शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पोलिसांच्या गराड्यात ‘शिवसन्मान जागर

By admin | Updated: August 3, 2015 00:32 IST

’प्रचंड बंदोबस्त : तणावात परिषद; पुरंदरे यांच्यावर टीका

नाशिक : हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्याने संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेली शिवसन्मान जागर परिषद आज अक्षरश: पोलिसांच्या गराड्यात पार पडली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केलेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार रद्द करावा, या मागणीसाठी घेण्यात आलेल्या या परिषदेसाठी सांगलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता; मात्र कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. राज्य सरकारने पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व अन्य पुरोगामी संघटनांच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी ही परिषद घेतली जात आहे. पंधरवड्यापूर्वी सांगली येथील परिषदेत आव्हाड यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, तसेच त्यांच्या गाड्यांची तोडफोड झाली होती. नाशिकमध्ये ही परिषद होत असल्याचे कळताच चौदा संघटनांनी या परिषदेविरोधात जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांनाच नोटीस पाठवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी सोपवली होती. या पार्श्वभूमीवर परिषदेपूर्वीच वातावरणात तणाव निर्माण झाला होता.त्यामुळे कार्यक्रमस्थळ असलेल्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहाला सायंकाळी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. कार्यक्रमाची वेळ होईपर्यंत कोणालाही आत सोडले जात नव्हते. प्रत्येकाची तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता. आव्हाड यांच्याभोवती पोलिसांचा गराडा होता; शिवाय कार्यकर्त्यांनीही विचार मंचावर त्यांच्याभोवती पूर्णवेळ कडे केले होते. परिषदेला आमदार आव्हाड यांच्यासह ‘चित्रलेखा’चे संपादक ज्ञानेश महाराव, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. डॉ. प्रतिमा परदेशी, सुरेश देसले यांची प्रमुख उपस्थिती होती. आव्हाड यांनी तासाभराच्या भाषणात बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर कठोर शब्दांत हल्ला चढवत पुरस्काराला विरोध केला. पुरंदरे यांनी इतिहासाचे विकृतीकरण करीत छत्रपती शिवरायच नव्हे, तर जिजामातेचीही बदनामी केली. हिंदू-मुस्लिमांमध्ये धार्मिक विद्वेष निर्माण केल्याच्या आरोपाखाली पुरंदरे यांना अटक करायला हवी. शिवराय हे बहुजनांचे, रयतेचे राजे होते. त्याऐवजी त्यांची हिंदुत्ववादी प्रतिमा उभी करून पुरंदरे यांनी महाराष्ट्रात खोटा इतिहास पसरवला. यापूर्वी त्यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकाकडे कादंबरी म्हणून पाहत होतो; मात्र सरकारने त्यांच्या लिखाणाला अधिकृत इतिहास म्हणून दर्जा दिल्याचे व पुरंदरेंना पुरस्कार जाहीर केल्याचे पाहिल्यावर विरोध तीव्र केल्याचे ते म्हणाले. समाजावर पकड निर्माण करण्यासाठी इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा हा कट असून, त्याला पाठिंबा देत फडणवीस सरकार हुकूमशाहीकडे जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. श्रीमंत कोकाटे म्हणाले, देशात सत्तांतरानंतर इतिहासाचा प्रवाह उलटा वाहू लागला असून, जातिव्यवस्थेला खतपाणी घातले जात आहे. चुकीच्या इतिहासाद्वारे शिवरायांना बहुजनांपासून तोडण्याचा डाव आहे. अफझल खान क्रूर असल्याने त्याला शिवरायांनी मारले. त्यांचा लढा अन्यायाविरुद्ध होता, ते धर्मयुद्ध नव्हते; मात्र त्यांची प्रतिमा मुस्लीमविरोधी तयार करण्यात आली. प्रा. डॉ. प्रतिमा परदेशी यांनीही शिवरायांना प्रथम अण्णा भाऊ साठेंनी घरोघर पोहोचवल्याचे सांगत पुरंदरेंना चाड असेल तर त्यांनी हा पुरस्कार स्वीकारू नये, असे आवाहन केले. नागरिकांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निषेधाची पोस्टकार्डे पाठवावीत, असेही त्या म्हणाल्या. ज्ञानेश महाराव यांनी प्रथा-परंपरांवर कठोर हल्ला चढवत, खोट्या इतिहासाविरोधात आता नागरिकांनीच उभे राहावे व एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अजीज पठाण, जगदीश जाधव, राजू देसले यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)