शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

स्मार्टरोड... रस्ता नव्हे, पर्यटनस्थळ ठरेल! : प्रकाश थविल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:29 IST

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान सध्या सुरू असलेल्या पथदर्शी स्मार्ट रोडमुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असल्या तरी त्या दूर करून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकदा हा रस्ता पूर्ण झाला की तो केवळ उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आदर्श आणि रमणीय ठरणार असल्याने पर्यटनस्थळ ठरेल, असा दावा स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक : त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान सध्या सुरू असलेल्या पथदर्शी स्मार्ट रोडमुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असल्या तरी त्या दूर करून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकदा हा रस्ता पूर्ण झाला की तो केवळ उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आदर्श आणि रमणीय ठरणार असल्याने पर्यटनस्थळ ठरेल, असा दावा स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी व्यक्त केला आहे.स्मार्ट रोडचे काम रखडल्याने सध्या अत्यंत नाराजीचे वातावरण आहे. १.१ किलोमीटर रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे, परंतु एवढे करूनही संकल्पनेनुसार काम होईल किंवा नाही याविषयी शंका आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी रस्ता कधी पूर्ण होणार हे स्पष्ट सांगितले नसले तरी सध्या रस्त्याच्या कामामुळे काही घटकांना अडचणी येत असून त्या दूर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.रस्त्याच्या कामाचे नियोजन करतानाच या मार्गावरील शाळा आणि अन्य शासकीय कार्यालये यांचा विचार करण्यात आला होता. त्यामुळे सर्वप्रथम मेहेर ते सीबीएस या टप्प्याचे काम सुरू झाल्यानंतर तीन शाळांना स्टेडियम ग्राउंडच्या बाजूने रस्ता तयार करून देण्यात आला होता. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी यामुळे अशोकस्तंभ ते मेहेर या दरम्यानचा रस्ता वेळेत पूर्ण झालेला नाही, असे सांगून त्यांनी या मार्गावर अनेक अडचणी आल्याने त्यास विलंब झाल्याचे मान्य केले. परंतु उर्वरित रस्त्याचे आणि दुसऱ्या बाजूचे काम अगोदरच्या रस्त्यापेक्षा वेगाने होईल, अशी ग्वाही दिली.या रस्त्यावर फुटपाथ, सायकल ट्रॅक, स्मार्ट बस स्टॉप, लॅँड स्केपिंग आणि बसण्यासाठी बाक अशाप्रकारच्या व्यवस्था असतील, परंतु वायफायसारखी सुविधाही असेल त्यामुळे आज कठीण वाटणारा रस्ता पर्यटनस्थळ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ५१ कामांचे प्रस्ताव होते. त्यातील बहुतांशी प्रकल्प हे शहरवासीयांना सूचनांचा विचार करून तसेच निकषात बसतील अशा पद्धतीने करण्यात आले आहेत. स्मार्ट रोड हा गावठाणाला जोडणारा असला पाहिजे, या निकषात बसणारा आणि अत्यंत रहदारीचा मार्ग म्हणून त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा मार्ग निवडण्यात आला आहे, असे सांगून त्यांनी हाच रस्ता का निवडला या प्रश्नाचे उत्तर दिले.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका