शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

बहिणीची वेडी माया, भाऊरायाला नाही दया माया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:51 IST

बंधू-भगिनींनो अशी कोणी सुरुवात केली की, अनेकांना भरते येते परंतु येथे एक दादा (लोक त्यांना अण्णा नावाने ओळखतात) ते आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक राजकीय महिलेला दीदी म्हणतात अशा भाऊरायाने ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीची वेडी माया लक्षात न घेता राखी बांधण्यासाठी टाळावे किंबहूना भ्रमणध्वनीही घेऊ नये याला काय म्हणावे? निवडणुका येतात-जातात, म्हणून काय भातृप्रेमाची अशी ‘सीमा’ ओलांडावी...?

नाशिक : बंधू-भगिनींनो अशी कोणी सुरुवात केली की, अनेकांना भरते येते परंतु येथे एक दादा (लोक त्यांना अण्णा नावाने ओळखतात) ते आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक राजकीय महिलेला दीदी म्हणतात अशा भाऊरायाने ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीची वेडी माया लक्षात न घेता राखी बांधण्यासाठी टाळावे किंबहूना भ्रमणध्वनीही घेऊ नये याला काय म्हणावे? निवडणुका येतात-जातात, म्हणून काय भातृप्रेमाची अशी ‘सीमा’ ओलांडावी...?निवडणुका आल्या की, कोणीही इच्छुक कोणाला मामा, काका, दादा म्हणतात आणि राजकारण सरले की नंतर कालांतराने विस्मरणही होऊन जाते. परंतु ताई- दादाचे म्हणजेच बहीण-भावाच्या नात्याचे तसे नाही. इतिहासातील अनेक राजांनीदेखील केवळ राखीचे नाते म्हणून महिलांना मदत केली आहे. चितोडगडच्या महाराणी कर्णावती यांनी हुमायुॅँला राखी पाठवून मदतीची याचना केली आणि त्यांनीही सुलतान बहादूर शहापासून भगिनीचे रक्षण करण्यासाठी आपले सैन्य पाठवून दिले, असा प्रेरणादायी इतिहास आहे. भलेही राजकारण बदलते असेल, परंतु नाते थोडे काबदलते?अण्णा तर सर्वच महिलांना दीदी म्हणत असल्याने विश्वबंधू भाजपात त्यांच्या तीन प्रमुख ताया (म्हणजे ताई) त्यातील महापौर रंजना भानसी यांची तर या बंधूचे (अलीकडेपर्यंत) खूप जमत असे. महापौर म्हणजे सर्वांत लाडकी दीदी. मध्य नाशिकमधील दीदीबाबत अण्णांनी तसे सुरक्षित अंतर राखलेले. परंतु धाकल्या सीमा दीदीविषयी बोलायचे तर अंतरच अंतर राखलेले. नाते आहे, पण भाऊबंदकीचे! ताईने केलेले राजकारण, भाच्याचा झालेला पराभव अशा अनेक भाऊबंदकीच्या कटू आठवणी अण्णांना सतत बोचत असाव्यात. त्यामुळे राजकीय भाऊबंदकी वाढली आणि मग मोठ्या बंधूनेदेखील विधानसभेतील खुर्चीची ऊब राखवायचे ठरले.त्यात अडसर दीदीचा. त्यामुळे दोघांत फारसे संभाषण नसतेच. परंतु तरीही महापौर दीदी आणि सीमा दीदींनी आवर्जून लाडक्या भावाची रक्षाबंधनाची आठवण ठेवून आवर्जून फोन केला. त्यातील महापौर दीदीशी आता अंतर पडल्याने अण्णांनी रामायणकडे पाठ फिरवली. त्यामुळे महापौर दीदीने स्वत:हून गेल्या दोन वर्षांतील नातेसंबंध आणि संकटप्रसंगी अनुभवलेला संघर्ष, दोघांनी मिळविलेला विजय याची आठवण करून दिली. किमान या दीदीशी बोलून अण्णांनी मनातील सल व्यक्त केली खरी, परंतु दुसºया दीदीचा साधा फोनही उचलला नाही.राजकीय वर्तुळात यामुळे चर्चा झाली. बहिणीची वेडी माया भाऊरायाला कळली नाही, असेही काही जण म्हणू लागले. परंतु भाऊरायाच्या मनातील सल आणि इच्छा तरी भगिनींना उमजेलकाय?

टॅग्स :Nashikनाशिक