शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, तुम्ही कारखाना उभा कराच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 00:06 IST

नांदूरवैद्य : साहेब, तुम्ही आम्हाला आरोग्य, शैक्षणिक सुविधा दिल्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले. परंतु आता तुम्ही इगतपुरी, त्रंबक, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकरी उभा करायचा असेल तर तुम्ही साखर कारखाना उभा कराच! त्यामुळे येथील शेतकरी समृद्ध होऊन आनंदात शेती करेल, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, कारखाना उभा कराच, असे आर्जव इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आर्जव : इगतपुरी तालुक्यात साखर कारखाना सुरू करण्यासाठी महसूलमंत्र्यांना साकडे

नांदूरवैद्य : साहेब, तुम्ही आम्हाला आरोग्य, शैक्षणिक सुविधा दिल्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले. परंतु आता तुम्ही इगतपुरी, त्रंबक, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकरी उभा करायचा असेल तर तुम्ही साखर कारखाना उभा कराच! त्यामुळे येथील शेतकरी समृद्ध होऊन आनंदात शेती करेल, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, कारखाना उभा कराच, असे आर्जव इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना केले.इगतपुरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संगमनेर येथे महसूलमंत्री थोरात यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकरी तेथील भौगोलिक परिस्थिती चांगली असताना देखील इगतपुरी, त्रंबक येथील शेतकऱ्यांना भातशेतीवर अवलंबून राहावे लागते. भाताला गेल्या पाच वर्षांपासून शाश्वत भाव नाही, ऊस उत्पादनात हा तालुका अग्रेसर असून सन २०२० मध्ये इगतपुरीचे व नाशिकचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात लागवडीखाली होते. परंतु हक्काचा कारखाना नसल्याने इतर ठिकाणी ऊस नोंद करण्यासाठी व पाठविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हक्काचा कारखाना नाही. इगतपुरी तालुक्याला संगमनेरसारखे तुम्हीच उभे करू शकता, अशी भावनिक हाक थोरात यांना इगतपुरीतील शेतकऱ्यांनी आमदार सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत घातली.इगतपुरी तालुक्यात सात ते आठ धरणे असून या धरणांमुळे तालुक्यातील व इतर तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे तर ते म्हणजे फक्त ऊस, तुम्ही जर इगतपुरी तालुक्यात साखर कारखाना खासगी तत्त्वावर उभा केला तर नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्रंबक तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतील. याप्रसंगी बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी गोरख भाऊ मराडे, सुनीलभाऊ वाजे, सुदाम भोसले, ज्ञानेश्वर जमदाडे, रामदास भोसले, निवृत्ती वाकचौरे, रमेश भोसले, समाधान शेलार, रमेश बेंडकोळी, सुनील गाढवे आदी शेतकरी सहभागी झाले होते.इगतपुरी तालुक्यातील धरणामुळे इतर तालुक्यांत देखील मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होऊ शकेल. हक्काचा नासाका असताना दोन हजार हेक्‍टर क्षेत्र ऊस लागवड केलेले होते. त्यात एकट्या इगतपुरी तालुक्यात हजार ते अकराशे हेक्टर, नाशिक तालुका सातशे ते आठशे हेक्टर, सिन्नर दोनशे ते अडीचशे व त्रंबक शंभर ते दीडशे क्षेत्रात लागवड होत होती. परंतु आज जर संगमनेरच्या धर्तीवर साखर कारखाना उभा राहिला तर या चारही तालुक्यांत मिळून चार हजार हेक्‍टरच्या आसपास ऊस लागवड होईल, अशी माहिती यावेळी आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने