शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी नदीवरील छोटा पूल ठरतोय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:24 IST

निफाड येथील वडाळी नदीवरील जुन्या पुलाच्या जागी नवीन उंच पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर जुना छोटा पूल वडाळी नदीवर असून, या पुलावरून रानवड, नांदुर्डी या गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. शिवाय निफाड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी नांदुर्डी रोड भागात आहेत.

निफाड येथील वडाळी नदीवरील जुन्या पुलाच्या जागी नवीन उंच पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर जुना छोटा पूल वडाळी नदीवर असून, या पुलावरून रानवड, नांदुर्डी या गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. शिवाय निफाड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी नांदुर्डी रोड भागात आहेत. सदर शेतकºयाची ये-जा या पुलावरून होत असते पूर्वी जेव्हा रानवड साखर कारखाना चालू होता तेव्हा याच पुलावरून उसाच्या ट्रक, बैलगाड्या यांची ये-जा मोठ्या संख्येने रानवड येथे चालू असायची. कारण याच पुलावरून निफाड येथून रानवडला जायला जवळचा मार्ग आहे. वडाळी नदीच्या पलीकडे नांदुर्डी रोड भागात राहणाºया शेतकºयांची मुले शाळेसाठी निफाड शहरात याच पुलावरून ये-जा करीत असतात. मात्र पावसाळ्यात विद्यार्थ्यांना या जुन्या पुलावरून प्रवास करणे जोखमीचे ठरते. मात्र या पुलाला मोठे खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय या पुलाच्या खाली नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या मोºयांमध्ये गाळ साचलेला आहे. या नदीला साधारण पूर आल्यास मोºया तुंबून सदर पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने रस्ता बंद होतो. त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद होते. वडाळी नदीपलीकडे राहणाºया शेतकºयांना निफाड शहरात येणे अवघड होऊन जाते. जर महापूर आला तर हा पूल पुरामुळे दिसेनासा होतो. त्यामुळे तात्पुरती गरज म्हणून सध्या हा पूल ये - जा करण्यासाठी उपयोगाचा आहे मात्र पूर आल्यानंतर या पुलावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे याच पुलाच्या ठिकाणी मोठा आणि उंच पूल बांधल्यास नागरिकांची कायमस्वरूपी सोय होईल. तसेच पुराच्या काळातही या नवीन पुलावरून वाहतूक चालू राहील व जनजीवन ठप्प होणार नाही. त्यामुळे मोठ्या पुलाची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक