शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

साहेब, तुम्ही कारखाना उभा कराच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 00:06 IST

नांदूरवैद्य : साहेब, तुम्ही आम्हाला आरोग्य, शैक्षणिक सुविधा दिल्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले. परंतु आता तुम्ही इगतपुरी, त्रंबक, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकरी उभा करायचा असेल तर तुम्ही साखर कारखाना उभा कराच! त्यामुळे येथील शेतकरी समृद्ध होऊन आनंदात शेती करेल, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, कारखाना उभा कराच, असे आर्जव इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आर्जव : इगतपुरी तालुक्यात साखर कारखाना सुरू करण्यासाठी महसूलमंत्र्यांना साकडे

नांदूरवैद्य : साहेब, तुम्ही आम्हाला आरोग्य, शैक्षणिक सुविधा दिल्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले. परंतु आता तुम्ही इगतपुरी, त्रंबक, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकरी उभा करायचा असेल तर तुम्ही साखर कारखाना उभा कराच! त्यामुळे येथील शेतकरी समृद्ध होऊन आनंदात शेती करेल, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, कारखाना उभा कराच, असे आर्जव इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना केले.इगतपुरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संगमनेर येथे महसूलमंत्री थोरात यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकरी तेथील भौगोलिक परिस्थिती चांगली असताना देखील इगतपुरी, त्रंबक येथील शेतकऱ्यांना भातशेतीवर अवलंबून राहावे लागते. भाताला गेल्या पाच वर्षांपासून शाश्वत भाव नाही, ऊस उत्पादनात हा तालुका अग्रेसर असून सन २०२० मध्ये इगतपुरीचे व नाशिकचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात लागवडीखाली होते. परंतु हक्काचा कारखाना नसल्याने इतर ठिकाणी ऊस नोंद करण्यासाठी व पाठविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हक्काचा कारखाना नाही. इगतपुरी तालुक्याला संगमनेरसारखे तुम्हीच उभे करू शकता, अशी भावनिक हाक थोरात यांना इगतपुरीतील शेतकऱ्यांनी आमदार सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत घातली.इगतपुरी तालुक्यात सात ते आठ धरणे असून या धरणांमुळे तालुक्यातील व इतर तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे तर ते म्हणजे फक्त ऊस, तुम्ही जर इगतपुरी तालुक्यात साखर कारखाना खासगी तत्त्वावर उभा केला तर नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्रंबक तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतील. याप्रसंगी बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी गोरख भाऊ मराडे, सुनीलभाऊ वाजे, सुदाम भोसले, ज्ञानेश्वर जमदाडे, रामदास भोसले, निवृत्ती वाकचौरे, रमेश भोसले, समाधान शेलार, रमेश बेंडकोळी, सुनील गाढवे आदी शेतकरी सहभागी झाले होते.इगतपुरी तालुक्यातील धरणामुळे इतर तालुक्यांत देखील मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होऊ शकेल. हक्काचा नासाका असताना दोन हजार हेक्‍टर क्षेत्र ऊस लागवड केलेले होते. त्यात एकट्या इगतपुरी तालुक्यात हजार ते अकराशे हेक्टर, नाशिक तालुका सातशे ते आठशे हेक्टर, सिन्नर दोनशे ते अडीचशे व त्रंबक शंभर ते दीडशे क्षेत्रात लागवड होत होती. परंतु आज जर संगमनेरच्या धर्तीवर साखर कारखाना उभा राहिला तर या चारही तालुक्यांत मिळून चार हजार हेक्‍टरच्या आसपास ऊस लागवड होईल, अशी माहिती यावेळी आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने