शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

लघुउद्योजकांना शंका

By admin | Updated: January 10, 2017 01:20 IST

कर्जात वाढ : पंतप्रधानांची घोषणा बॅँकेच्या मानसिकतेत बदलाची गरज

 गोकूळ सोनवणे सातपूरकेंद्रसरकार असो वा राज्य सरकार उद्योगांसाठी विविध योजनांची घोषणा करतात. प्रत्यक्षात या योजनांची कितपत अंमलबाजावणी होते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक कोटी ऐवजी दोन कोटी रु पयांचे विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी चांगली घोषणा केली आहे. उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय लाभदायी घोषणा असली तरी या घोषणेप्रमाणे बँका लगेच कर्ज उपलब्ध करून देतील, असे उद्योजकांना वाटत नाही. बँकांच्या काटेकोर अंमलबजावणीवर केंद्र सरकारने लक्ष दिल्यास पंतप्रधानांची घोषणा खऱ्या अर्थाने उद्योजकांसाठी लाभदायी ठरणार आहे.जागतिक मंदीच्या सावटाखाली असलेल्या उद्योजकांना केंद्र अथवा राज्य सरकारने काहीतरी सवलती अथवा योजना जाहीर कराव्यात अशी गेल्या दोन तीन वर्षांपासूनची अपेक्षा आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने उद्योग क्षेत्र अडचणीत सापडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रांसाठी विविध लाभदायी योजनांची घोषणा केली आहे. त्यात लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी व त्यांना चालना मिळावी म्हणून एक कोटी रु पयांऐवजी दोन कोटी रु पयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. घोषणा लघु आणि माध्यम उद्योगांसाठी निश्चितच लाभदायी ठरणार आहे. या घोषणेची प्रभावी अंमलबजावणी केल्यास लघु उद्योगांना नक्कीच चालना मिळणार आहे.आतापर्यंत लघु आणि मध्यम उद्योगांना बँकांकडून एक कोटी रु पयांचे कर्ज मिळत आहे. मात्र हे कर्ज सहजासहजी उपलब्ध होत नाही. बँकांकडून उद्योजकांची अडवणूक केली जाते. खूप चकरा माराव्या लागतात. कधी कधी एजंट (दलाल) मार्फत काम करून घावे लागते, अशी उद्योजकांची तक्र ार आहे. पंतप्रधानांनी उद्योगांना चालना देण्यासाठी चांगली घोषणा केली असली तरी बँका किती सहकार्य करतात. यावर या घोषणेचे फलित अवलंबून आहे, अशा भावना लघु उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.