शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

व्रतवैकल्य सणांचा श्रावण मास यंदा घरातच होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:36 IST

नाशिक : भारतीय संस्कृतीत श्रावणमासाला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या श्रावणमासाला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, या महिन्यात श्रावणी सोमवार, राखीपौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौर, श्रीकृष्णजन्माष्टमी ,पोळा (पिठोरी अमावस्या) असे अनेक सण-उत्सव येतात. यानिमित्त मठ, मंदिरांमध्ये पूजा, पाठ, अभिषेक आदी धार्मिक विधी होता. यंदा मात्र या सण-उत्सवांवर कोरोनाचे मोठे सावट असून मठ, मंदिरे बंद असल्याने सर्व भाविकांना घरच्या घरीच श्रावणमास साजरा करावा लागणार आहे.

नाशिक : भारतीय संस्कृतीत श्रावणमासाला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या श्रावणमासाला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, या महिन्यात श्रावणी सोमवार, राखीपौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौर, श्रीकृष्णजन्माष्टमी ,पोळा (पिठोरी अमावस्या) असे अनेक सण-उत्सव येतात. यानिमित्त मठ, मंदिरांमध्ये पूजा, पाठ, अभिषेक आदी धार्मिक विधी होता. यंदा मात्र या सण-उत्सवांवर कोरोनाचे मोठे सावट असून मठ, मंदिरे बंद असल्याने सर्व भाविकांना घरच्या घरीच श्रावणमास साजरा करावा लागणार आहे.‘श्रावण मासी हर्ष मानसी...’ असा सर्वांना आनंद देणारा श्रावण मास धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्याला सणांचा असेही म्हटले जाते. कारण यातील प्रत्येक दिवस हा एकप्रकारे सण-उत्सवाचा असल्याने यात धार्मिक विधी व व्रतवैकल्य केल्यास अधिक लाभ होतो, अशी धारणा आहे. त्यातच नाशिकनगरी तीर्थक्षेत्र असल्याने श्रावण मासात दर सोमवारी शिवापूजन, तर मंगळवार मुली मंगळागौरीची पूजा करतात व गुरु वारी गुरुचरित्राचा पाठ, तर शुक्र वारी श्री लक्ष्मीची पूजा करतात. शनिवारी शनिदेवाला नारळ फोडतात .रविवारी आदित्याची(सूर्याची) पूजा, तर नागपंचमी या दिवशी नागाची पूजा केली जाते. नारळी पौर्णिमा ही राखी पौर्णिमा म्हणून ही ओळखले जाते. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण अष्टमी असे म्हणतात. या महिन्याच्या अमावास्येला पिठोरी अमावस्या व्रत करतात व याच दिवशी शेतकरी पोळा सण साजरा करतात.विशेष म्हणजे श्रावणात चातुर्मासाचे महत्त्व आहे, प्रत्येक वर्षातील अशा शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळात चातुर्मास असे म्हटले जाते. चातुर्मास काळात व पुण्यसंचय करण्याचा काळ मानला जातो. या काळात सर्व समुद्र नदी तलाव आदी ठिकाणी स्नान करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते. चातुर्मासात येणारा श्रावण मास अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जातो. या काळात घरोघरी शिवलिंगाची पूजा करतात. तसेच मंदिरांमध्येदेखील धार्मिक विधी होतात. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, त्यासाठी एकमेकांच्या घरी जातात. परंतु कोरोनामुळे हा सणदेखील सोशल मीडियावर साजरा होईल, असे दिसून येते. नागपंचमीला नागाची पूजा करण्याची प्रथा आहे, परंतु या दिवशीदेखील महिलांना घराबाहेर पडता येणे शक्य नाही. यंदा शहरातील अनेक मंडळांनी दहीहंडीचा उत्सवदेखील रद्द करण्यात आलेला आहे.------------प्रत्येक श्रावणी सोमवार शिवपूजन करण्याची प्रथा असून, याच महिन्यात अनेक सण उत्सव येत असल्याने एकप्रकारे धार्मिक पर्वणीच असते. या महिन्यात बहुतेक दिवशी काही ना काही धार्मिक कृत्य सांगितले आहे. परंतु, यंदा भाविकांनी सर्व सण, उत्सव घरीच साजरे करावेत, मंदिरात गर्दी करू नये.- रवींद्र पैठणे, वैदविद्या व धार्मिक अभ्यासक

टॅग्स :Nashikनाशिक