शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

शिवनगर, बजरंगनगर मूलभूत सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:08 IST

गंगापूररोडवरील आनंदवली गावातील शिवनगर, बजरंगनगर या वसाहती अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त झाल्या आहेत. या वसाहती ३५ वर्षांपासून गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने काहींना घरपट्टी लागू आहे

गंगापूर : गंगापूररोडवरील आनंदवली गावातील शिवनगर, बजरंगनगर या वसाहती अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त झाल्या आहेत. या वसाहती ३५ वर्षांपासून गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने काहींना घरपट्टी लागू आहे, तर काहींना घरपट्टी लागू नसल्यामुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत तर आहेच, मात्र या ठिकाणी महापालिकेच्या वतीने मूलभूत सुविधाही कमी प्रमाणात पुरविल्या गेल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.या वसाहतीतील नागरिकांनी महापालिकेच्या सातपूर विभागात अनेकवेळा सुविधांसाठी चकरा मारल्या मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली जाते. गटारी खुल्या आहेत, रस्त्यावर पाणी साचते, रात्री लाईट नसते, घंटागाडी कचरा उचलण्यास लवकर येत नाही अशा अनेक प्रकारच्या समस्या परिसरात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.गंगापूर रोडवरील शिवनगर व बजरंगनगर गेल्या अनेक वर्षांपासून वसलेली वसाहत आहे. सातपूर परिसरात औद्योगिक कारखान्यांमध्ये काम करून, हातगाडी लावून तर काही लहान-मोठा घरगुती व्यवसाय करून उपजीविका भागवतात. महापालिका क्षेत्रात ही वसाहत येत असले तरी महापालिकेचे नेहमीच दुर्लक्ष झालेले दिसते. येथील संतप्त नागरिकांनी सांगितले की, या भागात रस्ते अरुं द असल्याचे कारण देऊन घंटागाडीच मनपाने बंद करून टाकली. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरते. त्यामुळे परिसरात डासांची पैदास वाढल्याने डेंग्यू, चिकुनगुन्या, थंडीताप, मलेरिया यांसारखे आजार पसरण्याचा धोका असल्याचे नागरिकांनी सांगितले. येथील वसाहतीत कधी कधी पाणी कमी दाबाने आणि गढूळ येत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. या भागात साफसफाई होत नाही. नागरिकांनी घरातला कचरा टाकायचा तरी कुठे असा सवाल मंगलबाई सापटे यांनी केला आहे. या भागाकडे मनपाचे दुर्लक्षच होते. झोपडपट्टी परिसर असल्याने या भागात मच्छर मोठ्या प्रमाणात आहेत. या भागात स्वच्छता मोहीम, औषध फवारणी, धूर फवारणी करावी मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे देवराम खाडे यांनी सांगितले.(उद्याच्या अंकात : गंजमाळ परिसर)स्वच्छता, पाणी, आरोग्याच्या समस्या कायमपावसाळ्यात या भागात गटारीचे पाणी घरात घुसते त्यामुळे रोगराई पसरून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. सर्व पाणी घरासमोर तुंबून त्याचे तळे तयार होऊन दुर्गंधी सुटते. त्याचा सामना करावा लागतो. परिसरातील शौचालयांची अवस्था बिकट झाली आहे. सफाई करण्यासाठी कर्मचारी लवकर येत नाही. त्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधी पसरते. पावसाळ्यात गटार तुंबतात, नळाला त्या गटारीचे पाणी येते, तेच प्यावे लागत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. या भागात पोलिसांच्या दुर्लक्षाने अवैध धंदे सुरू असतात. या भागात भुरट्या चोऱ्या होतात. अशा समस्यांकडे महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या भागात स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. मुलांना खेळण्यासाठी हक्काचे ग्राउंड नाही की उद्यान नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक