नाशिक : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी शहरातील १६ केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत सुमारे ६,०७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत घेण्यात आलेली परीक्षा सुरळीत पार पडली.सकाळ सत्रात ३,०३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ३२९८ विद्यार्थी गैरहजर राहिले. दुपारच्या सत्रात ३,०३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ३२९७ विद्यार्थी गैरहजर राहिले. विशेष म्हणजे या दोन्ही सत्रांत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा गैरहजर विद्यार्थ्यांचीच संख्या मोठी होती.या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले होते. दक्षता समितीबरोबरच फिरते पोलीस पथक आणि केंद्र समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली होती. शहरातील कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाला नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
स्टाफ सिलेक्शनसाठी सहा हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
By admin | Updated: December 7, 2015 00:03 IST