शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:31 IST

मोकभणगीत बैठक : शेतकऱ्यांचा आंदोलनाचा निर्धार

ठळक मुद्देकळवण तालुका विरु ध्द सटाणा नगरपालिका असा संघर्ष आता पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कळवण : तालुक्यातील जलाशयात असलेल्या पाण्यावर प्रथम हक्क तालुक्यातील जनतेचा असल्याने अर्जुनसागर(पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरापर्यत जलवाहिनी टाकण्यास तिव्र विरोध दर्शवत कळवण तालुक्यातून जलवाहिनी जाऊ देणार नाही, यासाठी जनआंदोलन करण्याचा निर्धार मोकभणगी येथे बुधवारी (दि.६) झालेल्या बैठकीत शेतक-यांनी केला.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाशवभूमीवर सटाणा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ९ फेब्रुवारी रोजी होत असल्याने कळवण तालुक्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. मोकभणगी येथे आयोजित लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार,बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे, पंचायत समितीचे सभापती केदा ठाकरे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव,मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, बाजार समितीचे संचालक शितलकुमार अहिरे, मोहन जाधव, शांताराम जाधव , रायुकॉचे तालुका कार्याध्यक्ष संदीप वाघ यांनी विरोध दर्शवत कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन जनआंदोलन करण्याचा इशारा दिल्याने कळवण तालुका विरु ध्द सटाणा नगरपालिका असा संघर्ष आता पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान सटाणा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात ८ फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयाला घेराव व कोल्हापूर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन तर ९ फेब्रुवारी रोजी अर्जुनसागर(पुनंद)प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी यावेळी दिली.जलवाहिनीला विरोधमोकभणगी येथे अर्जुनसागर(पुनंद)प्रकल्प लाभक्षेत्रातील 40 गाव वाड्या वस्तीवरील प्रमुख पदाधिकारी व शेतकरी बांधवांची बैठक शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनीअर्जुनसागर(पुनंद) मधून जलवाहीनीद्वारे पाणी पुरवठा योजना राबविल्यास मोठे संकट उभे राहणार असल्याचे सांगत हा जीवनमरणाचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले. रवींद्र देवरे यांनी चणकापूरमधून मालेगावसाठी पाणी आरक्षणात सातत्याने वाढ झाल्याने शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बांधवांना आज पाणी मिळत नसल्याचे सांगितले. बैठकीचे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी कळवण तालुक्यातून पाणी बाहेर पडू देणार नसल्याचे स्पष्ट केले. बैठकीस लाभक्षेत्रातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी