शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

छोटे पक्ष, संघटनांची करावी लागते मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:25 IST

या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्या विरोधात भूमिका घेतली, परंतु मते कोणाला द्यायची

ठळक मुद्देभाव वधारला : लहान-सहान गोष्टींवरून राजी-नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी दोन किंवा तीन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार असली तरी, स्वत:ला पुरोगामी वा प्रतिगामी म्हणवून घेणाऱ्या अनेक लहान-सहान राजकीय पक्ष व संघटनांनादेखील या निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्व प्राप्त झाले असून, निवडणूक तोंडावर असल्यामुळे असे पक्ष व संघटनांची समविचारी पक्षाला मनधरणी करावी लागत आहे. मेळावे, बैठकांना निमंत्रण देण्यापासून ते व्यासपीठावर मानाचे स्थान दिले नसल्याच्या निमित्ताने राजी-नाराजीला तोंड फुटत असल्याने मोठ्या पक्षांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्या विरोधात भूमिका घेतली, परंतु मते कोणाला द्यायची याबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी, त्यातूनच एकप्रकारे सेना-भाजपा वगळून कॉँग्रेस आघाडीला मतदान करा, असा संदेश अप्रत्यक्ष देण्यात आला आहे. या मोठ्या पक्षांबरोबरच जिल्ह्यात अनेक लहान-सहान राजकीय पक्ष व त्यांना संलग्न संघटना आहेत. एरव्ही या पक्षांचे उपक्रम त्यांच्यापुरता मर्यादित असले तरी, निवडणुकीच्या निमित्ताने मात्र त्यांनी स्वत:च स्वत:चे महत्त्व तयार करून घेण्यास सुरुवात केली असून, प्रसिद्धीमाध्यमांकडे जाऊन किंवा संबंधित राजकीय पक्षांकडे जाऊन स्वत:हून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवित आहेत. त्यामागे निव्वळ ‘विश्वासात’ घेतले जावे एवढी अपेक्षा ठेवण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात राजकीय पक्षांनी मेळावे, बैठका बोलविताना राजकीय पक्ष, संघटनेचे नावे निमंत्रण द्यावे, फलकावर नेत्याचे छायाचित्र, मान्यवरांच्या यादीत नावे, व्यासपीठावर मानाचे पान, उपस्थिताना मार्गदर्शन करण्याची संधी दिली जावी, अशी भरमसाठ अपेक्षा ठेवली जात आहे. प्रचारासाठी साहित्य, वाहन, त्यासाठी येणारा खर्च व कार्यकर्त्यांचे खाणपानाची व्यवस्था भागविण्यासाठी उमेदवार व त्यांच्या राजकीय पक्षांकडे गळ घालण्यास सुरुवात झाली आहे. मुळातच यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, त्यासाठी प्रत्येक घटक, संघटनांच्या सहकार्याची गरज उमेदवारांना आहे, अशा वेळी त्यांना नाराज करणे परवडेनासे असले तरी, त्यांची राजी-नाराजी राखण्यातच दमछाक होऊ लागली आहे. अजून निवडणुकीला वेळ असली तरी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांचा भाव वधारण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक