शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

पाणी टंचाईमुळे खरीप लांबणीवर पडण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 17:40 IST

नायगाव : यावर्षी भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जून महिना तोंडावर येवूनही खरीप हंगामाची पूर्व तयारी कोलमडून पडल्याचे चित्र नायगाव खोऱ्यात पहावयास मिळत आहे.

नायगाव : यावर्षी भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जून महिना तोंडावर येवूनही खरीप हंगामाची पूर्व तयारी कोलमडून पडल्याचे चित्र नायगाव खोऱ्यात पहावयास मिळत आहे. तीव्र पाणी टंचाई व आर्थिक अडचणीमुळे खरीप हंगाम लांबण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.सलग गेल्या तीन वर्षापासून पर्जन्यमान घटत असल्याने तर यावर्षी अत्यल्प पडलेल्या पावसामुळे कधी नव्हे एवढी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या नायगाव खोºयातील विहिरींनी तळ गाठले आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. खरीपाची पूर्व तयारीही कोलमडुन पडली आहे. जून महिना तोंडावर येवून ठेपला असतांनाही सर्वच शेती अजुनही मशागती विना पडुन असल्याचे चित्र नायगाव खोºयात बघावयास मिळत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुरवातीपासून शेतकरी खरीपाच्या तयारीला लागत असतात. यंदा मात्र सर्वच विहिरी कोरड्याठाक असल्यामुळे तसेच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने खरीपाच्या विविध रोपांची लागवड खोळंबली आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी खरीपाच्या हंगामातील पिकांची लागवडी बरोबर शेतीच्या मशागतीचे कामे हाती घेतात. यंदा मात्र तीव्र पाणी टंचाई असल्याने खरीपाच्या रोपांची लागवड करता येत नसल्याने जूनच्या प्रारंभी होणारी खरीपाची लागवड लांबणीवर जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बेभरोशाचा बनण्याचे चिन्ह दिसत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी