शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

अकरा महिन्यांत सहा बिबटे अपघातांत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 1:16 AM

राष्टÑीय-राज्य महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून रस्ता ओलांडताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा गेल्या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणाºया बिबट्यासारख्या चपळ वन्यप्राण्यालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणाºया वाहनांपुढे जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस सदर समस्या गंभीर रूप धारण करत असून, ही धक्कादायक बाब आहे.

अझहर शेख ।नाशिक : राष्टÑीय-राज्य महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून रस्ता ओलांडताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा गेल्या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणाºया बिबट्यासारख्या चपळ वन्यप्राण्यालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणाºया वाहनांपुढे जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस सदर समस्या गंभीर रूप धारण करत असून, ही धक्कादायक बाब आहे.  जिल्ह्यातील निफाड, इगतपुरी, दिंडोरी, बागलाण, सटाणा, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील परिसरात बिबट्याचा अधिवास आढळतो. त्यामुळे या भागात मानव-बिबट्याचा संघर्षही पहावयास मिळतो. पुरेसे भक्ष्य ऊसशेतीमध्ये किंवा परिसरातील विरळ झालेल्या वनक्षेत्रात न मिळाल्यामुळे मानवी वस्तीकडे भरकटणारा बिबट्या कधी शेतकºयांच्या पशुधनावर तर कधी लहान मुलांवर हल्ले करत असल्याच्या अनेक घटना या भागामध्ये घडल्या आहेत. दरम्यान, या तालुक्यांमधून जाणारे राज्य व राष्टÑीय महामार्ग ओलांडताना बिबट्यांना जीव गमवावा लागत आहे. महामार्गावरून धावणाºया वाहनांमुळे रस्ता ओलांडताना बिबटे गतप्राण होत आहेत. बिबट्यांसारख्या अन्य वन्यजिवांचाही महामार्गांलगतच्या वनक्षेत्रात असलेला वावर लक्षात घेत त्या वनपरिक्षेत्रांच्या हद्दीत संबंधित वनविभागाने ‘वन्यजिवांचा वावर, वाहने सावकाश चालवा’ असे आवाहन वजा सूचना करणारे फलकही लावले आहेत; मात्र वाहनचालक याकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात वाहने चालविणे पसंत करतात. त्यामुळे अचानकपणे संध्याकाळनंतर भक्ष्याच्या शोधात भटकं ती करणाºया बिबट्यासारख्या वन्यजिवांना आपले प्राण वाहनांच्या धडकेत गमवावे लागत आहे. वेग मर्यादेत असल्यास अचानकपणे बिबट्यासारखे वन्यजीव रस्ता ओलांडताना समोर आल्यास वाहन नियंत्रीत करणे शक्य होऊन अपघात टाळता येऊ शकतो; मात्र जर अमर्याद वेगाने वाहन धावत असेल तर मात्र अपघात टाळणे वाहनचालकांना शक्य होत नाही. अस्तित्वालाच धोका ! उसाच्या क्षेत्रात किंवा अन्य शेतीच्या क्षेत्रात व मोकळ्या भूखंडावर भक्ष्याचा पाठलाग करताना अनेकदा बिबट्याची वाट चुकते आणि संरक्षक कठडे नसलेल्या जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जिवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसित केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बिबट्या ठार होऊ लागला आहे. यामुळे बिबट्याचे अस्तित्वच जणू धोक्यात आले आहे. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. येथे पडले बिबटे मृत्युमुखी नाशिक-मुंबई महामार्गावरील पाडळी, विल्होळी शिवारात प्रत्येकी एक पुणे महामार्ग सिन्नर वनपरिक्षेत्रात दोन सिन्नर-घोटी राज्य मार्गावर एक मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड शिवारात एक असे सहा बिबटे अपघातात मृत्युमुखी पडले.

टॅग्स :TigerवाघAccidentअपघात