शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

उधळले ‘स्मार्ट सिटी’चे सादरीकरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:44 IST

केंद्र आणि राज्य सरकारची नाशिककरांसाठी असलेली स्मार्ट सिटीची योजना वीस लाख नागरिकांची असताना प्रत्यक्षात मात्र आयुक्त तुकाराम मुंढे आणि मुख्य कार्यकारी प्रकाश थवील यांचीच ती कंपनी झाली आहे. कोणतेही निर्णय परस्पर घेतले जातात, संचालकांना अंधारात ठेवले जाते तसेच लोकप्रतिनिधींना संचालक म्हणून घेऊन कंपनीत घेऊनही विश्वासात घेतले जात नाही, नेहरू उद्यानासारखे प्रकल्प अर्धवट असतानाच त्याचे लोकार्पण परस्पर आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन केले जात नसेल तर काय उपयोग? असा थेट प्रश्न करीत महापौर रंजना भानसी यांच्यासह दिनकर पाटील, शाहू खैर यांनी संताप व्यक्त केला. मुंढे यांची हुकूमशाही आणि हिटलरशाही चालू दिली जाणार नाही आणि संचालकांना विश्वासात न घेताच काम करीत असेल तर बऱ्या वाईट निर्णयांना मुंढे-थवील हेच जबाबदार राहतील असे सांगत ‘स्मार्ट सिटी’ कंपनीचे सादरीकरणच गुंडाळले.

ठळक मुद्देसंचालकांचा संताप : ...ही मुंढे-थविलांची लिमिटेड कंपनी, महापौरांसह नगरसेवकांनी डागली तोफ

नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारची नाशिककरांसाठी असलेली स्मार्ट सिटीची योजना वीस लाख नागरिकांची असताना प्रत्यक्षात मात्र आयुक्त तुकाराम मुंढे आणि मुख्य कार्यकारी प्रकाश थवील यांचीच ती कंपनी झाली आहे. कोणतेही निर्णय परस्पर घेतले जातात, संचालकांना अंधारात ठेवले जाते तसेच लोकप्रतिनिधींना संचालक म्हणून घेऊन कंपनीत घेऊनही विश्वासात घेतले जात नाही, नेहरू उद्यानासारखे प्रकल्प अर्धवट असतानाच त्याचे लोकार्पण परस्पर आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन केले जात नसेल तर काय उपयोग? असा थेट प्रश्न करीत महापौर रंजना भानसी यांच्यासह दिनकर पाटील, शाहू खैर यांनी संताप व्यक्त केला. मुंढे यांची हुकूमशाही आणि हिटलरशाही चालू दिली जाणार नाही आणि संचालकांना विश्वासात न घेताच काम करीत असेल तर बऱ्या वाईट निर्णयांना मुंढे-थवील हेच जबाबदार राहतील असे सांगत ‘स्मार्ट सिटी’ कंपनीचे सादरीकरणच गुंडाळले.दरम्यान, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या आत्तापर्यंत दहा बैठका झाल्या असून, सर्व बैठकीत हजर संचालकांच्या मंजुरीनेच कामे होत असल्याचे सांगितले तसेच संचालकांच्या मतभेदामुळेच नेहरू उद्यानाचे लोकार्पण होऊ न शकल्याचा दावा केला. त्यामुळे उपस्थित संचालकांनी त्याचा निषेध केला.नाशिक शहराचा स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश झाल्यानंतर स्थापन झालेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गोदा प्रोजेक्ट आणि एबीडी म्हणजे गावठाण विकास प्रकल्पाची माहिती देण्यासाठी पंचवटीतील पं. पलुस्कर सभागृहात शनिवारी (दि.१७) नगरसेवक आणि नागरिकांची बैठक बोलविली होती. यावेळी हा प्रकार घडला. आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्या संघर्षात गेल्या बुधवारी (दि.१४) नेहरू जयंतीच्या दिवशी नेहरू उद्यान आयुक्तांनी परस्पर खुले केल्याच्या प्रकरणाची भर पडली. त्याचे पडसाद शनिवारी (दि.१७) स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यक्रमात उमटले. आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे यांच्यासह काही नगरसेवकांनी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमास हजेरी लावली.प्रकल्पाच्या शंका समाधानाच्या वेळीच स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक असलेल्या महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाला धारेवर धरले. स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांना नेहरू उद्यानात असलेल्या पाच पुतळ्यांची नावे सांगता येत नाही आणि अर्धवट असलेल्या अशा उद्यानाचे परस्पर लोकार्पण करण्याचे कारण काय, वास्तविक कंपनीने आदल्या दिवशी लोकार्पणाचा प्रस्ताव आणल्यानंतर सर्व नगरसेवकांना आणि नागरिकांना बोलवून नंतर लोकार्पण करू, असे सांगितले होते. शेवटी त्या प्रभागाचे नगरसेवक, आमदार आणि अन्य सर्व नगरसेवकांना मान देऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत त्याचे लोकार्पण करणे आवश्यक होते.स्मार्ट सीटी कंपनी मुंढे यांना आंदण दिली काय?सभागृह नेते दिनकर पाटील यांनी स्मार्ट सिटी कंपनी मुंडे-थवील यांना आंदण दिली आहे काय? असा प्रश्न केला. कालिदास कलांमदिराप्रमाणेच नेहरू उद्यानाचे परस्पर लोकार्पण केले. लोकशाही आहे की नाही, महापालिकेत असा प्रश्न करून मखमलाबाद येथे सातशे एकरावर नगरविकासाचे आरक्षण टाकून शेतकºयांना अडचणीत आणले आणि आता दोन लाख ७० हजार घरे अतिक्रमित ठेवून शहर उद््ध्वस्त करण्याचे काम चालू आहे. मखमलाबाद येथील प्रकल्पासंदर्भात तर अहमदाबाद दौरा केला जाणार असून, त्यासाठी कंपनीचे अधिकारी तवली यांनी येणार असेल तर कळवा, असे पत्र संचालकांना दिले असे सांगत संताप व्यक्त केला, तर शाहू खैरे यांनी स्मार्ट सिटी आणि महापालिकेत लोकप्रतिनिधींचा वेळोवेळी अपमान केला जात असल्याने स्मार्ट सिटी कंपनी नसली तरी चालेला असा पवित्रा शाहू खैरे यांनी घेतला. तर अनेक प्रश्न विचारणाºया जगदीश पाटील यांनी नगरसेवकांनी सूचना देऊन त्याची दखल प्रशासन घेणार नसेल तर आम्ही काय ‘मम’ म्हणायला आहोत का? असा प्रश्न केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी