शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिर, विधवा, घटस्फोटिताही चालेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:55 IST

शेती व्यवसाय एकूणच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असल्याने त्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन व मुलींची खेड्याकडे जाण्यास नापसंती यामुळे शेतकरी कुटुंबीयांसाठी वधूसंशोधनाचा विषय सध्या चिंतेची बाब बनली आहे. परिणामी उपवर मुले मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाह करण्यास तयार झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटितांच्या वधू-वर मेळाव्यात अशा जवळपास दीडशे उपवर मुलांनी हजेरी लावल्याने त्यांच्या लग्नाची व्यथा समोर आली.

ठळक मुद्देउपवरांची व्यथा : कुणी बायको देता का बायको म्हणण्याची वेळ

संदीप भालेराव ।नाशिक : शेती व्यवसाय एकूणच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असल्याने त्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन व मुलींची खेड्याकडे जाण्यास नापसंती यामुळे शेतकरी कुटुंबीयांसाठी वधूसंशोधनाचा विषय सध्या चिंतेची बाब बनली आहे. परिणामी उपवर मुले मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाह करण्यास तयार झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटितांच्या वधू-वर मेळाव्यात अशा जवळपास दीडशे उपवर मुलांनी हजेरी लावल्याने त्यांच्या लग्नाची व्यथा समोर आली.केवळ शहरातच नव्हे; तर गावागावांत उपवर मुलांची संख्या वाढली आहे. त्यात शेतकरी कुटुंबातील मुलांचे प्रमाण जास्त आहे.विदर्भ आणि भंडाऱ्यात ही संख्या मोठी असल्याचे सांगितले जात असताना नगर आणि नाशिक जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसल्याची बाब वधू-वर मेळाव्यातील उपस्थितीवरून समोर आली.रविवारी (दि.२३) नाशिकच्या कालिदास कलामंदिरात सर्वजातीय मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटित, वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात धडधाकट आणि प्रथम विवाहोत्सुक शेतकरी मुलांनीदेखील आपल्या जीवनसाथीचा याठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिडशेपेक्षा अधिक उपवरांनी आपली नावे नोंदविली. परंतु मुलींची संख्या कमी असल्याने अनेकांचे अर्ज ऐनवेळी नाकारण्याची वेळ आयोजकांवर आली. त्यातील काहींना संधी मिळाली तेव्हा त्यांनी मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाहाची तयारी दर्शविली. त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील आपली अशीच भावना बोलून दाखविली. कुणी भावासाठी, कुणी दिरासाठी तर कुणी आपल्या मुलांसाठीचे प्रस्ताव उपस्थितांसमोर ठेवले.पूर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीच्या पालकांची धावपळ होत होती. परंतु बदलत्या परिस्थितीत शेतकरी मुलाच्या पालकांना मुलींसाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. आता तर विवाहासाठी कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता शेतकरी मुलांची झालेली आहे असेच या घटनेवरून दिसून येते.विवाहासाठी तडजोडीची तयारीपूर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीच्या पालकांची धावपळ होत होती, परंतु बदलत्या परिस्थितीत शेतकरी मुलाच्या पालकांना मुलींसाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. आता तर विवाहासाठी कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता शेतकरी मुलांची झालेली आहे असेच या घटनेवरून दिसून येते.

टॅग्स :marriageलग्न