शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

पुरस्कारार्थींनी समाज सुदृढतेचे काम करावे शिवाजीराव मोघे

By admin | Updated: August 2, 2014 01:26 IST

: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण

 नाशिक : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी उभे आयुष्य उपेक्षितांंच्या सुधारणेसाठी घालविले. त्यामुळे आज ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांनी पुरस्कार मिळाले म्हणजे काम संपले असे न समजता समाज सृदृढ करण्यासाठी सातत्याने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.येथील कालिदास कलामंदिरात सामाजिक न्याय विभागाच्या वतीनेसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार २०१४-१५ च्या वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, आयुक्त रणजितसिंह देओल, सचिव आर. डी. शिंदे, अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, धुळे जि. प. अध्यक्ष सरला पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.शिवाजीराव मोघे यांनी सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांचे पुस्तक जगातील २७ भाषांत लिहिले गेले आहे. ते मैलोन्मैल पायी प्रवास करून मुंबईला आले. त्यात अंत:करणात व मनात देवत्व होते.पिढयान् पिढ्या रंजलेल्या व गांजलेल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळासाठी दरवर्षी ७५ कोटींची तरतूद करण्यात येते. लहूजी साळवे आयोगाच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे महामंडळासाठी विकास योजना राबविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. एकाच वेळी सहा शिष्यवृत्त्या आॅनलाइन देण्यात येऊन त्याचे लाभार्थी ३२ लाख विद्यार्थी आहेत. मागासवर्गीयांसाठी या तीन वर्षांत राज्यात सव्वादोन लाख घरकुले बांधलीत. जादूटोणा विधेयकास मंजुरी दिली. तसेच ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी काम संपले म्हणून थांबू नये, तर समाज सृदृढ करण्याचे काम केले पाहिजे. छगन भुजबळ यांनी सांगितले की, महाराष्ट्राला दृष्ट्या आणि क्रांतिकारी नेत्यांची परंपरा आहे. या परंपरेतील रत्नांमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शिक्षण कमी असतानाही शब्दरूपी निखाऱ्यांतून त्यांनी उपेक्षित समाजामध्ये संघर्षाची जिद्द निर्माण केली. उपेक्षित माणूस ताठ मानेने उभा राहिला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. यावेळी राज्यमंत्री संजय सावकारे व सचिव आर. डी. शिंदे यांनीही अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट उलगडविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजीराव पाटील यांनी शाहिरी पोवाडे म्हटले. (प्रतिनिधी)