शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मूकबधिर, विधवा, घटस्फोटिताही चालेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:55 IST

शेती व्यवसाय एकूणच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असल्याने त्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन व मुलींची खेड्याकडे जाण्यास नापसंती यामुळे शेतकरी कुटुंबीयांसाठी वधूसंशोधनाचा विषय सध्या चिंतेची बाब बनली आहे. परिणामी उपवर मुले मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाह करण्यास तयार झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटितांच्या वधू-वर मेळाव्यात अशा जवळपास दीडशे उपवर मुलांनी हजेरी लावल्याने त्यांच्या लग्नाची व्यथा समोर आली.

ठळक मुद्देउपवरांची व्यथा : कुणी बायको देता का बायको म्हणण्याची वेळ

संदीप भालेराव ।नाशिक : शेती व्यवसाय एकूणच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असल्याने त्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन व मुलींची खेड्याकडे जाण्यास नापसंती यामुळे शेतकरी कुटुंबीयांसाठी वधूसंशोधनाचा विषय सध्या चिंतेची बाब बनली आहे. परिणामी उपवर मुले मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाह करण्यास तयार झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटितांच्या वधू-वर मेळाव्यात अशा जवळपास दीडशे उपवर मुलांनी हजेरी लावल्याने त्यांच्या लग्नाची व्यथा समोर आली.केवळ शहरातच नव्हे; तर गावागावांत उपवर मुलांची संख्या वाढली आहे. त्यात शेतकरी कुटुंबातील मुलांचे प्रमाण जास्त आहे.विदर्भ आणि भंडाऱ्यात ही संख्या मोठी असल्याचे सांगितले जात असताना नगर आणि नाशिक जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसल्याची बाब वधू-वर मेळाव्यातील उपस्थितीवरून समोर आली.रविवारी (दि.२३) नाशिकच्या कालिदास कलामंदिरात सर्वजातीय मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटित, वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात धडधाकट आणि प्रथम विवाहोत्सुक शेतकरी मुलांनीदेखील आपल्या जीवनसाथीचा याठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिडशेपेक्षा अधिक उपवरांनी आपली नावे नोंदविली. परंतु मुलींची संख्या कमी असल्याने अनेकांचे अर्ज ऐनवेळी नाकारण्याची वेळ आयोजकांवर आली. त्यातील काहींना संधी मिळाली तेव्हा त्यांनी मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाहाची तयारी दर्शविली. त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील आपली अशीच भावना बोलून दाखविली. कुणी भावासाठी, कुणी दिरासाठी तर कुणी आपल्या मुलांसाठीचे प्रस्ताव उपस्थितांसमोर ठेवले.पूर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीच्या पालकांची धावपळ होत होती. परंतु बदलत्या परिस्थितीत शेतकरी मुलाच्या पालकांना मुलींसाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. आता तर विवाहासाठी कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता शेतकरी मुलांची झालेली आहे असेच या घटनेवरून दिसून येते.विवाहासाठी तडजोडीची तयारीपूर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीच्या पालकांची धावपळ होत होती, परंतु बदलत्या परिस्थितीत शेतकरी मुलाच्या पालकांना मुलींसाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. आता तर विवाहासाठी कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता शेतकरी मुलांची झालेली आहे असेच या घटनेवरून दिसून येते.

टॅग्स :marriageलग्न