शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्तीची गरज : खैरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:18 IST

गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्ही म्हणजेच कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरू लागला आहे. मध्यंतरी संचालकांनीच बैठकीवर बहिष्कार घातला. आता याच कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. याचसंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...

ठळक मुद्देसारेच वादग्रस्त, एकही प्रकल्प निर्दोष नाही

गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्ही म्हणजेच कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरू लागला आहे. मध्यंतरी संचालकांनीच बैठकीवर बहिष्कार घातला. आता याच कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. याचसंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने महापालिकेला पर्यायी यंत्रणा उभी केली असली तरी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होण्याऐवजी वादच उभे राहात आहेत. ज्या नाशिक शहरासाठी ही कंपनी उभी राहिली ती जर योग्य पद्धतीने काम करीत नसेल आणि लोकप्रतिनिधीदेखील अंधारात असतील तर कंपनीचा काय उपयोग? असा प्रश्न करीत महापालिकेतील कॉँग्रेसचे गटनेते आणि स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे.प्रश्न : स्मार्ट सिटी कंपनी महापालिकेने स्थापन केली असताना ती बरखास्त करावी ही टोकाची भूमिका घेण्याचे कारण काय?खैरे : महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनी स्थापन केल्यानंतर खरे तर सर्वच कामे वेगाने होण्याची गरज होती. परंतु कंपनीचा कारभार अत्यंत वादग्रस्त आहे. कंपनीच्या मार्फत शहरात जेवढी कामे घेण्यात आली त्यातील एक काम धड नाही. महाकवी कालिदास कलामंदिर असो अथवा कलादालन असो स्मार्ट रोडचे रेंगाळालेले काम आणि त्यातील उणिवा या सर्व बघतच आहात. आता त्या स्मार्ट पार्किंगचा नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेला याबाबत माहिती नाही की नागरिकांना संचालक अंधारात असतात. शेवटी हे सर्व शहरासाठी असेल तर कोट्यवधी रुपये खर्च करून कामे योग्य पद्धतीने होत नसेल तर काय करणार?गावठाणचा विकास रखडलास्मार्ट सिटी कंपनीच्या आराखड्यात गावठाणचा समावेश करण्यात आला आहे. यात सर्व गावठाणाचा संबंध नाहीच, परंतु आज एक छोटी पाइपलाइन टाकण्याचे काम करायचे असेल तर स्मार्ट सिटीतून होणार असे सांगून कोणत्याही प्रकारची कामे केली जात नाही. गावठाणात मूलभूत सुविधांची कामेच ठप्प झाली आहेत.कंपनीच्या प्रशासकीय आणि आर्थिक विषयात मनमानी सुरू आहे. एका अधिकाऱ्याला दुप्पट पगार करण्यात आला आहे. सरकारात किंवा कोणत्याही कंपनीत इतक्या वेगाने इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही पगारवाढ झालेली नाही. अकौंटंट हा कंपनीत बसून काम करत असताना त्याला वाहन भत्ता लागू करण्यात आला. ११ महिन्यांच्या कराराने भरलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक तीन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीcongressकाँग्रेस