शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

बहिणीची वेडी माया, भाऊरायाला नाही दया माया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:51 IST

बंधू-भगिनींनो अशी कोणी सुरुवात केली की, अनेकांना भरते येते परंतु येथे एक दादा (लोक त्यांना अण्णा नावाने ओळखतात) ते आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक राजकीय महिलेला दीदी म्हणतात अशा भाऊरायाने ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीची वेडी माया लक्षात न घेता राखी बांधण्यासाठी टाळावे किंबहूना भ्रमणध्वनीही घेऊ नये याला काय म्हणावे? निवडणुका येतात-जातात, म्हणून काय भातृप्रेमाची अशी ‘सीमा’ ओलांडावी...?

नाशिक : बंधू-भगिनींनो अशी कोणी सुरुवात केली की, अनेकांना भरते येते परंतु येथे एक दादा (लोक त्यांना अण्णा नावाने ओळखतात) ते आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक राजकीय महिलेला दीदी म्हणतात अशा भाऊरायाने ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीची वेडी माया लक्षात न घेता राखी बांधण्यासाठी टाळावे किंबहूना भ्रमणध्वनीही घेऊ नये याला काय म्हणावे? निवडणुका येतात-जातात, म्हणून काय भातृप्रेमाची अशी ‘सीमा’ ओलांडावी...?निवडणुका आल्या की, कोणीही इच्छुक कोणाला मामा, काका, दादा म्हणतात आणि राजकारण सरले की नंतर कालांतराने विस्मरणही होऊन जाते. परंतु ताई- दादाचे म्हणजेच बहीण-भावाच्या नात्याचे तसे नाही. इतिहासातील अनेक राजांनीदेखील केवळ राखीचे नाते म्हणून महिलांना मदत केली आहे. चितोडगडच्या महाराणी कर्णावती यांनी हुमायुॅँला राखी पाठवून मदतीची याचना केली आणि त्यांनीही सुलतान बहादूर शहापासून भगिनीचे रक्षण करण्यासाठी आपले सैन्य पाठवून दिले, असा प्रेरणादायी इतिहास आहे. भलेही राजकारण बदलते असेल, परंतु नाते थोडे काबदलते?अण्णा तर सर्वच महिलांना दीदी म्हणत असल्याने विश्वबंधू भाजपात त्यांच्या तीन प्रमुख ताया (म्हणजे ताई) त्यातील महापौर रंजना भानसी यांची तर या बंधूचे (अलीकडेपर्यंत) खूप जमत असे. महापौर म्हणजे सर्वांत लाडकी दीदी. मध्य नाशिकमधील दीदीबाबत अण्णांनी तसे सुरक्षित अंतर राखलेले. परंतु धाकल्या सीमा दीदीविषयी बोलायचे तर अंतरच अंतर राखलेले. नाते आहे, पण भाऊबंदकीचे! ताईने केलेले राजकारण, भाच्याचा झालेला पराभव अशा अनेक भाऊबंदकीच्या कटू आठवणी अण्णांना सतत बोचत असाव्यात. त्यामुळे राजकीय भाऊबंदकी वाढली आणि मग मोठ्या बंधूनेदेखील विधानसभेतील खुर्चीची ऊब राखवायचे ठरले.त्यात अडसर दीदीचा. त्यामुळे दोघांत फारसे संभाषण नसतेच. परंतु तरीही महापौर दीदी आणि सीमा दीदींनी आवर्जून लाडक्या भावाची रक्षाबंधनाची आठवण ठेवून आवर्जून फोन केला. त्यातील महापौर दीदीशी आता अंतर पडल्याने अण्णांनी रामायणकडे पाठ फिरवली. त्यामुळे महापौर दीदीने स्वत:हून गेल्या दोन वर्षांतील नातेसंबंध आणि संकटप्रसंगी अनुभवलेला संघर्ष, दोघांनी मिळविलेला विजय याची आठवण करून दिली. किमान या दीदीशी बोलून अण्णांनी मनातील सल व्यक्त केली खरी, परंतु दुसºया दीदीचा साधा फोनही उचलला नाही.राजकीय वर्तुळात यामुळे चर्चा झाली. बहिणीची वेडी माया भाऊरायाला कळली नाही, असेही काही जण म्हणू लागले. परंतु भाऊरायाच्या मनातील सल आणि इच्छा तरी भगिनींना उमजेलकाय?

टॅग्स :Nashikनाशिक