शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भूमिगत वीजतारा कामाची संथ कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:56 IST

सिडकोच नव्हे तर शहरातील महावितरणच्या वीजतारा भूमिगत करण्याची जबाबदारी असतानादेखील अनेक वर्षांपासून ही कार्यवाही थंड बस्त्यात आहे. विशेष म्हणजे सिडकोसह अनेक भागांत दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने यापूर्वी नगरसेवकांच्या आग्रहाखातर सिडकोत स्वखर्चाने तारा भूमिगत केल्या आहेत.

नाशिक : सिडकोच नव्हे तर शहरातील महावितरणच्या वीजतारा भूमिगत करण्याची जबाबदारी असतानादेखील अनेक वर्षांपासून ही कार्यवाही थंड बस्त्यात आहे. विशेष म्हणजे सिडकोसह अनेक भागांत दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने यापूर्वी नगरसेवकांच्या आग्रहाखातर सिडकोत स्वखर्चाने तारा भूमिगत केल्या आहेत. मात्र त्यानंतरदेखील महावितरणची कार्यवाही संथ सुरू आहे.शहरी भागात वीजतारा भूमिगत असल्या पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कायदाच केला आहे. काही वर्षांपूर्वी विजेच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठंी महावितरणने ठेका दिला होता. परंतु हे काम संबंधित ठेकेदाराने अर्थवट केले होते, परंतु त्यानंतरदेखील संपूर्ण शहरात वीजतारा भूमिगत झाल्या नाहीत. त्यानंतर आणखी आता काही ठेकेदारांना कामे देण्यात आली आहेत. सिडकोत तर ज्या ठिकाणी रविवारी (दि.२५) दुर्घटना घडली त्या भागातील काम पुण्यातील एका ठेकेदाराला देण्यात आल आहे. त्या ठेकेदाराने तीन वर्षांपासून ठेका घेऊनदेखील काम केले नाही, असा आरोप आहे. दुर्घटनेनंतर हाच रोष बाहेर पडला.महावितरणची जबाबदारी असतानाही कामे केली जात नाहीत आणि ठेकेदार वेळेत काम पूर्ण करीत नसल्याने अनेकदा महापालिकेला यासाठी खर्च करावा लागला आहे. विशेषत: सिडकोत अशाप्रकारची कामे केवळ नगरसेवकांच्या आग्रहाखातर करण्यात आली असून, ती कामे करताना करताना वीज केबल महावितरणची असल्याने काम योग्य पद्धतीने करण्यासाठी त्यांच्या अभियंत्यांना सुपरव्हीजन चार्जेस देऊन करण्यात आली आहेत. यासंदर्भात यापूर्वी महापालिकेच्या महासभांमध्ये वेळोवेळी चर्चा झडल्या आहेत आणि महापालिकेची जबाबदारी नसताना महावितरणची कामे का करावी याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानंतर आता महापालिकेने केलेल्या अनेक कामांत सुपरव्हीजन चार्जेस देणे बंद करण्यात आले आहेत.दुर्लक्ष : अतिक्रमणाला जबाबदारमहावितरणने लाइन टाकल्यानंतर त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ देऊ नये ही महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु तसे होत नाही. विशेषत: सिडको भागात अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होते, असे कंपनीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.महावितरणला आठ ते नऊ वर्षांपूर्वी एकात्मिक वीज सुधार अंतर्गत कोट्यवधी रुपयांचानिधी मिळाला होता. मात्र तेव्हापासून शहराचे संपूर्ण वीजतारा भूमिगत करण्याचे कामकधीच पूर्ण झालेले नाही आणि दुसरीकडे सिडकोत दुर्घटना घडत असल्याने आणखी किती जणांचे वीज धक्क्याने बळी जाणार? असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक