शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:31 IST

मोकभणगीत बैठक : शेतकऱ्यांचा आंदोलनाचा निर्धार

ठळक मुद्देकळवण तालुका विरु ध्द सटाणा नगरपालिका असा संघर्ष आता पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कळवण : तालुक्यातील जलाशयात असलेल्या पाण्यावर प्रथम हक्क तालुक्यातील जनतेचा असल्याने अर्जुनसागर(पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरापर्यत जलवाहिनी टाकण्यास तिव्र विरोध दर्शवत कळवण तालुक्यातून जलवाहिनी जाऊ देणार नाही, यासाठी जनआंदोलन करण्याचा निर्धार मोकभणगी येथे बुधवारी (दि.६) झालेल्या बैठकीत शेतक-यांनी केला.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाशवभूमीवर सटाणा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ९ फेब्रुवारी रोजी होत असल्याने कळवण तालुक्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. मोकभणगी येथे आयोजित लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार,बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे, पंचायत समितीचे सभापती केदा ठाकरे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव,मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, बाजार समितीचे संचालक शितलकुमार अहिरे, मोहन जाधव, शांताराम जाधव , रायुकॉचे तालुका कार्याध्यक्ष संदीप वाघ यांनी विरोध दर्शवत कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन जनआंदोलन करण्याचा इशारा दिल्याने कळवण तालुका विरु ध्द सटाणा नगरपालिका असा संघर्ष आता पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान सटाणा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात ८ फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयाला घेराव व कोल्हापूर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन तर ९ फेब्रुवारी रोजी अर्जुनसागर(पुनंद)प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी यावेळी दिली.जलवाहिनीला विरोधमोकभणगी येथे अर्जुनसागर(पुनंद)प्रकल्प लाभक्षेत्रातील 40 गाव वाड्या वस्तीवरील प्रमुख पदाधिकारी व शेतकरी बांधवांची बैठक शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनीअर्जुनसागर(पुनंद) मधून जलवाहीनीद्वारे पाणी पुरवठा योजना राबविल्यास मोठे संकट उभे राहणार असल्याचे सांगत हा जीवनमरणाचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले. रवींद्र देवरे यांनी चणकापूरमधून मालेगावसाठी पाणी आरक्षणात सातत्याने वाढ झाल्याने शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बांधवांना आज पाणी मिळत नसल्याचे सांगितले. बैठकीचे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी कळवण तालुक्यातून पाणी बाहेर पडू देणार नसल्याचे स्पष्ट केले. बैठकीस लाभक्षेत्रातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी