शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

छोटे पक्ष, संघटनांची करावी लागते मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:25 IST

या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्या विरोधात भूमिका घेतली, परंतु मते कोणाला द्यायची

ठळक मुद्देभाव वधारला : लहान-सहान गोष्टींवरून राजी-नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी दोन किंवा तीन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार असली तरी, स्वत:ला पुरोगामी वा प्रतिगामी म्हणवून घेणाऱ्या अनेक लहान-सहान राजकीय पक्ष व संघटनांनादेखील या निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्व प्राप्त झाले असून, निवडणूक तोंडावर असल्यामुळे असे पक्ष व संघटनांची समविचारी पक्षाला मनधरणी करावी लागत आहे. मेळावे, बैठकांना निमंत्रण देण्यापासून ते व्यासपीठावर मानाचे स्थान दिले नसल्याच्या निमित्ताने राजी-नाराजीला तोंड फुटत असल्याने मोठ्या पक्षांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्या विरोधात भूमिका घेतली, परंतु मते कोणाला द्यायची याबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी, त्यातूनच एकप्रकारे सेना-भाजपा वगळून कॉँग्रेस आघाडीला मतदान करा, असा संदेश अप्रत्यक्ष देण्यात आला आहे. या मोठ्या पक्षांबरोबरच जिल्ह्यात अनेक लहान-सहान राजकीय पक्ष व त्यांना संलग्न संघटना आहेत. एरव्ही या पक्षांचे उपक्रम त्यांच्यापुरता मर्यादित असले तरी, निवडणुकीच्या निमित्ताने मात्र त्यांनी स्वत:च स्वत:चे महत्त्व तयार करून घेण्यास सुरुवात केली असून, प्रसिद्धीमाध्यमांकडे जाऊन किंवा संबंधित राजकीय पक्षांकडे जाऊन स्वत:हून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवित आहेत. त्यामागे निव्वळ ‘विश्वासात’ घेतले जावे एवढी अपेक्षा ठेवण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात राजकीय पक्षांनी मेळावे, बैठका बोलविताना राजकीय पक्ष, संघटनेचे नावे निमंत्रण द्यावे, फलकावर नेत्याचे छायाचित्र, मान्यवरांच्या यादीत नावे, व्यासपीठावर मानाचे पान, उपस्थिताना मार्गदर्शन करण्याची संधी दिली जावी, अशी भरमसाठ अपेक्षा ठेवली जात आहे. प्रचारासाठी साहित्य, वाहन, त्यासाठी येणारा खर्च व कार्यकर्त्यांचे खाणपानाची व्यवस्था भागविण्यासाठी उमेदवार व त्यांच्या राजकीय पक्षांकडे गळ घालण्यास सुरुवात झाली आहे. मुळातच यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, त्यासाठी प्रत्येक घटक, संघटनांच्या सहकार्याची गरज उमेदवारांना आहे, अशा वेळी त्यांना नाराज करणे परवडेनासे असले तरी, त्यांची राजी-नाराजी राखण्यातच दमछाक होऊ लागली आहे. अजून निवडणुकीला वेळ असली तरी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांचा भाव वधारण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक