शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

नांदूरशिंगोटे परिसरात बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 14:38 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारातील नाशिक - पुणे रस्त्यालगत असलेल्या कोलथाडवाडी भागात सोमवारी सायंकाळी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारातील नाशिक - पुणे रस्त्यालगत असलेल्या कोलथाडवाडी भागात सोमवारी सायंकाळी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. वन्य प्राणी दिवसाही पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. भोजापूर खोरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. परिसरातील कोलथाडवाडी भागातील दक्षिणेच्या बाजूला डोंगराळ भाग तसेच वन जंगल आहे. वृक्षाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात वन्यप्राण्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा आहे. नांदूरशिंगोटे परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने जंगलातील मोर, बिबटे, तरस, लांडगे आदी वन्य प्राणी दिवसाही पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. शेतकरी दिवसभर शेतात काम करतांना आपला जीव मुठीत धरून काम करतात. या परिसरात नेहमीच बिबटयाचा वावर असतो. बिबटेही दिवसा या भागात पाण्याच्या शोधार्थ भटकंती करतांना दिसत आहे. या भागात शेतमजूर कामासाठी जाण्यासाठी धजावत नाही. उन्हाच्या तीव्रतेने बिबटे जंगला बाहेर येत आहे. कोलथाडवाडी भागात सोमवार (दि.१२) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डोंगराच्या भागातून नाशिक - पुणे हायवे क्रॉस करत बिबट्या वस्तीकडे जात होता. त्याच दरम्यान या भागात राहणारे संजय संतू शेळके व महादू शेळके यांना बिबट्या दिसला. त्यानतंर बिबट्याने डाळींबाच्या बागेत गेल्याचे समजले. त्या भागातील शेतकºयांनी रात्री फटाके फोडून बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. वनविभागाने या ठिकाणी पिंजरे लावून बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे.पाणवठे उभारण्याची गरजनांदूरशिंगोटेजवळील चास खिंड, नाशिक- पुणे महामार्गालगत डोंगराच्या पायथ्याशी वनजंगल आहे. त्याठिकाणी वनविभागाने वनतळे बनविले आहे. त्यामुळे त्याठिकाणी बिबटे व अन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येथे येत असतात. मात्र, गेल्या वर्षापासून पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने वनतळे कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे बिबटे, मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधार्थ येत आहे. डोंगराळ भागात बिबटे व वन्य प्राण्यांना पिण्यासाठी ठिक-ठिकाणी पाणवटे उभारले तर दिवसाढवळ्या बिबटे मानवी वस्तीकडे चाल करणार नाही. बिबट्यासाठी पाणवटे उभारण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक