शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

लघुउद्योजकांना शंका

By admin | Updated: January 10, 2017 01:20 IST

कर्जात वाढ : पंतप्रधानांची घोषणा बॅँकेच्या मानसिकतेत बदलाची गरज

 गोकूळ सोनवणे सातपूरकेंद्रसरकार असो वा राज्य सरकार उद्योगांसाठी विविध योजनांची घोषणा करतात. प्रत्यक्षात या योजनांची कितपत अंमलबाजावणी होते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक कोटी ऐवजी दोन कोटी रु पयांचे विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी चांगली घोषणा केली आहे. उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय लाभदायी घोषणा असली तरी या घोषणेप्रमाणे बँका लगेच कर्ज उपलब्ध करून देतील, असे उद्योजकांना वाटत नाही. बँकांच्या काटेकोर अंमलबजावणीवर केंद्र सरकारने लक्ष दिल्यास पंतप्रधानांची घोषणा खऱ्या अर्थाने उद्योजकांसाठी लाभदायी ठरणार आहे.जागतिक मंदीच्या सावटाखाली असलेल्या उद्योजकांना केंद्र अथवा राज्य सरकारने काहीतरी सवलती अथवा योजना जाहीर कराव्यात अशी गेल्या दोन तीन वर्षांपासूनची अपेक्षा आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने उद्योग क्षेत्र अडचणीत सापडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रांसाठी विविध लाभदायी योजनांची घोषणा केली आहे. त्यात लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी व त्यांना चालना मिळावी म्हणून एक कोटी रु पयांऐवजी दोन कोटी रु पयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. घोषणा लघु आणि माध्यम उद्योगांसाठी निश्चितच लाभदायी ठरणार आहे. या घोषणेची प्रभावी अंमलबजावणी केल्यास लघु उद्योगांना नक्कीच चालना मिळणार आहे.आतापर्यंत लघु आणि मध्यम उद्योगांना बँकांकडून एक कोटी रु पयांचे कर्ज मिळत आहे. मात्र हे कर्ज सहजासहजी उपलब्ध होत नाही. बँकांकडून उद्योजकांची अडवणूक केली जाते. खूप चकरा माराव्या लागतात. कधी कधी एजंट (दलाल) मार्फत काम करून घावे लागते, अशी उद्योजकांची तक्र ार आहे. पंतप्रधानांनी उद्योगांना चालना देण्यासाठी चांगली घोषणा केली असली तरी बँका किती सहकार्य करतात. यावर या घोषणेचे फलित अवलंबून आहे, अशा भावना लघु उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.