शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केंद्राच्या रूर्बन योजनेत सहा आदिवासी गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:27 IST

आदिवासी भागाचा विकास साधणाऱ्या केंद्र सरकारच्या रूर्बन योजनेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा आदिवासी गावांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी केंद्र सरकारने ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देहेमंत गोडसे : विकासासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

नाशिक : आदिवासी भागाचा विकास साधणाऱ्या केंद्र सरकारच्या रूर्बन योजनेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा आदिवासी गावांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी केंद्र सरकारने ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही योजना राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी शासनाकडून साडेचार कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, येत्या तीन वर्षांत या गावांचा विकास केला जाणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निरगुडे, दलपतपूर, हरसूल, ठाणापाडा, वायघोळपाडा, सापतपाली या गावांचा त्यात समावेश आहे. या गावांचा शहराच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असून, मूलभूत सोयी, सुविधा उपलब्धतेबरोबरच रोजगार निर्मितीचाही या योजनेत समावेश आहे. केंद्र सरकारच्या योजनेत आदिवासी गावांचा समावेशाबाबत गोडसे यांनी पाठपुरावा केल्याने शासनाने ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पैकी राज्य शासनाच्या विविध विभागांकडून ४० कोटी १६ लाख रुपये तर केंद्राकडून १५ कोटींच्या निधीचा समावेश आहे. पहिला हप्ता म्हणून साडेचार कोटी रुपये जिल्हा प्रशासाकडे वर्ग करण्यात आले आहेत. या योजनेसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निरगुडे गाव समूहाची निवड केली आहे. त्यात दलपतपूर, हरसूल, ठाणापाडा, वायघोळपाडा, सापतपाली या आदिवासी गावांचा समावेश आहे. या योजनेचा आराखडा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, जिल्हा ग्रामीण विभागाच्या प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी एम. बी. मुरकुटे यांना तयार केला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचेही शेवटी खासदार गोडसे यांनी सांगितले.गावांना मिळणार विविध सोयीसुविधाया योजनेंतर्गत गावांना दरडोई ४० लिटर ऐवजी ७० लिटर पाणी उपलब्ध होणार असून, गावात घनकचरा आणि द्रवकचºयाचे व्यवस्थापन केले जाईल. शाळा, अंगणवाड्यांच्या नव्याने खोल्या बांधण्याबरोबरच जुन्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शाळा, अंगणवाड्यांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून, रस्ते, पथदीप व गटारी बांधणी केली जाईल. महिलांना एल.पी.जी. गॅस पुरविण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीसाठी महिला बचत गटांची निर्मिती त्याचबरोबर शेतीशी निगडीत उद्योग धंद्यांची निर्मितीही करण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाHemant Godseहेमंत गोडसे