शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
4
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
5
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
6
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
7
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
8
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
9
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
10
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
11
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
12
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
13
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
14
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
15
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
16
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
17
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
18
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
19
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी कॉँग्रेसला हव्या निम्म्या जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:22 IST

तीन राज्यांच्या निवडणूक निकालाने विश्वास बळावलेल्या कॉँग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून गुरुवारी उत्तर महाराष्टÑातील कॉँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व लोक प्रतिनिधींची बैठक पक्षाचे सचिव व समन्वयक आमदार चेल्लर वामसीचंद रेड्डी यांच्या उपस्थितीत दिवसभर जिल्हानिहाय बैठका होवून त्यात संभाव्य उमेदवारांनी चाचपणी व पक्ष बांधणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्टÑातील लोकसभेच्या आठ जागांपैकी निम्म्या जागा कॉँग्रेसला सुटाव्यात, असा आग्रह प्रत्येक जिल्ह्णाकडून धरण्यात आला.

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्राची बैठक : चेल्लर रेड्डी यांच्या उपस्थितीत घेतला आढावा

नाशिक : तीन राज्यांच्या निवडणूक निकालाने विश्वास बळावलेल्या कॉँग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून गुरुवारी उत्तर महाराष्टÑातील कॉँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व लोक प्रतिनिधींची बैठक पक्षाचे सचिव व समन्वयक आमदार चेल्लर वामसीचंद रेड्डी यांच्या उपस्थितीत दिवसभर जिल्हानिहाय बैठका होवून त्यात संभाव्य उमेदवारांनी चाचपणी व पक्ष बांधणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्टÑातील लोकसभेच्या आठ जागांपैकी निम्म्या जागा कॉँग्रेसला सुटाव्यात, असा आग्रह प्रत्येक जिल्ह्णाकडून धरण्यात आला.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीने सुरू केलेले जनसंपर्क अभियान, बुथ कमिट्या व शक्ती अ‍ॅपच्या कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तत्पूर्वी रेड्डी यांनी प्रत्येक जिल्ह्णाचे अध्यक्ष व शहराध्यक्षांकडून विधानसभा मतदारसंघनिहाय आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत मनोगत जाणून घेण्यात आले.प्रत्येक जिल्ह्णाने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाला जागा मिळावी, असा आग्रह धरताना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचविण्यात मदत होणार असल्याचे सांगितले. दिवसभर चाललेल्या या बैठकीनंतर रेड्डी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हटले, तीन राज्यांच्या निवडणूक निकालामुळे निवडणूक यंत्रणा आणि पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा काळ ओसरल्याचा अनुभव भारतीय जनता पक्षाने घेतला असून, भाजपाच्या धनशक्तीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले तर, तीन राज्यांप्रमाणे महाराष्टÑातही पक्षाचा विजय निश्चित आहे. त्यासाठी बुथ यंत्रणा सक्षम करून निवडणूक जिंकण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी एकसंघपणे कामाला लागावे त्याचबरोबर येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर विजय मिळवून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना गिफ्ट द्या, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, जळगावचे जिल्हा अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, धुळ्याचे अध्यक्ष श्याम सनेर, अहमदनगरचे शेलार, जयप्रकाश छाजेड आदींसह विविध मान्यवरांनी आपापल्या जिल्ह्णातील संघटनात्मक बाबींबाबत माहिती देऊन चर्चा केली.प्रास्ताविक राजाराम पानगव्हाणे यांनी, तर स्वागत शहराध्यक्ष शरद अहेर यांनी केले. याप्रसंगी नाशिकचे सहप्रभारी डी. जी. पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, जयप्रकाश छाजेड, नानासाहेब बोरस्ते, डॉ. तुषार शेवाळे, डॉ. हेमलताताई पाटील, शाहू खैरे, शंकरराव अहिरे, रमेश कहांडोळे, प्रसाद बापू हिरे, भारत टाकेकर, दिगंबर गिते, नंदकुमार कर्डक, अनिल भामरे, शांताराम लाठार, वत्सलाताई खैरे, लक्ष्मण जायभावे, दिनेश चोथवे, सखाराम भोये, सुनील आव्हाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.भुजबळ असतील तरच जागा सोडानाशिक जिल्ह्णाच्या वतीने बाजू मांडताना पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्णातील किमान लोकसभेची एक जागा तरी मिळावी, असा आग्रह धरला. त्यानुसार उपस्थित वरिष्ठ पदाधिकाºयांनीही चर्चा करून एक जागा काँग्रेससाठी सोडवून आणण्याचा चांद रेड्डी यांनी आश्वासन दिले. पक्षाचे चिन्ह जनतेपर्यंत पोहोचले नाही तर त्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची चिंताही व्यक्त करण्यात आली. नाशिकच्या जागेवर राष्टÑवादीकडून छगन भुजबळ उमेदवार असतील तर ठीक, अन्य उमेदवार असल्यास त्यापेक्षा कॉँग्रेससाठी ही जागा घ्यावी, पक्षाकडून अनेक इच्छुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ं

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेस