शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:51 IST

विविध मागण्यां :  शेतक-यांच्या मागण्यांचे निवेदन

ठळक मुद्देमोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर पदाधिका-यांनी शेतक-यांचे प्रश्न मांडलेआदिम जमात शेतमजुर भुमिहीन व कामगारांच्या राहत्या घरांच्या जागा त्यांच्या नावे करण्याची तात्काळ कार्यवाही करावी, या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन

त्र्यंबकेश्वर : शेतक-यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य श्रमजीवी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.८) त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सकाळी ११ वाजता त्र्यंबकेश्वर येथील वाहन तळावरु न मोर्चा घोषणा देत त्र्यंबकेश्वर तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर पदाधिका-यांनी शेतक-यांचे प्रश्न मांडले. शेतकरी अल्पभूधारक व वनहक्क प्लॉटधारक यांना शेती लागवडीसाठी रोजगार हमी योजनेत सामावुन घेण्यात यावे. दि. २७ एप्रिल २०१८ च्या आदेशानुसार आदिम जमात शेतमजुर भुमिहीन व कामगारांच्या राहत्या घरांच्या जागा त्यांच्या नावे करण्याची तात्काळ कार्यवाही करावी, या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ९ आॅगस्ट हा दिवस क्रांतीदिन साजरा करण्याबरोबरच जागतिक आदिवासी दिन म्हणूनही पाळला जातो. त्या पार्श्वभुमीवर आदिवासी शेतक-यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी निवेदन देण्यात आले. मोर्चात जिल्हाध्यक्ष गौतम अंबापुरे, जिल्हा युवक प्रमुख भगवान डोखे, शहर प्रमुख माजी सैनिक रामराव लोंढे, तालुकाध्यक्ष शिवाजी दराने, तानाजी शिंदे, बारकु वारे, रामदास भगत, मिराबाई लहांगे आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.तहसिलदारांनी स्वीकारले निवेदनसध्या सरकारी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे त्र्यंंबकेश्वर तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारीही संपावर गेले असल्याने तहसिलदार महेन्द्र पवार यांनी स्वत: मोर्चाला सामोरे जाऊन कार्यालयात निवेदन स्विकारले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी