शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बहिणीची वेडी माया, भाऊरायाला नाही दया माया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:51 IST

बंधू-भगिनींनो अशी कोणी सुरुवात केली की, अनेकांना भरते येते परंतु येथे एक दादा (लोक त्यांना अण्णा नावाने ओळखतात) ते आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक राजकीय महिलेला दीदी म्हणतात अशा भाऊरायाने ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीची वेडी माया लक्षात न घेता राखी बांधण्यासाठी टाळावे किंबहूना भ्रमणध्वनीही घेऊ नये याला काय म्हणावे? निवडणुका येतात-जातात, म्हणून काय भातृप्रेमाची अशी ‘सीमा’ ओलांडावी...?

नाशिक : बंधू-भगिनींनो अशी कोणी सुरुवात केली की, अनेकांना भरते येते परंतु येथे एक दादा (लोक त्यांना अण्णा नावाने ओळखतात) ते आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक राजकीय महिलेला दीदी म्हणतात अशा भाऊरायाने ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीची वेडी माया लक्षात न घेता राखी बांधण्यासाठी टाळावे किंबहूना भ्रमणध्वनीही घेऊ नये याला काय म्हणावे? निवडणुका येतात-जातात, म्हणून काय भातृप्रेमाची अशी ‘सीमा’ ओलांडावी...?निवडणुका आल्या की, कोणीही इच्छुक कोणाला मामा, काका, दादा म्हणतात आणि राजकारण सरले की नंतर कालांतराने विस्मरणही होऊन जाते. परंतु ताई- दादाचे म्हणजेच बहीण-भावाच्या नात्याचे तसे नाही. इतिहासातील अनेक राजांनीदेखील केवळ राखीचे नाते म्हणून महिलांना मदत केली आहे. चितोडगडच्या महाराणी कर्णावती यांनी हुमायुॅँला राखी पाठवून मदतीची याचना केली आणि त्यांनीही सुलतान बहादूर शहापासून भगिनीचे रक्षण करण्यासाठी आपले सैन्य पाठवून दिले, असा प्रेरणादायी इतिहास आहे. भलेही राजकारण बदलते असेल, परंतु नाते थोडे काबदलते?अण्णा तर सर्वच महिलांना दीदी म्हणत असल्याने विश्वबंधू भाजपात त्यांच्या तीन प्रमुख ताया (म्हणजे ताई) त्यातील महापौर रंजना भानसी यांची तर या बंधूचे (अलीकडेपर्यंत) खूप जमत असे. महापौर म्हणजे सर्वांत लाडकी दीदी. मध्य नाशिकमधील दीदीबाबत अण्णांनी तसे सुरक्षित अंतर राखलेले. परंतु धाकल्या सीमा दीदीविषयी बोलायचे तर अंतरच अंतर राखलेले. नाते आहे, पण भाऊबंदकीचे! ताईने केलेले राजकारण, भाच्याचा झालेला पराभव अशा अनेक भाऊबंदकीच्या कटू आठवणी अण्णांना सतत बोचत असाव्यात. त्यामुळे राजकीय भाऊबंदकी वाढली आणि मग मोठ्या बंधूनेदेखील विधानसभेतील खुर्चीची ऊब राखवायचे ठरले.त्यात अडसर दीदीचा. त्यामुळे दोघांत फारसे संभाषण नसतेच. परंतु तरीही महापौर दीदी आणि सीमा दीदींनी आवर्जून लाडक्या भावाची रक्षाबंधनाची आठवण ठेवून आवर्जून फोन केला. त्यातील महापौर दीदीशी आता अंतर पडल्याने अण्णांनी रामायणकडे पाठ फिरवली. त्यामुळे महापौर दीदीने स्वत:हून गेल्या दोन वर्षांतील नातेसंबंध आणि संकटप्रसंगी अनुभवलेला संघर्ष, दोघांनी मिळविलेला विजय याची आठवण करून दिली. किमान या दीदीशी बोलून अण्णांनी मनातील सल व्यक्त केली खरी, परंतु दुसºया दीदीचा साधा फोनही उचलला नाही.राजकीय वर्तुळात यामुळे चर्चा झाली. बहिणीची वेडी माया भाऊरायाला कळली नाही, असेही काही जण म्हणू लागले. परंतु भाऊरायाच्या मनातील सल आणि इच्छा तरी भगिनींना उमजेलकाय?

टॅग्स :Nashikनाशिक