शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उड्डाणपुलाच्या दुभाजकात वाढली झुडुपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:11 IST

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलावरील दुभाजकामध्ये गाजर गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक काळवंडून गेल्याने अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअपघाताला निमंत्रण : महापालिकेचे दुर्लक्ष, फुलझाडे लावण्याची मागणी

नाशिकरोड : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलावरील दुभाजकामध्ये गाजर गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक काळवंडून गेल्याने अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.सावरकर उड्डाणपुलावरील दुभाजकामध्ये शोभेच्या झाडांसाठी लावलेल्या कुंड्यांमधील शोभेची झाडे वाळून गेले आहेत. त्याठिकाणी गाजरगवत व झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याकडे मनपा उद्यान विभाग दुर्लक्ष करत असल्याने उड्डाणपुलाची शोभाच लयास गेली आहे. वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक व उडानपुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे काळवंडून गेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना रात्री निश्चित अंदाज येत नाही तसेच सिन्नरफाटा येथून उड्डाणपूल चढताना दुभाजक म्हणून लावलेले दगड हे दिसतच नसल्याने अनेक वेळा वाहने त्याच्यावरून जात असल्याने अपघात होऊन वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी मातीने पाण्याचा निचरा होणारा खड्डा बुजून गेल्याने त्याठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरून चारचाकी वाहने साचलेल्या पाण्यातून गेल्यावर उडणारे पाणी हे खाली रस्त्यावर पडते. अचानक वरून मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहनधारकांवर अथवा पादचाऱ्यांवर पडल्याने ते घाबरून जातात. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा होणारे खड्डे मोकळे करावेत तसेच दुभाजक व दोन्ही बाजूच्या संरक्षक कठडे यांना रंगरंगोटी करून रिफ्लेक्टर लावावे. उद्यान विभागाने दुभाजकावरील कुंड्यांची स्वच्छता करून नवीन माती टाकून शोभेची रंगीबेरंगी फुलांची झाडे लावून उड्डाणपुलाची शोभा वाढवावी अशी मागणी केली जात आहे.फलकांची गरजमनपा बांधकाम विभागाने उड्डाणपुलाच्या दुभाजकाला व दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंतींना नव्याने रंगरंगोटी करून रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे. सिन्नरफाटा येथून उड्डाणपूल सुरू होताना दुभाजक म्हणून लावलेल्या दगडाच्या ठिकाणी वाहनधारकांच्या सुरक्षितेसाठी फलक लावणे गरजेचे आहे.

टॅग्स :NashikनाशिकSmart Cityस्मार्ट सिटी