शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मूकबधिर, विधवा, घटस्फोटिताही चालेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:55 IST

शेती व्यवसाय एकूणच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असल्याने त्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन व मुलींची खेड्याकडे जाण्यास नापसंती यामुळे शेतकरी कुटुंबीयांसाठी वधूसंशोधनाचा विषय सध्या चिंतेची बाब बनली आहे. परिणामी उपवर मुले मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाह करण्यास तयार झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटितांच्या वधू-वर मेळाव्यात अशा जवळपास दीडशे उपवर मुलांनी हजेरी लावल्याने त्यांच्या लग्नाची व्यथा समोर आली.

ठळक मुद्देउपवरांची व्यथा : कुणी बायको देता का बायको म्हणण्याची वेळ

संदीप भालेराव ।नाशिक : शेती व्यवसाय एकूणच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असल्याने त्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन व मुलींची खेड्याकडे जाण्यास नापसंती यामुळे शेतकरी कुटुंबीयांसाठी वधूसंशोधनाचा विषय सध्या चिंतेची बाब बनली आहे. परिणामी उपवर मुले मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाह करण्यास तयार झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटितांच्या वधू-वर मेळाव्यात अशा जवळपास दीडशे उपवर मुलांनी हजेरी लावल्याने त्यांच्या लग्नाची व्यथा समोर आली.केवळ शहरातच नव्हे; तर गावागावांत उपवर मुलांची संख्या वाढली आहे. त्यात शेतकरी कुटुंबातील मुलांचे प्रमाण जास्त आहे.विदर्भ आणि भंडाऱ्यात ही संख्या मोठी असल्याचे सांगितले जात असताना नगर आणि नाशिक जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसल्याची बाब वधू-वर मेळाव्यातील उपस्थितीवरून समोर आली.रविवारी (दि.२३) नाशिकच्या कालिदास कलामंदिरात सर्वजातीय मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटित, वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात धडधाकट आणि प्रथम विवाहोत्सुक शेतकरी मुलांनीदेखील आपल्या जीवनसाथीचा याठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिडशेपेक्षा अधिक उपवरांनी आपली नावे नोंदविली. परंतु मुलींची संख्या कमी असल्याने अनेकांचे अर्ज ऐनवेळी नाकारण्याची वेळ आयोजकांवर आली. त्यातील काहींना संधी मिळाली तेव्हा त्यांनी मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाहाची तयारी दर्शविली. त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील आपली अशीच भावना बोलून दाखविली. कुणी भावासाठी, कुणी दिरासाठी तर कुणी आपल्या मुलांसाठीचे प्रस्ताव उपस्थितांसमोर ठेवले.पूर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीच्या पालकांची धावपळ होत होती. परंतु बदलत्या परिस्थितीत शेतकरी मुलाच्या पालकांना मुलींसाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. आता तर विवाहासाठी कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता शेतकरी मुलांची झालेली आहे असेच या घटनेवरून दिसून येते.विवाहासाठी तडजोडीची तयारीपूर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीच्या पालकांची धावपळ होत होती, परंतु बदलत्या परिस्थितीत शेतकरी मुलाच्या पालकांना मुलींसाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. आता तर विवाहासाठी कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता शेतकरी मुलांची झालेली आहे असेच या घटनेवरून दिसून येते.

टॅग्स :marriageलग्न