शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

जानोरी गावात स्मार्ट वाटर मॅनेजमेंट योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 16:00 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात जलजीवन मिशन अंतर्गत स्मार्ट मॅनेजमेंट योजना राबवण्यात आली असून टाटा कंपनीने महाराष्ट्रात एकमेव जानोरी गावाची निवड करून स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट योजना गावात राबविण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलजीवन मिशन अंतर्गत उपक्रम : महाराष्ट्रात एकमेव जानोरी गावाची निवड

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात जलजीवन मिशन अंतर्गत स्मार्ट मॅनेजमेंट योजना राबवण्यात आली असून टाटा कंपनीने महाराष्ट्रात एकमेव जानोरी गावाची निवड करून स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट योजना गावात राबविण्यात आली आहे.सुरवातीला टाटा व सह्याद्री कंपनी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानोरी ग्रामपंचायत या चारी संस्था मिळून गावाची पहाणी करून जानोरीत ही योजना यशस्वी करण्यासाठी गावातील पाणीपुरवठ्याची प्रत्येक गल्लीतील व प्रत्येक वस्तीवरील पाणीपुरवठा पाईप लाईनची माहिती घेऊन प्रत्येक पाणीपुरवठ्याच्या मेन पाईप लाईनला सेन्सर व मीटर बसवण्यात आले आहे. प्रत्येक वस्तीतील पाच ते सहा घरातील नळ पाणीपुरवठ्याच्या पाईप लाईनला मीटर बसवण्यात आले आहे. तसेच सर्व मीटरला सेंसर बसवल्यामुळे या मीटर मधून दररोज किती स्पीडने पाणी जाते व दररोज किती पाणी वाया जाते. तसेच गावात किती शुद्ध पाणी पुरवठा होतो. कोणत्या विभागात पाणी कमी जाते. कोणत्या विभागात पाणीपुरवठा ची पाईपलाईन लीक आहे. तसेच एका कुटुंबाला दररोजचा किती पाणी पुरवठा होतो. हे सर्व जानोरी ग्रामपंचायत कार्यालयात स्क्रीनवर दिसणार तसेच मोबाईलवर मेसेज येणार त्यामुळे जानोरी गावचा पाणीपुरवठा सुरळीत चालू आहे का नाही? हे पण समजणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जानोरी ग्रामपंचायत गावासाठी दररोज किती पाणी घेते व ते पाणी किती शुद्ध आहे. गावाला तेवढे पाणी जाते का नाही? ? हे पण या मीटरद्वारे व सेन्सरमुळे समजणार आहे. त्यामुळे गावाची पाण्याची बचत पण होणार आहे. ही योजना जानोरी गावात यशस्वी झाली तर महाराष्ट्रत नव्हे तर, पूर्ण भारतात टाटा कपंनी ही योजना राबविणार आहे.ही योजना यशस्वी करण्यासाठी टाटा कंपनीचे प्रणय सिन्हा, विश्वजीत दत्ता, गिरीश बी. टी, शाशंक रेड्डी, व्यंकटेश आर्वे, सह्याद्री कंपनीचे संचालक विलास शिंदे, सुरेश नखाते, तेजस पिंगळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता महुआ बॅनर्जी, टाटा कंपनीचे मॅनेजर संदीप शिंदे, मनीष सिंग, जानोरी सरपंच संगीताताई सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ, विष्णुपंत काठे, दत्तात्रय घुमरे, अशोक केंग, ग्रामसेवक केके पवार, पाणीपुरवठा कर्मचारी सुनील बोस, योगेश रोंगटे आधी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे.प्रत्येक घरी स्वच्छ आणि योग्य प्रमाणात पाणी पोहोचवीणे तसेच लोकांची पाण्यासाठीची वणं वण थांबावी या साठी केंद्रसरकरच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पायलट प्रोजेक्ट युनिट जानोरी येथें कार्यान्वित करण्यात आले, या प्रकल्पामुळे प्रत्येक घरात किती पाणी येते व त्याची शुद्धता किती हे एका क्लिकवर समजणार आहे. या साठी टाटा उद्योग समूहाने पायलट प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे.- विलास शिंदे, संचालकसंचालक, सह्याद्री कंपनी.महाराष्ट्रत नाशिक जिल्ह्यात एकमेव जानोरी गाव हे अतिशय सुंदर आहे. जानोरी ग्रामपंचायत ने गावासाठी प्रत्येक योजना यशस्वी करून दाखवली आहे. गावात जल जीवन मिशन अंतर्गत स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट योजना राबवण्यासाठी अतिशय आनंद झाला आहे. योजना करण्यासाठी गावकऱ्यांनी अतिशय मदत केली आहे. त्यामुळे या गावचे नाव कधीच विसरणार नाही.- प्रणय सिन्हा, कन्सल्टंट टाटा कपंनी. 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणRural Developmentग्रामीण विकास