शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कागदपत्रांअभावी मुदतवाढीनंतरही संथगतीने प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:38 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्राथमिक व पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर दिलेली अंतिम मुदत ६ एप्रिलपासून ४ मे पर्यंत वाढ मिळाल्यानंतरही प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. यात अनेक पालकांनी सोडत जाहीर झाल्यानंतर विविध आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकत नसल्याने सोडतीत संधी मिळूनही प्रवेश घेताना विलंब होत आहे.

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्राथमिक व पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर दिलेली अंतिम मुदत ६ एप्रिलपासून ४ मे पर्यंत वाढ मिळाल्यानंतरही प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. यात अनेक पालकांनी सोडत जाहीर झाल्यानंतर विविध आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकत नसल्याने सोडतीत संधी मिळूनही प्रवेश घेताना विलंब होत आहे.आतापर्यंत पहिल्या यादीत प्रवेशाची संधी मिळलेल्या ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी केवळ २ हजार ३१४ प्रवेश झाले असून, अजूनही १ हजार २०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकलेले नाहीत.आरटीई प्रक्रियेत पहिल्या फेरीसाठी दिलेली मुदत संपेपर्यंत ३ हजार ५१७ पैकी केवळ २ हजार २५० च्या आसपास प्रवेश झाले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रवेशासाठी ४ मे पर्यंत मुदतवाढ दिली. या वाढीव मुदतीत चार दिवस उलटल्यानंतरही केवळ ७० ते ८० प्रवेशांची भर पडली असून, अपूर्ण कागदपत्रांसह शनिवार, रविवारची सुटी आणि सोमवारी मतदान यामुळे मुदतवाढ मिळाली आहे.  जिल्हाभरातील ४५७ शाळांसाठी प्राप्त साडेचौदा हजार अर्जांपैकी ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत होती.विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढपडताळणी समिती आणि तक्रार निवारण समितीकडेही तक्रार करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने काही पालकांनी तक्रार निवारण समितीचीच शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. प्रवेश कमी झाल्याने आणि पालकांची मागणी लक्षात घेता शिक्षण विभागाने पहिल्या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ दिली होती. परंतु वाढीव मुदतीत प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा