शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

इगपुरीत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे

By admin | Updated: July 2, 2014 00:22 IST

इगपुरीत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे

 

सुनील शिंदे

घोटीइगतपुरी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती सत्ताधारी सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत नाराज सदस्यांनी सभापती आणि उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यास पंचायत समितीमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींवर अविश्वास दाखल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही रामदास घारे यांच्याविरुद्ध तत्कालीन सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. तो मंजूरही झाला. परंतु त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. विद्यमान स्थितीत कॉँग्रेसने मनसेच्या मदतीने सत्ता स्थापन करून मनसेला उपसभापतिपद देऊ केले होते. दोन वर्ष कोणताही विरोध न होता पंचायत समितीचा कारभार सुरळीत चालू होता. असे असताना अविश्वास दाखल करण्याची वेळ का आली? यावर सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही पंचायत समिती ताब्यात घेताना कॉँग्रेसने मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला विश्वासात न घेता मनसेच्या दोन सदस्यांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. अनुसूचित जमाती महिलेसाठी सभापतिपद आरक्षित असल्याने ठकूबाई सावंत सभापतिपदी विराजमान झाल्या तर उपसभापतिपदी मनसेचे रमेश जाधव यांना संधी मिळाली. सत्ताबदल झाल्यानंतर तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र नवीन सभापती आणि उपसभापतींनी मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही. या आणि इतर कारणांमुळे सदस्यांत नाराजी होती. यातूनच अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.अविश्वास ठराव मंजूर झाल्यास सभापतिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिजाबाई कौले यांना सभापतिपद मिळेल हे निश्चित समजले जाते, तर उपसभापति-पदासाठी गोपाळ लहांगे, पांडुरंग वारुंगसे यांच्या नावाची चर्चा असून, यात कोण बाजी मारते हे आगामी कालच ठरविणार आहे.