शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

निवडणूक प्रचाराला शिल्लक अवघे सहा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 19:04 IST

विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदरपासून प्रत्येक इच्छुक उमेदवाराने मतदारसंघाचा राजकीय व सामाजिक अभ्यास करण्याबरोबरच, ठिकठिकाणच्या समर्थक, हितचिंतकांचे मेळावे, बैठका घेऊन निवडणुकीला कल जाणून घेतला असला तरी, प्रत्यक्ष नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय

ठळक मुद्देउमेदवारांची दमछाक : मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपडसुरुवातीचे चार दिवस तर उमेदवारांचे विविध भागांमध्ये संपर्क कार्यालये उघडण्यात गेले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असून, रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हाती असलेला कालावधी लक्षात घेता, विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणे शक्य नसल्याचे पाहून उमेदवारांनी कार्यकर्त्यांकरवी मतदारांपर्यंत आपले प्रचारसाहित्य पुरविण्यावर भर दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदरपासून प्रत्येक इच्छुक उमेदवाराने मतदारसंघाचा राजकीय व सामाजिक अभ्यास करण्याबरोबरच, ठिकठिकाणच्या समर्थक, हितचिंतकांचे मेळावे, बैठका घेऊन निवडणुकीला कल जाणून घेतला असला तरी, प्रत्यक्ष नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी वाटपावरून साठमारी सुरू असल्यामुळे जोपर्यंत पक्षाची अधिकृत उमेदवारी हातात पडत नाही, तोपर्यंत उमेदवारीबाबत निश्चितता नव्हती. पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर छाननी व माघारीपर्यंत सर्वच उमेदवारांचा जीव टांगणीला लागून होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या खºया प्रचाराला ७ आॅक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीचे चार दिवस तर उमेदवारांचे विविध भागांमध्ये संपर्क कार्यालये उघडण्यात व कार्यकर्त्यांवर जबाबदारीचे वाटप करण्यात गेले. त्यानंतर मात्र मतदारसंघात नेत्यांच्या प्रचारसभांच्या आयोजनात उमेदवारांचा वेळ खर्ची पडला. निवडणुकीचा प्रचार सुरू होवून सात दिवस उलटले असून, पहिल्या टप्प्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉँग्रेसने बºयापैकी आघाडी घेतली आहे. त्यांच्या त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रामदास आठवले, छगन भुजबळ, डॉ. अमोल कोल्हे यांचे जिल्ह्यात दौरेही झाले असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शरद पवार, राज ठाकरे आदींच्या सभा घेण्याचे घाटत आहे. जिल्ह्यात कॉँग्रेस सहा जागांवर निवडणूक लढवित असली तरी अद्याप एकाही राज्यस्तरीय नेत्याची सभा वा बैठक एकाही मतदारसंघात होऊ शकलेली नाही.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांना पंधरा दिवसांचा कालावधी मिळणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमावरून दिसत असले तरी, २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने मतदानाच्या ४८ तास अगोदर जाहीर प्रचाराला निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. त्यामुळे शनिवार, दि. १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर उमेदवारांना नाईलाजाने प्रचार आटोपता घ्यावा लागणार आहे. परिणामी हाती असलेल्या सहा दिवसांत उमेदवारांना मतदारसंघाच्या कानाकोपºयात पोहोचण्यासाठी उमेदवारांना धडपड करावी लागणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनाही जुंपण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी पोहोचणे शक्य नसल्याने उमेदवारांचे नातेवाईक व कुटुंबीयांवर काही भागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक