तरी चांगले बाहेर पडेल अशी अपेक्षा ठेवू या!

मुलाखत- अमोल निरगुडे

टॅग्स :Nashikनाशिकsocial workerसमाजसेवकOrgan donationअवयव दान