शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

पाणी टंचाईमुळे खरीप लांबणीवर पडण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 17:40 IST

नायगाव : यावर्षी भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जून महिना तोंडावर येवूनही खरीप हंगामाची पूर्व तयारी कोलमडून पडल्याचे चित्र नायगाव खोऱ्यात पहावयास मिळत आहे.

नायगाव : यावर्षी भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जून महिना तोंडावर येवूनही खरीप हंगामाची पूर्व तयारी कोलमडून पडल्याचे चित्र नायगाव खोऱ्यात पहावयास मिळत आहे. तीव्र पाणी टंचाई व आर्थिक अडचणीमुळे खरीप हंगाम लांबण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.सलग गेल्या तीन वर्षापासून पर्जन्यमान घटत असल्याने तर यावर्षी अत्यल्प पडलेल्या पावसामुळे कधी नव्हे एवढी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या नायगाव खोºयातील विहिरींनी तळ गाठले आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. खरीपाची पूर्व तयारीही कोलमडुन पडली आहे. जून महिना तोंडावर येवून ठेपला असतांनाही सर्वच शेती अजुनही मशागती विना पडुन असल्याचे चित्र नायगाव खोºयात बघावयास मिळत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुरवातीपासून शेतकरी खरीपाच्या तयारीला लागत असतात. यंदा मात्र सर्वच विहिरी कोरड्याठाक असल्यामुळे तसेच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने खरीपाच्या विविध रोपांची लागवड खोळंबली आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी खरीपाच्या हंगामातील पिकांची लागवडी बरोबर शेतीच्या मशागतीचे कामे हाती घेतात. यंदा मात्र तीव्र पाणी टंचाई असल्याने खरीपाच्या रोपांची लागवड करता येत नसल्याने जूनच्या प्रारंभी होणारी खरीपाची लागवड लांबणीवर जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बेभरोशाचा बनण्याचे चिन्ह दिसत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी