शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

शिवनगर, बजरंगनगर मूलभूत सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:08 IST

गंगापूररोडवरील आनंदवली गावातील शिवनगर, बजरंगनगर या वसाहती अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त झाल्या आहेत. या वसाहती ३५ वर्षांपासून गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने काहींना घरपट्टी लागू आहे

गंगापूर : गंगापूररोडवरील आनंदवली गावातील शिवनगर, बजरंगनगर या वसाहती अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त झाल्या आहेत. या वसाहती ३५ वर्षांपासून गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने काहींना घरपट्टी लागू आहे, तर काहींना घरपट्टी लागू नसल्यामुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत तर आहेच, मात्र या ठिकाणी महापालिकेच्या वतीने मूलभूत सुविधाही कमी प्रमाणात पुरविल्या गेल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.या वसाहतीतील नागरिकांनी महापालिकेच्या सातपूर विभागात अनेकवेळा सुविधांसाठी चकरा मारल्या मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली जाते. गटारी खुल्या आहेत, रस्त्यावर पाणी साचते, रात्री लाईट नसते, घंटागाडी कचरा उचलण्यास लवकर येत नाही अशा अनेक प्रकारच्या समस्या परिसरात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.गंगापूर रोडवरील शिवनगर व बजरंगनगर गेल्या अनेक वर्षांपासून वसलेली वसाहत आहे. सातपूर परिसरात औद्योगिक कारखान्यांमध्ये काम करून, हातगाडी लावून तर काही लहान-मोठा घरगुती व्यवसाय करून उपजीविका भागवतात. महापालिका क्षेत्रात ही वसाहत येत असले तरी महापालिकेचे नेहमीच दुर्लक्ष झालेले दिसते. येथील संतप्त नागरिकांनी सांगितले की, या भागात रस्ते अरुं द असल्याचे कारण देऊन घंटागाडीच मनपाने बंद करून टाकली. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरते. त्यामुळे परिसरात डासांची पैदास वाढल्याने डेंग्यू, चिकुनगुन्या, थंडीताप, मलेरिया यांसारखे आजार पसरण्याचा धोका असल्याचे नागरिकांनी सांगितले. येथील वसाहतीत कधी कधी पाणी कमी दाबाने आणि गढूळ येत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. या भागात साफसफाई होत नाही. नागरिकांनी घरातला कचरा टाकायचा तरी कुठे असा सवाल मंगलबाई सापटे यांनी केला आहे. या भागाकडे मनपाचे दुर्लक्षच होते. झोपडपट्टी परिसर असल्याने या भागात मच्छर मोठ्या प्रमाणात आहेत. या भागात स्वच्छता मोहीम, औषध फवारणी, धूर फवारणी करावी मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे देवराम खाडे यांनी सांगितले.(उद्याच्या अंकात : गंजमाळ परिसर)स्वच्छता, पाणी, आरोग्याच्या समस्या कायमपावसाळ्यात या भागात गटारीचे पाणी घरात घुसते त्यामुळे रोगराई पसरून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. सर्व पाणी घरासमोर तुंबून त्याचे तळे तयार होऊन दुर्गंधी सुटते. त्याचा सामना करावा लागतो. परिसरातील शौचालयांची अवस्था बिकट झाली आहे. सफाई करण्यासाठी कर्मचारी लवकर येत नाही. त्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधी पसरते. पावसाळ्यात गटार तुंबतात, नळाला त्या गटारीचे पाणी येते, तेच प्यावे लागत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. या भागात पोलिसांच्या दुर्लक्षाने अवैध धंदे सुरू असतात. या भागात भुरट्या चोऱ्या होतात. अशा समस्यांकडे महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या भागात स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. मुलांना खेळण्यासाठी हक्काचे ग्राउंड नाही की उद्यान नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक