शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पीड’पोस्टची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:13 IST

सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी अद्यापही प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नसल्याने रेल्वे गाड्या आणि बसेस बंद आहेत. त्याचा फटका टपाल खात्यालादेखील बसत असून, बसेस आणि रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या टपाल वाहतुकीला ब्रेक लागला आहे. विशेषत: स्पीडपोस्ट वितरणाची गती मंदावली असून, आठ ते दहा दिवसांच्या विलंबाने टपाल पोहोचत आहे.

ठळक मुद्देवाहतूक निर्बंधाचा फटका : बसेस, रेल्वे बंदमुळे टपालास विलंब

नाशिक : सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी अद्यापही प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नसल्याने रेल्वे गाड्या आणि बसेस बंद आहेत. त्याचा फटका टपाल खात्यालादेखील बसत असून, बसेस आणि रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या टपाल वाहतुकीला ब्रेक लागला आहे. विशेषत: स्पीडपोस्ट वितरणाची गती मंदावली असून, आठ ते दहा दिवसांच्या विलंबाने टपाल पोहोचत आहे.अनलॉकच्या प्रक्रियेनंतर अनेक उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहे. अनेक आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. टपाल कार्यालयातदेखील पूर्णक्षमतेने कर्मचारी कामकाज करीत असून, टपाल खात्याच्या सर्व सेवा सुरुळीत आहेत. परंतु रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून होणारी टपालाची वाहतूक खोळंबल्यामुळे बटवड्यावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते. टपाल विभागाचे कामकाज सुरू असल्याने नियमित टपाल, स्पीड पोस्ट तसेच रजिस्टर्स टपाल पेटीत टाकले जात आहेत. एका शहरातून दुसºया शहरात तत्काळ टपाल पोहचावे म्हणून नागरिक स्पीड पोस्ट योजनेच्या माध्यमातून टपाल पाठविण्याला प्राधान्य देतात. परंतु वाहतुकीवरील निर्बंधामुळे स्पीड पोस्टची गती मंदावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांतून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्पीड पोस्ट येते. नाशिक जिल्ह्यातूनही अन्य जिल्ह्यांमध्ये पाठविण्यात येणारे टपाल रेल्वे तसेच बसेसच्या माध्यमातून पाठविले जाते. परंतु दळणवळणाच्या या साधनांवर निर्बंध असल्याने त्याचा परिणाम टपाल खात्याच्या व्यवस्थेवरही जाणवू लागला आहे. टपाल खात्याच्या लालरंगाच्या ‘मेल’ वाहनातून सध्या टपालांची वाहतूक केली जात असल्याने टपाल पोहोचवण्यास विलंब होत आहे. मुंबईहून धुळे, जळगाव असा प्रवास ‘मेल’ वाहनातून सध्या सुरू आहे. नाशिक जिल्हांतर्गत टपालासाठीदेखील नाशिक पोस्ट कार्यालयाला ‘मेल’ वाहन वापरावे लागत आहे. या प्रक्रियेमुळे साहजिकच टपाल वितरणाच्या कामावर परिणाम झाला असून, वाहतूक व्यवस्थेला विलंब होऊ लागला आहे.तक्रार कमी : टपालाच्या अन्य सेवा मात्र सुरळीतनेहमीपेक्षा टपालाची संख्या कमी झालेली असली तरी काही प्रमाणात असलेल्या टपालालादेखील विलंब होत आहे. वाहतुकीवरील निर्बंध आणि त्यामुळे आलेल्या मर्यादेची नागरिकांना जाणीव असल्याने नागरिकांकडून तक्रार होत नसल्याचा दावा टपाल विभागाच्या अधिकाºयांनी केला आहे.४लॉकडाऊनच्या काळात नाशिक विभागातील ग्राहकांना पोस्ट बॅँकेची सुविधा देणाºया टपाल खात्याने नियमित टपाल बटवडादेखील सुरू ठेवला आहे. दळणवळणाच्या मर्यादा अल्या असल्या तरी पोस्टाच्या गाडीने तसेच पोस्टमनच्या मदतीने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे संबंधितांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPost Officeपोस्ट ऑफिस