शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वसुली दाखवा... तरच पगार

By admin | Updated: June 1, 2017 01:42 IST

नाशिक : चालू महिन्याची वसुली पूर्ण केली नाही म्हणून महावितरणच्या नाशिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार रोखल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : चालू महिन्याची वसुली पूर्ण केली नाही म्हणून महावितरणच्या नाशिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार रोखल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. महसूल विभागाच्या बैठकीत स्वत:चे अपयश लपविण्यासाठी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जोपर्यंत वसुली पूर्ण होणार नाही, तोपर्यंत पगार देऊ नका, असा परस्पर शब्द दिल्याने कर्मचाऱ्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, वरिष्ठांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नाशिक विभागात चालू महिन्याची थकबाकीची पूर्णत: वसुली झाली नसल्याने, महसूल विभागाच्या बैठकीत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. अपयशाचे खापर आपल्यावर फोडले जाऊ नये, या भीतीने वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांचे मत विचारात न घेताच परस्पर ‘जोपर्यंत वसुली पूर्ण होत नाही, तोपर्यंत पगार देऊ नका’ असा शब्द देऊन टाकला. शिवाय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराची वरिष्ठ पातळीवर मागणीही केली नाही. त्यामुळे महिना संपूनदेखील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झाला नसल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. वास्तविक महिन्याच्या तीन दिवस अगोदरच म्हणजेच २८ किंवा २९ तारखेला कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या खात्यात जमा केले जातात. परंतु या महिन्यात पगारच झाला नसल्याच्या जेव्हा तक्रारी समोर आल्या तेव्हा वरिष्ठांचा हा प्रताप समोर आला. दरम्यान, पगार झाला नसल्याने कर्मचाऱ्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच घराचे, एलआयसीचे हप्ते शिवाय इतर कर्जाचे हफ्ते जात असल्याने त्यावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, याविषयी महावितरणच्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना जाब विचारला असता त्यांनी आपण सन्मानाने पगार होऊ दिले नसल्याचे उत्तर दिले. मुख्य अभियत्यांचे हे उत्तर ऐकूण पदाधिकारीही अचंबित झाले असून, ‘सन्मान’चा नेमका अर्थ काय? असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे. यावेळी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय का घेतला गेला नाही? असा सवालही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.