शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत वीजतारा कामाची संथ कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:56 IST

सिडकोच नव्हे तर शहरातील महावितरणच्या वीजतारा भूमिगत करण्याची जबाबदारी असतानादेखील अनेक वर्षांपासून ही कार्यवाही थंड बस्त्यात आहे. विशेष म्हणजे सिडकोसह अनेक भागांत दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने यापूर्वी नगरसेवकांच्या आग्रहाखातर सिडकोत स्वखर्चाने तारा भूमिगत केल्या आहेत.

नाशिक : सिडकोच नव्हे तर शहरातील महावितरणच्या वीजतारा भूमिगत करण्याची जबाबदारी असतानादेखील अनेक वर्षांपासून ही कार्यवाही थंड बस्त्यात आहे. विशेष म्हणजे सिडकोसह अनेक भागांत दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने यापूर्वी नगरसेवकांच्या आग्रहाखातर सिडकोत स्वखर्चाने तारा भूमिगत केल्या आहेत. मात्र त्यानंतरदेखील महावितरणची कार्यवाही संथ सुरू आहे.शहरी भागात वीजतारा भूमिगत असल्या पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कायदाच केला आहे. काही वर्षांपूर्वी विजेच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठंी महावितरणने ठेका दिला होता. परंतु हे काम संबंधित ठेकेदाराने अर्थवट केले होते, परंतु त्यानंतरदेखील संपूर्ण शहरात वीजतारा भूमिगत झाल्या नाहीत. त्यानंतर आणखी आता काही ठेकेदारांना कामे देण्यात आली आहेत. सिडकोत तर ज्या ठिकाणी रविवारी (दि.२५) दुर्घटना घडली त्या भागातील काम पुण्यातील एका ठेकेदाराला देण्यात आल आहे. त्या ठेकेदाराने तीन वर्षांपासून ठेका घेऊनदेखील काम केले नाही, असा आरोप आहे. दुर्घटनेनंतर हाच रोष बाहेर पडला.महावितरणची जबाबदारी असतानाही कामे केली जात नाहीत आणि ठेकेदार वेळेत काम पूर्ण करीत नसल्याने अनेकदा महापालिकेला यासाठी खर्च करावा लागला आहे. विशेषत: सिडकोत अशाप्रकारची कामे केवळ नगरसेवकांच्या आग्रहाखातर करण्यात आली असून, ती कामे करताना करताना वीज केबल महावितरणची असल्याने काम योग्य पद्धतीने करण्यासाठी त्यांच्या अभियंत्यांना सुपरव्हीजन चार्जेस देऊन करण्यात आली आहेत. यासंदर्भात यापूर्वी महापालिकेच्या महासभांमध्ये वेळोवेळी चर्चा झडल्या आहेत आणि महापालिकेची जबाबदारी नसताना महावितरणची कामे का करावी याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानंतर आता महापालिकेने केलेल्या अनेक कामांत सुपरव्हीजन चार्जेस देणे बंद करण्यात आले आहेत.दुर्लक्ष : अतिक्रमणाला जबाबदारमहावितरणने लाइन टाकल्यानंतर त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ देऊ नये ही महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु तसे होत नाही. विशेषत: सिडको भागात अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होते, असे कंपनीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.महावितरणला आठ ते नऊ वर्षांपूर्वी एकात्मिक वीज सुधार अंतर्गत कोट्यवधी रुपयांचानिधी मिळाला होता. मात्र तेव्हापासून शहराचे संपूर्ण वीजतारा भूमिगत करण्याचे कामकधीच पूर्ण झालेले नाही आणि दुसरीकडे सिडकोत दुर्घटना घडत असल्याने आणखी किती जणांचे वीज धक्क्याने बळी जाणार? असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक