शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रमेव जयते...

By किरण अग्रवाल | Updated: April 29, 2018 13:59 IST

एप्रिल-मे महिना म्हटला म्हणजे, सरकारी यंत्रणा पाणीटंचाईला तोंड देण्यातच व्यस्त दिसून येते. तरी टंचाई पूर्णांशाने दूर होतेच असे नाही. विशेषत: ग्रामीण भागातील महिला-भगिनींना त्याचा मोठा सामना करावा लागतो.

ठळक मुद्दे मैलोन्मैल डोक्यावर हंडे-गुंडे घेऊन त्यांना पायपीट करावी लागते.जिल्ह्यातील सिन्नर व चांदवडसारखे तालुके तर कायम दुष्काळी असतात.वर्षोन्वर्ष तेथे शासकीय योजना राबविल्या जातात. पण टंचाई काही दूर होत नाही.

सर्वच बाबतीत केवळ शासनावर विसंबून राहणे योग्य ठरणारे नाही. विकासाच्या बाबतीत किंवा कसल्याही समस्येच्या निराकरणासाठी आवश्यक ते उपाय योजण्याबाबत सरकार प्रयत्नशील असतेच, पण सरकारी प्रयत्नाला लोकसहभागाची साथ लाभली तर चित्र झपाट्याने बदलता येते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भारतीय जैन संघटना व पानी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांकडे याचदृष्टीने पाहता येणारे आहे.एप्रिल-मे महिना म्हटला म्हणजे, सरकारी यंत्रणा पाणीटंचाईला तोंड देण्यातच व्यस्त दिसून येते. तरी टंचाई पूर्णांशाने दूर होतेच असे नाही. विशेषत: ग्रामीण भागातील महिला-भगिनींना त्याचा मोठा सामना करावा लागतो. मैलोन्मैल डोक्यावर हंडे-गुंडे घेऊन त्यांना पायपीट करावी लागते. उन्हाचा चटका व दुष्काळातील होरपळ काय असते हे खरेतर या माय-भगिनींना विचारायला हवे. जिल्ह्यातील सिन्नर व चांदवडसारखे तालुके तर कायम दुष्काळी असतात. वर्षोन्वर्ष तेथे शासकीय योजना राबविल्या जातात. पण टंचाई काही दूर होत नाही. म्हणूनच प्रख्यात समाजसेवी शांतीलाल मुथा यांच्या नेतृत्वातील भारतीय जैन संघटना व अभिनेते आमिर खान यांच्या पानी फाउंडेशनने या दोन्ही तालुक्यांतील शंभरपेक्षा अधिक गावांमध्ये पाणी अडविण्यासाठी व ते जमिनीत जीरवण्यासाठी श्रमदानातून अनेकविध कामे हाती घेतली आहेत. दुष्काळातील होरपळमुळे डोळ्यात पाणी येते हे खरे, पण आता डोळ्यात पाणी आणायचे नाही, तर गावात पाणी आणायचे; असा निर्धार करून गावकरी या अभियानात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह त्यांची यंत्रणाही यात हिरीरीने सहभागी झालेली दिसत आहे. एरव्ही तटस्थ राहणाऱ्या न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशही या मोहिमेत सहभागी झालेले दिसून आले. अनेक नोकरदार कामाच्या ठिकाणी रजा टाकून, तर श्रमिक वर्ग मोलमजुरीला न जाता श्रमदान करीत आहेत. जणू जागोजागी गावशिवारात श्रमदानाचे तुफानच आले आहे. आपले गाव पाणीदार व्हावे, टॅँकरमुक्ती साधावी म्हणून हे श्रमदान सुरू आहे. यातील संबंधितांची सामाजिक जाणीव महत्त्वाची असून, त्यामुळेच श्रमदानाला गावक-यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे जो इतरांसाठी प्रेरक ठरला आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेअंतर्गत हे तुफान आले असले तरी ‘श्रमेव जयते’चाच आदर्श त्यातून घडून येत आहे. म्हणून त्यासाठी पुढाकार घेणाºया जैन संघटना व पानी फाउंडेशनचे तर कौतुक करावे तेवढे थोडे आहेच, पण त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आलेल्या ग्रामस्थांचा या मोहिमेतील अनुकरणीय सहभाग विशेष गौरवास्पद आहे. सामाजिक जाणिवांचे हे तुफान चांदवड व सिन्नर तालुक्यांखेरीज अन्यही तालुक्यात घोंगावावे आणि त्यासाठी अन्य स्थानिक सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा एवढेच यानिमित्ताने.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाNashikनाशिकdroughtदुष्काळ