शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गजलक्ष्मीच्या सुटकेसाठी आता सोशल चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 14:13 IST

सतीश डोंगरे ।नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या गजलक्ष्मीची आर्त हाक जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली आहे. ‘लक्ष्मी’च्या नावाने एका संकेतस्थळावर पिटीशन साइन करून ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील गजलक्ष्मीचा मूक आक्रोश मांडण्यात आला आहे.या पिटीशनला जगभरातील प्राणिमित्रांनी साद घातली असून, तिच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी वाट्टेल ती मदत ...

ठळक मुद्देसंकेतस्थळावर पिटीशन साइनतातडीने उपचाराची गरजवनमंत्र्यांनीच दखल घ्यावी

सतीश डोंगरे ।नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या गजलक्ष्मीची आर्त हाक जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली आहे. ‘लक्ष्मी’च्या नावाने एका संकेतस्थळावर पिटीशन साइन करून ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील गजलक्ष्मीचा मूक आक्रोश मांडण्यात आला आहे.या पिटीशनला जगभरातील प्राणिमित्रांनी साद घातली असून, तिच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी वाट्टेल ती मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, वनविभागाची अनास्था कायम असल्याने लक्ष्मीची सुटका अखेर केव्हा होणार, हा प्रश्न कायम आहे. अ‍ॅनिमल वेल्फेअर अ‍ॅण्ड अ‍ॅँटी हॅरेशमेंट सोसायटी अर्थात ‘आवास’ या संस्थेचे अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांनी लक्ष्मीच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारत तिच्या सुटकेची मागणी केली. तसेच एका संकेतस्थळावर ‘लक्ष्मी’ या नावाने पिटीशन साइन केले. या पिटीशनला भारतातील विविध राज्यांमधील प्राणिमित्रांसह अमेरिका, सिरीया, बांगलादेश, पाकिस्तान, इस्त्रायल, आफ्रिका यांसारख्या देशांमधील प्राणिमित्रांनीही लक्ष्मीच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.केरळ, तामिळनाडू या भागातील हत्तींचे पालनपोषण करणा-यांनी तर नाशिकमध्ये येऊन लक्ष्मीच्या जखमांवर उपचार करण्याचे बोलून दाखविले आहे, तर एका प्राणिमित्राने या प्रकरणात कायदेशीर पेच निर्माण झाल्यास न्यायालयात लढा देऊ, पर्यायाने त्यासाठी वकीलही उभा करू, असेही बोलून दाखविले आहे. या पिटीशनला काही तासांतच सुमारे अडीच हजार लोकांनी साइन केले असून, सोशल मीडियावर याबाबतची एक मोठी चळवळच उभी राहताना दिसत आहे. समाजातून दबाव वाढत असतानाही वनविभागाच्या या कुचराईमुळे संतापाचे वातावरण असून, लक्ष्मीचे खरे गुन्हेगार कोण, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

ALSO READ      : स्वार्थी दुनियादारी : विव्हळणाऱ्या ‘गज’लक्ष्मीचा मूक आक्रोशवनमंत्र्यांनीच दखल घ्यावीराज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच या प्रकरणी लक्ष केंद्रित करून लक्ष्मीची मुक्तता करावी अशी मागणी आता पुढे येत आहे. ‘जय’ वाघाच्या शोधासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेतला होता, तसाच पुढाकार लक्ष्मीच्या सुटकेसाठीही घ्यावा. कारण लक्ष्मीच्या शरीरावरील मोठमोठ्या जखमा ठळकपणे दिसत असतानाही वनविभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. अशात मंत्रालयातूनच आदेश काढले गेल्यास अधिकारी लक्ष्मीच्या मुक्ततेसाठी पुढे येण्याचे सौजन्य दाखवतील, अशी अपेक्षा प्राणिमित्रांकडून व्यक्त केली जात आहे.

तातडीने उपचाराची गरजगजलक्ष्मीच्या शरीरावरील जखमांचे प्रमाण पाहता तिच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. कारण जखमांचा संसर्ग झाल्यास ते सर्वांच्याच दृष्टीने धोकादायक ठरू शकते. सोशल चळवळीच्या माध्यमातून देशातील विविध भागांमधील प्राणिमित्रांनी तिच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारली आहे. आता वनविभागाने तत्परता दाखविण्याची गरज आहे. कारण संबंधित व्यक्तीची लक्ष्मीवर उपचार करण्याची मानसिकता नसून तो केवळ पोटापाण्याची व्यवस्था म्हणून तिचा वापर करीत आहे. आता वनविभागाच्या कारवाईची प्रतीक्षा आहे.- गौरव क्षत्रिय, अध्यक्ष, आवास

टॅग्स :wildlifeवन्यजीवNashikनाशिकforest departmentवनविभाग