शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

मूकबधिर, विधवा, घटस्फोटिताही चालेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:55 IST

शेती व्यवसाय एकूणच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असल्याने त्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन व मुलींची खेड्याकडे जाण्यास नापसंती यामुळे शेतकरी कुटुंबीयांसाठी वधूसंशोधनाचा विषय सध्या चिंतेची बाब बनली आहे. परिणामी उपवर मुले मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाह करण्यास तयार झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटितांच्या वधू-वर मेळाव्यात अशा जवळपास दीडशे उपवर मुलांनी हजेरी लावल्याने त्यांच्या लग्नाची व्यथा समोर आली.

ठळक मुद्देउपवरांची व्यथा : कुणी बायको देता का बायको म्हणण्याची वेळ

संदीप भालेराव ।नाशिक : शेती व्यवसाय एकूणच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असल्याने त्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन व मुलींची खेड्याकडे जाण्यास नापसंती यामुळे शेतकरी कुटुंबीयांसाठी वधूसंशोधनाचा विषय सध्या चिंतेची बाब बनली आहे. परिणामी उपवर मुले मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाह करण्यास तयार झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटितांच्या वधू-वर मेळाव्यात अशा जवळपास दीडशे उपवर मुलांनी हजेरी लावल्याने त्यांच्या लग्नाची व्यथा समोर आली.केवळ शहरातच नव्हे; तर गावागावांत उपवर मुलांची संख्या वाढली आहे. त्यात शेतकरी कुटुंबातील मुलांचे प्रमाण जास्त आहे.विदर्भ आणि भंडाऱ्यात ही संख्या मोठी असल्याचे सांगितले जात असताना नगर आणि नाशिक जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसल्याची बाब वधू-वर मेळाव्यातील उपस्थितीवरून समोर आली.रविवारी (दि.२३) नाशिकच्या कालिदास कलामंदिरात सर्वजातीय मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटित, वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात धडधाकट आणि प्रथम विवाहोत्सुक शेतकरी मुलांनीदेखील आपल्या जीवनसाथीचा याठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिडशेपेक्षा अधिक उपवरांनी आपली नावे नोंदविली. परंतु मुलींची संख्या कमी असल्याने अनेकांचे अर्ज ऐनवेळी नाकारण्याची वेळ आयोजकांवर आली. त्यातील काहींना संधी मिळाली तेव्हा त्यांनी मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाहाची तयारी दर्शविली. त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील आपली अशीच भावना बोलून दाखविली. कुणी भावासाठी, कुणी दिरासाठी तर कुणी आपल्या मुलांसाठीचे प्रस्ताव उपस्थितांसमोर ठेवले.पूर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीच्या पालकांची धावपळ होत होती. परंतु बदलत्या परिस्थितीत शेतकरी मुलाच्या पालकांना मुलींसाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. आता तर विवाहासाठी कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता शेतकरी मुलांची झालेली आहे असेच या घटनेवरून दिसून येते.विवाहासाठी तडजोडीची तयारीपूर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीच्या पालकांची धावपळ होत होती, परंतु बदलत्या परिस्थितीत शेतकरी मुलाच्या पालकांना मुलींसाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. आता तर विवाहासाठी कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता शेतकरी मुलांची झालेली आहे असेच या घटनेवरून दिसून येते.

टॅग्स :marriageलग्न