शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

साडेनऊ हजार शिक्षकांच्या चाचणीची ओढावणार नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:40 IST

जिल्ह्यातील शाळा २३ नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली होती. परंतु यात ठोस नियोजनाचा अभाव असल्याने जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ हजार शिक्षकांची पुन्हा काेरोना चाचणी करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढाविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : कोरोना प्रलंबित अहवालांविषयी शिक्षण विभागच अनभिज्ञ

नाशिक : जिल्ह्यातील शाळा २३ नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली होती. परंतु यात ठोस नियोजनाचा अभाव असल्याने जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ हजार शिक्षकांची पुन्हा काेरोना चाचणी करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढाविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शाळा सुरू करण्यासाठीच्या तयारीचा भाग म्हणून आरोग्य विभागाच्या मदतीने शिक्षण विभागाकडून नाशिक जिल्हा परिषद व महापालिका क्षेत्रातील तब्बल नऊ हजार ५७८ शिक्षकांचे कोरोना चाचणीसाठी नमुने संकलित करण्यात आले होते. यात रविवारी (दि.२२) सायंकाळपर्यंत महापालिका क्षेत्रात नऊ व जिल्हा परिषद क्षेत्रात ३७ असे जवळपास ४६ शिक्षक बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते, तर जवळपास तीन हजार ५५२ अहवाल प्रलंबित होते. मात्र सोमवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन बैठकीत ४ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर प्रलंबित अहवालांकडे दुर्लक्ष झाल्याने प्रलंबित अहवालांच्या निकालाविषयी शिक्षण विभागही अनभिज्ञच असल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाने दिवाळीपूर्वीच सूचना केल्या होत्या. मात्र शिक्षण विभागाने यासंदर्भात कोणतेही ठोस नियोजन नसल्याने शाळा सुरू करण्याचा दिवस जवळ आल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या चाचण्या करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे कोरोना चाचणी केंद्रावर अचानक शिक्षकांची गर्दी झाली. परिणामी केवळ दोन हजार ८७३ शिक्षकांचीच आरटीपीसीआर चाचणी होऊ शकली, तर तब्बल ५ हजार ३९६ शिक्षकांना अँटिजेन टेस्ट करावी लागली होती.

 

इन्फो-

नाशिक जिल्हा परिषद क्षेत्रातील आठ हजार २८९ व महापालिका क्षेत्रातील एक हजार ३०९ अशा एकूण नऊ हजार ५७८ शिक्षकांची चाचणी करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात शाळाच सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे शिक्षकांच्या चाचणीचा खर्च व यंत्रणेचा वेळ वाया गेला असून, आता डिसेंबरअखेर परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु, त्यापूर्वी पुन्हा एकदा शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावणार आहे. त्यामुळे किमान आता तरी शाळा सुरू करण्याबाबत ठोस नियोजन करूनच शिक्षकांच्या चाचण्या करण्याची मागणी मुख्याध्यापक व शिक्षकांकडून होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षकcorona virusकोरोना वायरस बातम्या