शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

स्मार्टरोड... रस्ता नव्हे, पर्यटनस्थळ ठरेल! : प्रकाश थविल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:29 IST

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान सध्या सुरू असलेल्या पथदर्शी स्मार्ट रोडमुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असल्या तरी त्या दूर करून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकदा हा रस्ता पूर्ण झाला की तो केवळ उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आदर्श आणि रमणीय ठरणार असल्याने पर्यटनस्थळ ठरेल, असा दावा स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक : त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान सध्या सुरू असलेल्या पथदर्शी स्मार्ट रोडमुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असल्या तरी त्या दूर करून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकदा हा रस्ता पूर्ण झाला की तो केवळ उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आदर्श आणि रमणीय ठरणार असल्याने पर्यटनस्थळ ठरेल, असा दावा स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी व्यक्त केला आहे.स्मार्ट रोडचे काम रखडल्याने सध्या अत्यंत नाराजीचे वातावरण आहे. १.१ किलोमीटर रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे, परंतु एवढे करूनही संकल्पनेनुसार काम होईल किंवा नाही याविषयी शंका आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी रस्ता कधी पूर्ण होणार हे स्पष्ट सांगितले नसले तरी सध्या रस्त्याच्या कामामुळे काही घटकांना अडचणी येत असून त्या दूर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.रस्त्याच्या कामाचे नियोजन करतानाच या मार्गावरील शाळा आणि अन्य शासकीय कार्यालये यांचा विचार करण्यात आला होता. त्यामुळे सर्वप्रथम मेहेर ते सीबीएस या टप्प्याचे काम सुरू झाल्यानंतर तीन शाळांना स्टेडियम ग्राउंडच्या बाजूने रस्ता तयार करून देण्यात आला होता. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी यामुळे अशोकस्तंभ ते मेहेर या दरम्यानचा रस्ता वेळेत पूर्ण झालेला नाही, असे सांगून त्यांनी या मार्गावर अनेक अडचणी आल्याने त्यास विलंब झाल्याचे मान्य केले. परंतु उर्वरित रस्त्याचे आणि दुसऱ्या बाजूचे काम अगोदरच्या रस्त्यापेक्षा वेगाने होईल, अशी ग्वाही दिली.या रस्त्यावर फुटपाथ, सायकल ट्रॅक, स्मार्ट बस स्टॉप, लॅँड स्केपिंग आणि बसण्यासाठी बाक अशाप्रकारच्या व्यवस्था असतील, परंतु वायफायसारखी सुविधाही असेल त्यामुळे आज कठीण वाटणारा रस्ता पर्यटनस्थळ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ५१ कामांचे प्रस्ताव होते. त्यातील बहुतांशी प्रकल्प हे शहरवासीयांना सूचनांचा विचार करून तसेच निकषात बसतील अशा पद्धतीने करण्यात आले आहेत. स्मार्ट रोड हा गावठाणाला जोडणारा असला पाहिजे, या निकषात बसणारा आणि अत्यंत रहदारीचा मार्ग म्हणून त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा मार्ग निवडण्यात आला आहे, असे सांगून त्यांनी हाच रस्ता का निवडला या प्रश्नाचे उत्तर दिले.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका