शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

नियोजनाअभावी सिन्नरला पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 14:56 IST

सिन्नर : शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरूस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. शहरातील बेकायदेशीर नळधारकांवर कारवाई केली जात ...

सिन्नर : शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरूस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. शहरातील बेकायदेशीर नळधारकांवर कारवाई केली जात नाही. नियोजनाचा अभाव असल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. शिवाजी नवले व संजय चव्हाणके यांनी निवेदनाद्वारे केला आहे. शहरात होणाऱ्या विस्कळीत पाणीपुवरवठ्याबाबत अ‍ॅड. नवले व चव्हाणके यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यात पालिकेच्या गलथानाकडे लक्ष वेधले आहे. पालिकेच्या आजी-माजी पदाधिकाºयांसोबत शहरातील काही धनदांडग्यांनी बेकायदेशीर नळजोडण्या घेतल्या असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाणीपुरवठा करणाºया मुख्य वाहिन्यांवर नळजोडण्या असून नागरिकांनी आवाज उठवून देखील प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याचे कोणतेही वेळापत्रक पालिकेकडे नाही. काही भागात केवळ १० मिनीटे तर काही ठिकाणी २ तास नळांना पाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून निघणाºया जलवाहिनीद्वारे १२-१३ तासांत टाकी भरली जाते असे पालिका सांगते. मात्र प्रत्यक्षात २० ते ३० तास लागतो. याचा अर्थ पाणीचोरी मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सार्वजनिक नळ बंद करण्यात देखील अ‍ॅड. नवले व चव्हाणके यांनी लक्ष वेधले आहे. अनेक वर्षांपासून पाण्याचे आॅडिट झाले नाही. ते करण्यात यावे, पाण्याची सुव्यवस्थापन झाल्यास पाणीपुरवठ्यामागील अनाठायी खर्च होणार नाही याकडे लक्ष वेधत कडवा धरणातील पाणीपुरवठा योजना त्वरीत कार्यान्वित करावी व या योजनेचे देखील नियोजन करून शहरवासियांनी कृत्रिम पाणीटंचाईतून मुक्तता करावी असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक