शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

.... म्हणून होतात चक्कर येऊन आकस्मात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

नाशिक- शहरात मध्यंतरी अनेकांना केवळ चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. मात्र त्यामागे वैद्यकीय कारणे असल्याचे ...

नाशिक- शहरात मध्यंतरी अनेकांना केवळ चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. मात्र त्यामागे वैद्यकीय कारणे असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी दिले आहे. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे ‘हायपॉक्सिया’ तसेच उभ्या उभ्या काम केल्यामुळे ‘हायपोटेन्शन’ यामुळे रुग्ण अकस्मात धक्का बसून जागीच कोसळू शकतो आणि त्यामुळे त्याच्या प्राणावर बेतू शकते असे मतही डॉ. कुटे यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच शहरात एकेका दिवसात नऊ तर कधी अकरा जण चक्कर येऊन मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा चक्रावली होती. कोरोना संसगामुळे गंभीर स्थिती आहे. त्यामुळे हा कोराेनाचा नवा स्टेंट आहे काय अशी शंका घेतली जात होती. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना डॉ. कुटे यांनी म्हटले आहे की, साधारणत: चाळीस वर्षे वयानंतर रक्त वाहिन्यांची लवचिकता कमी होत असते. विशेषत: बदललेली जीवनशैली तसेच अनुवंशिकता किंवा जेनेस्टीक स्ट्ररमधील बदल हे त्यासाठी कारण ठरू शकते. सामान्यपणे तीस ते पन्नास या वयोगटात रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झाल्याने गुठळी हाेऊन हृदयक्रिया बंद पडू शकते आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतात. युवावस्थेत असल्याने शरीरातील घडामोडींची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. तसेच दैनंदिन कामकाजाच्या तणावात तर ते लक्षात येत नाही. रक्तातील प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला की, हायपोक्सिया आणि सतत उभे राहून काम केल्याने हायपोटेन्शन यामुळे तरूणांना धक्का बसतो आणि ते खाली कोसळून दगावू शकतात असे कुटे यांनी म्हटले आहे.

एखाद्या व्यक्तीच्या रक्तवाहिनीत अथवा शरीराच्या ज्या अवयवात गठुळी अडकते, त्या भागाला ती हानीकारक ठरते. त्यातूनच हृदयविकाराचा झटका येतो. किंवा मेंदूत अडकल्यास पक्षघाताचा झटका देखील येऊ शकतो, असेही डॉ. कुटे यांनी नमूद केले आहे. कमी वयातील मुलांत केशवाहिन्यांचे जाळे तयार न झाल्यामुळे अकाली मृत्यू होत आहेत. कोरोना पश्चात संसर्गात सहा महिन्यांनी हे प्रमाण दिसत आहे., यावर त्यांनी चिंचा व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्त पातळ होण्यासाठीचे आवश्यक इंजेक्शन अथवा गोळ्या, त्यांच्या सल्ल्याने अथवा देखरेखीखाली घेणे अत्यंत आवश्यक आहे, असेही कुटे यांनी नमूद केले आहे.