शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

शबरी वित्त व विकास महामंडळाच्या वसुलीअभावी योजनांना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:00 IST

राज्यातील सुशिक्षित व बेरोजगार आदिवासी युवकांचा बेरोजगारीचा वनवास संपविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शबरी वित्त व विकास महामंडळच लाभार्थ्यांना दिलेल्या कर्जाच्या वसुलीअभावी वनवासात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरातील लाभार्थ्यांना ८५ कोटींचे क र्जवाटप करण्यात आले असून, यात नाशिक जिल्ह्यातील जवळपास १,०४८ लाभार्थ्यांना वितरित केलेल्या १२ कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे.

नाशिक : राज्यातील सुशिक्षित व बेरोजगार आदिवासी युवकांचा बेरोजगारीचा वनवास संपविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शबरी वित्त व विकास महामंडळच लाभार्थ्यांना दिलेल्या कर्जाच्या वसुलीअभावी वनवासात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरातील लाभार्थ्यांना ८५ कोटींचे क र्जवाटप करण्यात आले असून, यात नाशिक जिल्ह्यातील जवळपास १,०४८ लाभार्थ्यांना वितरित केलेल्या १२ कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. परंतु, कर्जाच्या रकमेची वसुलीच होत नसल्याने महामंडळाला कर्जपुरवठ्याच्या विविध योजनांना कात्री लावावी लागली आहे.  महामंडळाच्या थकीत कर्जाची रक्कम ही ८५ कोटींवर पोहोचल्याने सरकारने या महामंडळाची नवीन कर्जहमी घेण्यास नकार दिला असून, गेल्या तीन ते चार वर्षांत केवळ पाच ते सहा टक्के लाभार्थ्यांकडूनच कर्जाची वसुली होऊ शकली असून, अद्यापही तब्बल ९६ टक्के लाभाथ्यांकडे ८३ कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असून, वसुलीची प्रक्रियाही ठप्प आहे. आदिवासी युवकांना २००० सालापासून शबरी वित्त व विकास महामंडळामार्फत रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासह विविध प्रकारचे अर्थसहाय्य करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, सन २००६ पासून या महामंडळाच्या कारभाराला उतरती कळा लागली असून, हे महामंडळ केवळ राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते सांभाळण्याचे साधन बनले. महामंडळाच्या कर्जपुरवठ्याच्या योजनांना पुनरुज्जीवन देण्यासाठी २००८ मध्ये शासनाने लाभार्थी कर्जदारांचे जवळपास २४ कोटींचे व्याज माफ केले होते. परंतु त्याचाही वसुलीत काहीही उपयोग झालेला नाही. या थकीत कर्जामुळे महामंडळाची थकबाकी आता ८३ कोटींपर्यंत पोहचली असून, कर्जाच्या वसुलीअभावी महामंडळ डबघाईला आले आहे.थकबाकीदारांचा आकडा वाढलाशबरी विकास महामंडळ विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना ७५ टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असे, तर १० टक्के राष्ट्रीयीकृत बँक व १५ लाभार्थ्यांचे अनुदान मिळून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात होते. परंतु, २००६ पासून या कर्जाची परतफेड करणाऱ्यांची संख्या घटल्याने थकबाकीचा आकडा सातत्याने वाढत गेला. अखेर महामंडळाला कर्जपुरवठ्याच्या विविध योजनांना कात्री लावण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षे योजना पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :MONEYपैसा