शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

“असे लोक असतात समाजात”; विक्रम गोखलेंचा विषय शरद पवारांनी एका वाक्यात संपवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 19:34 IST

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कधीही कोसळणार असल्याचे भाकित केले होते.

नाशिक: बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे खूप आभार मानले. मात्र, यानंतर एका मुलाखतीत बोलताना आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे वादग्रस्त विधान केले. यावरून देशभरातून कंगनाविरोधात संतापाची लाट उसळली असून, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. मात्र, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना कंगना रणौतला पाठिंबा देत ती योग्य असल्याचे म्हटले होते. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी केवळ एकाच वाक्यात या प्रकरणाचा निकाल लावल्याचे पाहायला मिळाले. 

शरद पवार निफाडला आले असताना पत्रकारांनी त्यांना विक्रम गोखले यांनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी, असे मला वाटत नाही. असे लोक असतात समाजात, असे सांगत शरद पवार यांनी यावर अधिक बोलणे टाळले. 

त्यांना दिवस मोजायचे काम करावे लागेल

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कधीही कोसळणार असल्याचे भाकित केले होते. त्यावर बोलताना, भाजपचे नेते अधूनमधून सरकार पडणार असल्याचे बोलत असतात. आम्ही जर ठरवून घेतले आहे की जुळवून घ्यायचे, त्यामुळे हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल, असे म्हणणाऱ्यांना दिवस मोजायच काम करावे लागेल, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

दरम्यान, तुम्ही जिथे आहात तिथे प्रश्न सोडवले पाहिजे. दुसरीकडे वर्ग करून प्रश्न सोडवा, असे म्हणणे अयोग्य आहे. न्यायालयाने देखील याबाबत स्पष्ट भूमिका दिलेली आहे. त्यामुळे यातून केवळ कामगारांचे नुकसान होत आहे. एकादशीला असंख्य लोकं वारीला जातात. त्यांचेही हाल झाले असून, आस्तेला धक्का बसविण्याच काम केले जात आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर दिली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVikram Gokhaleविक्रम गोखलेNarayan Raneनारायण राणे