शिवरायांचे सागरी दुर्ग जलमार्गाने जोडणार : संभाजीराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 02:00 AM2021-01-04T02:00:58+5:302021-01-04T02:01:29+5:30

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून तर थेट सावित्री नदीच्या पात्रापर्यंत जलमार्ग विकसित करत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या जलदुर्गांना वैभव प्राप्त करुन देण्याचा मानस खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला.

Shivaraya's sea forts to be connected by water: Sambhaji Raje Bhosale | शिवरायांचे सागरी दुर्ग जलमार्गाने जोडणार : संभाजीराजे भोसले

शिवरायांचे सागरी दुर्ग जलमार्गाने जोडणार : संभाजीराजे भोसले

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’च्या सदिच्छा भेटीत व्यक्त केला मानस

नाशिक : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून तर थेट सावित्री नदीच्या पात्रापर्यंत जलमार्ग विकसित करत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या जलदुर्गांना वैभव प्राप्त करुन देण्याचा मानस खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला.
संभाजीराजे हे रविवारी (दि.३) नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बोलताना संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे. गेटवे ऑफ इंडियापासून खांदेरी, उंदेरी, कुलाबा, पदम‌्दुर्ग, मुरुड-जंजिरा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे गड-किल्ले सागरी जलमार्गाने जोडण्याबाबत ठाकरे यांच्याकडे प्रस्तावदेखील सादर केला आहे. पदम‌्दुर्ग येथे जेट्टी तयार करण्यासाठी परवानगी मिळाल्याची माहितीही संभाजीराजे यांनी यावेळी दिली. दक्षिण भारतातील ‘जिंजी’ दुर्गाच्या विकासालाही प्रारंभ करण्यात आला आहे, असे संभाजीराजे यावेळी म्हणाले.
‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी संभाजीराजे यांचे स्वागत  केले. दरम्यान लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांच्याशी संभाजीराजे यांनी मोबाईलवरुन संवाद साधला.  याप्रसंगी प्रशासन विभागप्रमुख राहुल धांदे यांच्यासह संपादकीय सहकाऱ्यांसोबच त्यांनी चर्चा केली. छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, छत्रपती युवा सेनेचे अध्यक्ष गणेश कदम उपस्थित होते.
‘फोर्ट फेडरेशन’ची मुहूर्तमेढ
राज्यातील दुर्लक्षित गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी राज्यस्तरीय ‘फोर्ट फेडरेशन’ची स्थापना करण्यात येणार आहे. हे फेडरेशन राज्य पुरातत्व विभागासोबत सामंजस्य करार करुन त्या माध्यमातून राज्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्लक्षित गड-किल्ल्यांची पडझड रोखण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
शंभर किल्ल्यांचा पाहणी दौरा नाशकातूनच
nफेब्रुवारीत वाढदिवसाच्या औचित्यावर राज्यातील सुमारे शंभर किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देण्याचे नियोजन आहे. गड-किल्ले पाहणी दौऱ्याचा शुभारंभ कुंभनगरी नाशिकमधूनच करणार असल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शिवस्मारक पूर्वीच्याच  जागी व्हावे
n शिवस्मारक पूर्वीच्या जागेपासून तीन किलाेमीटर अंतरावर उभारण्याचे नियाेजन सरकारने केले आहे. त्यामुळे ३ हजार काेटी रुपयांचा खर्च वाढला असून हे स्मारक पूर्वीच्याच जागेवर उभारण्यात यावे, असे संभाजीराजे म्हणाले. 

Web Title: Shivaraya's sea forts to be connected by water: Sambhaji Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.