शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार सत्याहत्तर कोटींचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:28 IST

पाटोदा : राज्याच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बदल करून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाºया शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात दिलासा : येवला तालुक्यात २७०० लाभार्थी

गोरख घुसळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : राज्याच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बदल करून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाºया शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.दोन लाखांवरील कर्ज रक्कम भरल्यास शेतकºयांचे दोन लाख रु पये कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निकषानुसार येवला तालुक्यातील दोन हजार सातशे पात्र लाभार्थी शेतकºयांना सुमारे सत्याहत्तर कोटी रु पयांचे अनुदान मिळणार आहे. नियमितकर्ज भरणाºया शेतकºयांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याने पात्र शेतकºयांना सुमारे १० कोटी ४९ लाखांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती तहसीलदार रोहिदास वारुळे व सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी दिली आहे. राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत असून, दोन लाख रु पयांपर्यंत कर्ज असलेल्या येवला तालुक्यातील सुमारे १८ हजार ४३८ शेतकºयांना सुमारे दोनशे कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकºयांनी दुष्काळी स्थितीचा सामना करीत शेती कसली आहे. मात्र त्यात त्यांना नेहमीच नुकसान सोसावे लागल्याने अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. महाविकास आघाडीने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असून, या निर्णयाने शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.- राजेंद्र गायकवाड, शेतकरी, कासारखेडेयेवल्यात नियमित कर्ज भरणारे सुमारे १०३८ लाभार्थी शेतकरी असून, त्यांना शासनामार्फत सुमारे १० कोटी ४९ लाख रु पयांचे अनुदान दिले जाणार आहे. या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. येवला तालुक्यातील दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले दोन हजार सातशे दहा पात्र लाभार्थी शेतकरी असून, आजमितीस सुमारे ७६ कोटी ५८ लाख १९ हजार रु पयांची थकबाकी आहे. पात्र शेतकºयांना दोन लाखांवरील २२ कोटी ३८ लाख रु पयांची रक्कम भरावी लागणार आहे. शासनाकडून कर्जमाफीच्या लाभापोटी ५४ कोटी वीस लाख रु पये अनुदान मिळणार आहे. तर नियमित कर्ज भरणाºया पन्नास हजार रु पयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. नव्याने कर्ज उपलब्ध न झाल्याने समाधानगेल्या काही वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे शेतीशी निगडित कर्जाची रक्कम तो फेडू शकला नाही. त्यामुळे शेतकºयांना शेतीसाठी नव्याने कर्ज उपलब्ध न झाले नाही. महाविकास आघाडीने राबविलेली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार