शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

श्रावणसरी कोसळल्याने खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:31 IST

सायखेडा : पसिरात श्रावणसरींनी खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाअभावी पिके सुकू लागली होती. दोन दिवसांपासून परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सायखेडा : पसिरात श्रावणसरींनी खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाअभावी पिके सुकू लागली होती. दोन दिवसांपासून परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे परिसरातील पाझर तलाव, बंधारे ओसांडून वाहू लागले आहेत. या पाण्याचा पीकवाढीसाठी फायदा होणार असून, शेतकरी आनंदी झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतीतील सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद आदी पिके पावसाअभावी सुकू लागली होती. दुबार पेरणीचे संकट निर्माण होते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. एरंडगाव शिवारात जलस्त्रोत पावसामुळे झाले प्रवाहित एरंडगावी प्रदीर्घ काळाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने शिवार ओलेचिंब झाले आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग येणार आहे. नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. शेतकºयांनी खरिपातील बाजरी, सोयाबीन, मका, मूग, भुईमूग, कपाशीची लागवड केली होती. सुरू असलेल्या पावसाने या पिकांना संजीवनी मिळाली आहे. सध्या शिवार हिरवाईने नटला आहे. घंट्या-घुगंरांचा आवाज शेतशिवारात घुमू लागला आहे. सुगीचा हंगाम असल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून घरी बसून असलेल्या मजूर वर्गाच्या हाताला काम मिळाले आहे. श्रावण महिना सुरू झाला आणि संततधारेला सुरुवात झाली. हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरला आहे. पावसामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.----------------मृग नक्षत्रात पडलेला पावसावर शेतकºयांनी मका, सोयाबीन, उडीद, भुईमूग आदी पिकांच्या पेरण्या केल्या होत्या. पेरणीदरम्यान चांगला पाऊस झाल्याने उगवण उत्तम होती. मात्र अचानक पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत भर पडली होती. श्रावणसरींनी पिकांना जीवदान मिळाले आहे.- संदीप बागलशेतकरी, बागलवाडी

टॅग्स :Nashikनाशिक