शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

साहेब, पिके निघाल्यावर वीज बिल भरू...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST

जळगाव नेऊर : साहेब, पिके निघाल्यावर वीज बिल भरू, असे साकडे साताळी येथील शेतकऱ्यांनी बंद रोहित्र सुरू करण्यासाठी महावितरणला ...

जळगाव नेऊर : साहेब, पिके निघाल्यावर वीज बिल भरू, असे साकडे साताळी येथील शेतकऱ्यांनी बंद रोहित्र सुरू करण्यासाठी महावितरणला घातले आहे.

साताळी व परिसरात दुष्काळी परिस्थिती असून शेती व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. शेतकरी वर्गासमोर विजेअभावी चिंता उभी राहिली आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीत जेमतेम थोडेफार पाणी असून विजेअभावी सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठी अडचण तयार झालेली असून उभी असलेली पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असून पिके निघाल्यावर थोड्याफार प्रमाणात वीज बिले भरू, तरी साताळी व परिसरातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून महावितरणने साताळी व परिसरातील सर्व बंद रोहित्रांचा विद्युत प्रवाह सुरळीत करावा, या मागणीसाठी साताळी येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. निवेदनावर सरपंच सेवा महासंघाचे राज्य सोशल मीडिया अध्यक्ष तथा माजी सरपंच भाऊसाहेब कळसकर, दत्ताजी सुखदेव काळे, अभिमन्यू आहेर, सुरेश शांताराम सोनवणे, बाळू काशिनाथ काळे, पोपट बाबूराव अभिमन्यू आहेर, शरद यशवंत राजगुरू, बाळू पंजा काळे, दत्तू जगन्नाथ काळे, धोंडीराम काळे, मनोहर काळे आदींच्या सह्या आहेत.

-----------------------

वीज वितरण कंपनीचे उपअभियंता पाटील यांना निवेदन देताना सरपंच सेवा संघाचे भाऊसाहेब कळसकर, दत्ताजी काळे, अभिमन्यू आहेर, सुरेश सोनवणे व शेतकरी. (१४ जळगाव नेऊर २)

140821\14nsk_13_14082021_13.jpg

१४ जळगाव नेऊर २