शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक वास्तव : राज्यात आठ वर्षांत ६०० बिबट्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 07:11 IST

राज्यभरात बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी मार्जार कुळातील चपळ बिबट्याचे अस्तित्व धोक्यात आल्याची वस्तुस्थिती आहे.

- अझहर शेखनाशिक : राज्यभरात बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी मार्जार कुळातील चपळ बिबट्याचे अस्तित्व धोक्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. आठ वर्षांमध्ये राज्यभरात सुमारे ६०० बिबट्यांचा मृत्यू झाला. चालू वर्षाची स्थिती भयावह असून, सुरुवातीच्या दोन महिन्यांत २५ पेक्षा अधिक बिबटे विविध भागात मरण पावले आहेत. शिकारीचे प्रमाण जरी कमी असले तरी त्यांच्या नैसर्गिक आणि अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून दिसते.नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव, धुळे, नागपूर जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या बऱ्यापैकी आढळते. अलीकडे जंगलतोड वाढल्याने बिबट्याने शेतीचा आश्रय घेण्यास सुरुवात केली अन् मानव-बिबट संघर्ष वाढला. ऊसशेती बिबट्यासाठी सुरक्षित अधिवास ठरतो.बिबट्या केवळ ग्रामीण भागात राहतो असे नाही, तर ठाणे, मुंबई, पुण्याच्या जवळही वावरतो. चालू वर्षाची बिबट मृत्यूची आकडेवारी अद्याप वन मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.नाशिकमध्ये ४५ बिबट्यांचा मृत्यूचार वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यात ४५ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. २०१६ आणि २०१७ साली प्रत्येकी १३, २०१८ मध्ये १४ तर यावर्षी बछड्यांसह किमान ५ ते ६ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.शिकारीचेवाढते प्रकारआठ वर्षांत ७५ बिबट्यांची शिकार केली गेली. यामध्ये १० बिबट्यांवर विषप्रयोग, २३ बिबटे फास लावून ठार मारले गेले. विजेच्या धक्क्याने ७ बिबटे, बंदुकीने ६ आणि अन्य संशयास्पद शिकारीच्या पद्धतीत २९ असे एकूण ७५ बिबटे शिकारीत मृत्युमुखी पडले आहेत. 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक