शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:28 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत. गेल्या आठवडाभरात जिल्ह्णातील विविध भागातील ५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, चालू वर्षात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ३३ झाली आहे.

नाशिक : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत.गेल्या आठवडाभरात जिल्ह्णातील विविध भागातील ५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, चालू वर्षात आत्महत्या करणाºया शेतकयांची संख्या ३३ झाली आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी यांसारख्या संकटांनी पिचलेल्या शेतकºयांमध्ये नैराश्य वाढीस लागत असून, खरीपपूर्व मशागतीची वेळ तोंडावर आली असताना शेतकºयांना त्यांच्या समस्यांवर तोडगा मिळत नसल्याने ते स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेत असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.  दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील शेतकरी पद्माकर कारभारी आवारे (३५) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तर सिन्नर तालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण कारभारी साबळे (६८) या शेतकºयाचा मृतदेह पांगरी शिवारातील विहिरीमध्ये आढळून आला.  नांदगाव तालुक्यातही चांदोरा येथील एका शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचे वृत्त असून, जिल्हा प्रशासनाकडून याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.  याच आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे लुखा नामदेव भोर (४५) या शेतकºयाने विषप्राशन करून जीवनयात्रा संपविली. १ जानेवारी ते ६ मे २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ३३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.सन्मान यात्रेची घोषणाविशेष म्हणजे कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे खचलेल्या शेतकºयांना धीर देण्यासाठी व आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकीकडे शेतकरी सन्मान यात्रेची नाशिक शहरातून घोषणा केली असताना याच कालावधीत जिल्ह्णात जवळपास पाच शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या क्लेषदायक घटना पुढे आल्या आहेत. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या