शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शिरसमणीकरांची पाण्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 14:20 IST

कळवण : शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्यांचे पाणी सुरु झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरु न घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे.

कळवण : शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्यांचे पाणी सुरु झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरु न घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. पाणी आपल्याला मुबलक मिळाले पाहिजे, अशी मानसिकता प्रत्येकाची झालेली आहे. त्यामुळे पाण्यासाठी असलेली धावपळ जीवावर देखील बेतते याचा अनुभव शिरसमणीकराना देखील आहे. शेजारील गावात लोकवस्त्यांवर आळी-पाळीने दररोज पाणी पुरवताना ग्रामपंचायतींना देखील कसरत करावी लागत असल्याचे चित्र असले तरी शिरसमणी गावात मात्र चित्र वेगळेच आहे ,दोन दोन दिवस पाणी पुरवठा करण्यास ग्रामपंचायतीची यंत्रणा अपयशी ठरली असून यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी नाराजी व्यक्त केली.  ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे दर दिवशी पाणी नळांना दिले पाहिजे मात्र काही भागात ते मिळते तर काही भागात तेही मिळत नाही.दोन दोन दिवस पाणी पुरवठा होत नसल्याचे नामदेव शिरसाठ यांनी सांगितले.गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली मात्र ती अपयशी ठरली ,गावात असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला पाणी कमी आहे ,त्या विहिरींची खोली करणे गरजेचे होते त्या विहिरीला पाणी लागले असते असे ग्रामस्थांनी सांगितल. पाणीपुरवठा करण्यासाठी सहा लाख रु पये खर्च करून नवीन विहिरीचे काम केले मात्र पाणी लागले नसल्याने शासनाचा निधी वाया गेला असल्याचे सांगून ग्रामपंचायतच्या व्यवस्थेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करून पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी आशाबाई मोहिते , वैशाली शिरसाठ , जिजाबाई पाटोळे ,मंगलाबाई पाटोळे ,सोनाली मोहिते सविता मोहिते व राजेंद्र मोहिते यांनी केली आहे .

टॅग्स :Nashikनाशिक